शेतकऱ्यांनो, सोयाबीन बियाण्याचे जतन करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:33 IST2021-02-05T05:33:30+5:302021-02-05T05:33:30+5:30
तालुका कृषी अधिकाऱ्यांचे बांधावर मार्गदर्शन नांदगाव खंडेश्वर : तालुक्यात येणाऱ्या खरीप हंगामातील सोयाबीन पेरणीसाठी ज्या शेतकऱ्याकडे चांगल्या प्रतीचे ...

शेतकऱ्यांनो, सोयाबीन बियाण्याचे जतन करा
तालुका कृषी अधिकाऱ्यांचे बांधावर मार्गदर्शन
नांदगाव खंडेश्वर : तालुक्यात येणाऱ्या खरीप हंगामातील सोयाबीन पेरणीसाठी ज्या शेतकऱ्याकडे चांगल्या प्रतीचे सोयाबीन बियाणे उपलब्ध आहे, त्यांनी कृषिसहायकांकडून तपासणी करून पेरणीसाठी ते जतन करून ठेवावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी राहुल माने यांनी केले. त्यांनी एरंडगाव शिवारात उन्हाळी सोयाबीन पिकाची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते.
तालुक्यात सन २०२१-२२ च्या खरीप हंगामात सुमारे ४५ हजार हेक्टर अपेक्षित क्षेत्रासाठी सोयाबीन पेरणीसाठी ४५ हजार क्विंटल बियाणे लागणार आहे. त्याअनुषंगाने पुढील खरीप हंगामात सोयाबीन बियाण्याचा पेरणीसाठी तुटवडा जाणवू नये, यासाठी शेतकऱ्यांनी घरगुती चांगल्या प्रतीच्या सोयाबीन बियाण्याने जतन करून ठेवणे आवश्यक आहे. गेल्या हंगामात सोयाबीन कापणीच्या कालावधीत सतत पाऊस झाल्याने सोयाबीन पिकाचे नुकसान झाले होते. त्यामुळे येणाऱ्या खरीप हंगामात या बियाण्याचा तुटवडा जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. खरीप हंगामाच्या नियोजनासाठी चांगल्या प्रतीचे घरगुती बियाणे तपासणी करून पेरणीसाठी ठेवावे लागणार आहे. याबाबत कृषिसहायक व अधिकारी शिवारात व गावागावांत शेतकर्यांना मार्गदर्शन करीत आहेत.
-------------
पावसाने काढणीच्या वेळी हजेरी लावल्याने सोयाबीनची प्रतवारी खालावली. त्यामुळे यंदा सोयाबीन बियाण्याचा तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी घरगुती चांगल्या प्रतीचे बियाण्याची साठवणूक व जतन करून ठेवावे. पेरणी साठी घरगुती बियाण्याचा वापर करावा.
- वैशाली रिठे, सभापती, पंचायत समिती, नांदगाव खंडेश्वर
फोटो-एरंडगाव शेत शिवारातील उन्हाळी सोयाबीन पिकाची पाहणी करताना तालुका कृषी अधिकारी राहुल माने व इतर.