शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले
2
"हा देश राम-सीता यांचा, लादेनचा नाही; या छोट्या ओसामाला..."; बिहारमध्ये हिमंत बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल
3
Demat अकाऊंटमध्ये ४३ कोटी ठेवणारे डॉक्टर व्हायरल; झिरोदाला म्हटलं स्कॅम; कामथ काय म्हणाले?
4
राज्य मंत्रिमंडळाचे २१ 'जम्बो निर्णय'; आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा घोषणांचा धमाका
5
आयसीसीनं लॉरावर केली मर्जी बहाल! वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतवर अन्याय?
6
उत्पन्न वाढीसाठी एसटी रिटेल इंधन विक्री करणार, निविदा प्रक्रिया सुरू, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती 
7
एअर इंडियाच्या विमानात गडबड! दिल्लीहून बांगळुरूला जाणाऱ्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग
8
Relationship Tips: भांडणानंतर बायको रडत राहते आणि नवरा झोपी जातो, असे का?
9
महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या राज्यातील खेळाडूंना रोख पारितोषिक, सत्कार होणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा
10
९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले...
11
"...तर गोळीचे उत्तर गोळ्याने दिले जाईल"; अमित शाह यांचा "नापाक" पाकिस्तानला सज्जड दम! विरोधकांवरही बरसले
12
Astro Tips: कडक मंगळाची पत्रिका म्हणजे नेमके काय? ती व्यक्ती तापदायकच असते का? वाचा 
13
‘एक बुथ, १० युथ’ या सुत्रानुसार युवक काँग्रेसने काम करा, जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवा, नसीम खान यांचं आवाहन
14
Mumbai: "जेवण का आणलं नाही?" रूममेट्सकडून टॅक्सी ड्रायव्हरची हत्या, साकीनाका येथील घटना!
15
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
16
मोठी डेडलाईन! पॅन कार्डशी आधार लिंक करण्याची अंतिम तारीख जाहीर; घरबसल्याही करता होईल काम
17
Groww IPO: 'ग्रो'चा आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुला; काय आहे प्राईज बँड, किती करावी लागणार गुंतवणूक, जाणून घ्या
18
रागाच्या भरात परेश रावल यांनी चक्क केली होती हाणामारी! म्हणाले, "एकाला थप्पड लगावली, दुसऱ्याच्या डोक्यात दगड..."
19
वर्गात अवघे १२ विद्यार्थी अन् पटावर ५०! शिक्षण अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांचे नाव विचारताच समोर आलं धक्कादायक सत्य
20
हृदयद्रावक! "माझ्या मुली गेल्या, आता मी काय करू?"; ३ बहिणींचा मृत्यू, आई-वडिलांचा टाहो

कोरोना व्हायरसच्या संकटात सापडला शेतकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2020 05:00 IST

मोर्शी तालुक्यातील सर्व शेतकरी गहू, हरभरा आदी शेतमाल काढण्याच्या कामात व्यस्त होते. काही शेतकºयांनी संवगणी करून ठेवलेली होती, तर काही कापण्यासाठी तयार होता. दुसरीकडे बाजार समित्यांवरही लॉकडाऊनचा परिणाम दिसत असल्याने बाजार समितीमधील व्यवहार बंद केल्या गेले. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतमालाची विक्री करता येत नव्हती. परिणामी त्यांचे सर्व आर्थिक व्यवहार ठप्प झाले.

ठळक मुद्देआर्थिक व्यवहार ठप्प, खासगी बाजारात भाव पडले, खरेदीदार गावाकडे फिरकेना

लोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी : शेतकऱ्यांना कधी आस्मानी, तर कधी सुल्तानी संकटांना तोंड द्यावे लागते. त्याचे अवघे आयुष्य संघर्ष करण्यातच जात आहे. यंदा पिकांची अवस्था चांगली असताना व बाजार समित्यांमध्ये माल विक्री जोरात सुरू असताना कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत अधिकच भर पडली.मोर्शी तालुक्यातील सर्व शेतकरी गहू, हरभरा आदी शेतमाल काढण्याच्या कामात व्यस्त होते. काही शेतकऱ्यांनी संवगणी करून ठेवलेली होती, तर काही कापण्यासाठी तयार होता. दुसरीकडे बाजार समित्यांवरही लॉकडाऊनचा परिणाम दिसत असल्याने बाजार समितीमधील व्यवहार बंद केल्या गेले. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतमालाची विक्री करता येत नव्हती. परिणामी त्यांचे सर्व आर्थिक व्यवहार ठप्प झाले. दुसरीकडे सरकारने शेतीसंबंधित व्यवसाय व व्यवहार सुरू ठेवण्यास परवाणगी दिली आहे. नोंदणीशिवाय शेतमालाची विक्री करणे शक्य नाही.मोर्शी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या शेतीमालाची आवक थोडी वाढली असून, शनिवार, १८ एप्रिल रोजी तालुक्यातील निकड असलेल्या शेतकऱ्यांनी मालाची विक्री होईल व आपल्या हातात पैसा येईल, या आशेने शेतमाल यार्डात आणून टाकला. शनिवारी बाजार समितीत हरभरा ४५६ क्विंटल आला असून, त्याला भाव ३७०० ते ४९३५ रुपये तूर, ८७५ क्विंटल पाच हजार ते ५३५० रुपये भाव. सोयाबीन २५ क्विंटल दर ३५०० ते ३६२५ गहू ११२ क्विंटल भाव १५०० ते १७५० प्रतिक्विंटल भाव मिळाल्याचे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत सांगितले. मात्र, कृषिउत्पन्न बाजार समितीमध्ये झालेली गर्दी अनेकांसाठी धोक्याची ठरण्याचीही शक्यता आहे. यावर बाजार समितीने पुढाकार घ्यावा, असे शेतकरी बोलत होते. अनेक शेतकऱ्यांच्या मनात त्यांच्या कुटुंबाची आणि शेतात राबणाºया मजुरांच्या उदरनिर्वाहाची चिंता सतावत असल्याचे मत काही शेतकऱ्यांनी व्यक्त केले.शेतमालाला योग्य भाव हवेबाजार समित्या धोका पत्करण्यास तयार नाहीत अशी अवस्था दिसून येत आहे. शेतकºयांच्या शेतमालाला योग्य भाव देणे आवश्यक आहे. हा काळ अडचणीचा आहे, सरकारवर आरोग्य व्यवस्थेपासून ते नागरिकांच्या जीवाची व कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेची जबाबदारी आहे. देशातील कृषी साखळी ही मजबूत असून बाजार समित्या त्यात मोठा दुवा आहे, या काळात शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डFarmerशेतकरी