शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

शेतकऱ्यांचे ‘मालामाल’ स्वप्न धुळीस उन्हाळी सोयाबीनच्या भावात घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2022 05:00 IST

खरिपाचे प्रमुख पीक म्हणून सोयाबीनला शेतकऱ्यांची पसंती आहे. यंदा देखील २.६५ लाख हेक्टर क्षेत्र कृषी विभागाद्वारे प्रस्तावित करण्यात आलेले आहे. त्यामध्येही किमान दहा हजार हेक्टरने वाढ होण्याची शक्यता आहे. याशिवाय ५७८ हेक्टरमध्ये उन्हाळी सोयाबीनची पेरणी जिल्ह्यात करण्यात आलेली होती. पीक चांगले दिसत असताना शेंगा लागण्याचे प्रमाण कमी असल्याने सरासरी उत्पादनात कमी आलेली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : खरिपाच्या पेरणीसाठी आधार होणार म्हणून जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी उन्हाळी सोयाबीनची पेरणी केली. मात्र, मार्चपासून सुरू झालेल्या उष्णतेच्या लाटेमुळे उत्पादनात घट आली आहे. त्यातच बाजारात दोन आठवड्यांत भावही उतरले असल्याने शेतकऱ्यांच्या ‘मालामाल’ स्वप्नाचा भंग झाल्याचे दिसून येते.  खरिपाचे प्रमुख पीक म्हणून सोयाबीनला शेतकऱ्यांची पसंती आहे. यंदा देखील २.६५ लाख हेक्टर क्षेत्र कृषी विभागाद्वारे प्रस्तावित करण्यात आलेले आहे. त्यामध्येही किमान दहा हजार हेक्टरने वाढ होण्याची शक्यता आहे. याशिवाय ५७८ हेक्टरमध्ये उन्हाळी सोयाबीनची पेरणी जिल्ह्यात करण्यात आलेली होती. पीक चांगले दिसत असताना शेंगा लागण्याचे प्रमाण कमी असल्याने सरासरी उत्पादनात कमी आलेली आहे. काही शेतकऱ्यांनी खरिपासाठी बियाणे म्हणून राखून ठेवले, तर काहींनी भाव चांगला येईल या आशेने बाजारात विकायला आणले. पण ओलसरपणा आहे म्हणून कमी भावात मागणी केली जात असल्याची शेतकऱ्यांची व्यथा आहे. तसे पाहता शेतकऱ्यांचा शेतमाल निघताच ऐन हंगामात शेतमालाचे भाव व्यापाऱ्यांद्वारे पाडले जातात. आताही हरभऱ्याची शासकीय खरेदी बंद झाल्यानंतर बाजार समित्यांमध्ये आवक वाढली असता, २०० ते ३०० रुपयांपर्यंत प्रतिक्विंटलमागे भाव पाडल्याचे या आठवड्यात दिसून आले आहे.

जिल्ह्यात ५७८ हेक्टरमध्ये पेरा जिल्ह्यात ५७८ हेक्टरमध्ये उन्हाळी सोयाबीनची यंदा पेरणी झाली. यामध्ये सर्वाधिक २१३ हेक्टर क्षेत्र पेरा चांदूर रेल्वे तालुक्यात आहे. याशिवाय अमरावती १७, भातकुली ११, नांदगाव खंडेश्वर १००, तिवसा ६५, चांदूर बाजार १२, दर्यापूर ५, धारणी २ व चिखलदरा तालुक्यात ४ हेक्टरचा समावेश आहे.

ओलसरपणामुळे घसरला भावव्यापाऱ्यांद्वारा उन्हाळी सोयाबीनमध्ये ओलसरपणा असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रत्यक्षात ४२ ते ४४ अंश तापमानात एका दिवसात सोयाबीनमधील आर्द्रता निघून जात असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. फक्त भाव पाडण्यासाठी व्यापाऱ्यांद्वारे एक ना अनेक कारणे सांगण्यात येत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.

१० हजारांवरून सहा हजारांवर भाववर्षभरापूर्वी याच वेळेला सोयाबीनचा दर १० हजार रुपये क्विंंटलवर गेला होता व त्यानंतर दरामध्ये सातत्याने कमी येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात डीओसीला वाढती मागणी व सोयाबीन उत्पादनात देशांतर्गत कमी, याशिवाय अन्य कारणे आहेत, यंदा सोयाबीन व कापसाचे उत्पादन कमी झाल्याने वाढती मागणी आहे.

एक प्रयोग म्हणून पहिल्यांदा उन्हाळी सोयाबीनची पेरणी केली. उत्पादन खर्च कमी असल्याने पेरायला हरकत नाही. उष्णतेच्या लाटेमुळे शेंगा कमी लागल्याने उत्पन्नात कमी आलेली आहे. खरिपासाठी बियाणे म्हणून राखून ठेवले आहे.-अतुल चव्हाण, शेतकरी

आयात कर माफ केला असल्याने सोयाबीनच्या भावात काही प्रमाणात कमी आलेली आहे. त्यामुळे तेलाच्या भावातही घसरण झाली आहे. उन्हाळी सोयाबीनची प्रतवारी कमी आहे व जिल्ह्यात पेरणी क्षेत्रही कमी असल्याने फारसे विक्रीला येत नाही.-अमर बांबल, अडते

 

टॅग्स :market yardमार्केट यार्ड