शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

शेतकऱ्यांचे ‘मालामाल’ स्वप्न धुळीस उन्हाळी सोयाबीनच्या भावात घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2022 05:00 IST

खरिपाचे प्रमुख पीक म्हणून सोयाबीनला शेतकऱ्यांची पसंती आहे. यंदा देखील २.६५ लाख हेक्टर क्षेत्र कृषी विभागाद्वारे प्रस्तावित करण्यात आलेले आहे. त्यामध्येही किमान दहा हजार हेक्टरने वाढ होण्याची शक्यता आहे. याशिवाय ५७८ हेक्टरमध्ये उन्हाळी सोयाबीनची पेरणी जिल्ह्यात करण्यात आलेली होती. पीक चांगले दिसत असताना शेंगा लागण्याचे प्रमाण कमी असल्याने सरासरी उत्पादनात कमी आलेली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : खरिपाच्या पेरणीसाठी आधार होणार म्हणून जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी उन्हाळी सोयाबीनची पेरणी केली. मात्र, मार्चपासून सुरू झालेल्या उष्णतेच्या लाटेमुळे उत्पादनात घट आली आहे. त्यातच बाजारात दोन आठवड्यांत भावही उतरले असल्याने शेतकऱ्यांच्या ‘मालामाल’ स्वप्नाचा भंग झाल्याचे दिसून येते.  खरिपाचे प्रमुख पीक म्हणून सोयाबीनला शेतकऱ्यांची पसंती आहे. यंदा देखील २.६५ लाख हेक्टर क्षेत्र कृषी विभागाद्वारे प्रस्तावित करण्यात आलेले आहे. त्यामध्येही किमान दहा हजार हेक्टरने वाढ होण्याची शक्यता आहे. याशिवाय ५७८ हेक्टरमध्ये उन्हाळी सोयाबीनची पेरणी जिल्ह्यात करण्यात आलेली होती. पीक चांगले दिसत असताना शेंगा लागण्याचे प्रमाण कमी असल्याने सरासरी उत्पादनात कमी आलेली आहे. काही शेतकऱ्यांनी खरिपासाठी बियाणे म्हणून राखून ठेवले, तर काहींनी भाव चांगला येईल या आशेने बाजारात विकायला आणले. पण ओलसरपणा आहे म्हणून कमी भावात मागणी केली जात असल्याची शेतकऱ्यांची व्यथा आहे. तसे पाहता शेतकऱ्यांचा शेतमाल निघताच ऐन हंगामात शेतमालाचे भाव व्यापाऱ्यांद्वारे पाडले जातात. आताही हरभऱ्याची शासकीय खरेदी बंद झाल्यानंतर बाजार समित्यांमध्ये आवक वाढली असता, २०० ते ३०० रुपयांपर्यंत प्रतिक्विंटलमागे भाव पाडल्याचे या आठवड्यात दिसून आले आहे.

जिल्ह्यात ५७८ हेक्टरमध्ये पेरा जिल्ह्यात ५७८ हेक्टरमध्ये उन्हाळी सोयाबीनची यंदा पेरणी झाली. यामध्ये सर्वाधिक २१३ हेक्टर क्षेत्र पेरा चांदूर रेल्वे तालुक्यात आहे. याशिवाय अमरावती १७, भातकुली ११, नांदगाव खंडेश्वर १००, तिवसा ६५, चांदूर बाजार १२, दर्यापूर ५, धारणी २ व चिखलदरा तालुक्यात ४ हेक्टरचा समावेश आहे.

ओलसरपणामुळे घसरला भावव्यापाऱ्यांद्वारा उन्हाळी सोयाबीनमध्ये ओलसरपणा असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रत्यक्षात ४२ ते ४४ अंश तापमानात एका दिवसात सोयाबीनमधील आर्द्रता निघून जात असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. फक्त भाव पाडण्यासाठी व्यापाऱ्यांद्वारे एक ना अनेक कारणे सांगण्यात येत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.

१० हजारांवरून सहा हजारांवर भाववर्षभरापूर्वी याच वेळेला सोयाबीनचा दर १० हजार रुपये क्विंंटलवर गेला होता व त्यानंतर दरामध्ये सातत्याने कमी येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात डीओसीला वाढती मागणी व सोयाबीन उत्पादनात देशांतर्गत कमी, याशिवाय अन्य कारणे आहेत, यंदा सोयाबीन व कापसाचे उत्पादन कमी झाल्याने वाढती मागणी आहे.

एक प्रयोग म्हणून पहिल्यांदा उन्हाळी सोयाबीनची पेरणी केली. उत्पादन खर्च कमी असल्याने पेरायला हरकत नाही. उष्णतेच्या लाटेमुळे शेंगा कमी लागल्याने उत्पन्नात कमी आलेली आहे. खरिपासाठी बियाणे म्हणून राखून ठेवले आहे.-अतुल चव्हाण, शेतकरी

आयात कर माफ केला असल्याने सोयाबीनच्या भावात काही प्रमाणात कमी आलेली आहे. त्यामुळे तेलाच्या भावातही घसरण झाली आहे. उन्हाळी सोयाबीनची प्रतवारी कमी आहे व जिल्ह्यात पेरणी क्षेत्रही कमी असल्याने फारसे विक्रीला येत नाही.-अमर बांबल, अडते

 

टॅग्स :market yardमार्केट यार्ड