शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

कोरोना व्हायरसच्या संकटात सापडला शेतकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2020 05:00 IST

मोर्शी तालुक्यातील सर्व शेतकरी गहू, हरभरा आदी शेतमाल काढण्याच्या कामात व्यस्त होते. काही शेतकºयांनी संवगणी करून ठेवलेली होती, तर काही कापण्यासाठी तयार होता. दुसरीकडे बाजार समित्यांवरही लॉकडाऊनचा परिणाम दिसत असल्याने बाजार समितीमधील व्यवहार बंद केल्या गेले. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतमालाची विक्री करता येत नव्हती. परिणामी त्यांचे सर्व आर्थिक व्यवहार ठप्प झाले.

ठळक मुद्देआर्थिक व्यवहार ठप्प, खासगी बाजारात भाव पडले, खरेदीदार गावाकडे फिरकेना

लोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी : शेतकऱ्यांना कधी आस्मानी, तर कधी सुल्तानी संकटांना तोंड द्यावे लागते. त्याचे अवघे आयुष्य संघर्ष करण्यातच जात आहे. यंदा पिकांची अवस्था चांगली असताना व बाजार समित्यांमध्ये माल विक्री जोरात सुरू असताना कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत अधिकच भर पडली.मोर्शी तालुक्यातील सर्व शेतकरी गहू, हरभरा आदी शेतमाल काढण्याच्या कामात व्यस्त होते. काही शेतकऱ्यांनी संवगणी करून ठेवलेली होती, तर काही कापण्यासाठी तयार होता. दुसरीकडे बाजार समित्यांवरही लॉकडाऊनचा परिणाम दिसत असल्याने बाजार समितीमधील व्यवहार बंद केल्या गेले. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतमालाची विक्री करता येत नव्हती. परिणामी त्यांचे सर्व आर्थिक व्यवहार ठप्प झाले. दुसरीकडे सरकारने शेतीसंबंधित व्यवसाय व व्यवहार सुरू ठेवण्यास परवाणगी दिली आहे. नोंदणीशिवाय शेतमालाची विक्री करणे शक्य नाही.मोर्शी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या शेतीमालाची आवक थोडी वाढली असून, शनिवार, १८ एप्रिल रोजी तालुक्यातील निकड असलेल्या शेतकऱ्यांनी मालाची विक्री होईल व आपल्या हातात पैसा येईल, या आशेने शेतमाल यार्डात आणून टाकला. शनिवारी बाजार समितीत हरभरा ४५६ क्विंटल आला असून, त्याला भाव ३७०० ते ४९३५ रुपये तूर, ८७५ क्विंटल पाच हजार ते ५३५० रुपये भाव. सोयाबीन २५ क्विंटल दर ३५०० ते ३६२५ गहू ११२ क्विंटल भाव १५०० ते १७५० प्रतिक्विंटल भाव मिळाल्याचे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत सांगितले. मात्र, कृषिउत्पन्न बाजार समितीमध्ये झालेली गर्दी अनेकांसाठी धोक्याची ठरण्याचीही शक्यता आहे. यावर बाजार समितीने पुढाकार घ्यावा, असे शेतकरी बोलत होते. अनेक शेतकऱ्यांच्या मनात त्यांच्या कुटुंबाची आणि शेतात राबणाºया मजुरांच्या उदरनिर्वाहाची चिंता सतावत असल्याचे मत काही शेतकऱ्यांनी व्यक्त केले.शेतमालाला योग्य भाव हवेबाजार समित्या धोका पत्करण्यास तयार नाहीत अशी अवस्था दिसून येत आहे. शेतकºयांच्या शेतमालाला योग्य भाव देणे आवश्यक आहे. हा काळ अडचणीचा आहे, सरकारवर आरोग्य व्यवस्थेपासून ते नागरिकांच्या जीवाची व कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेची जबाबदारी आहे. देशातील कृषी साखळी ही मजबूत असून बाजार समित्या त्यात मोठा दुवा आहे, या काळात शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डFarmerशेतकरी