शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याशिवाय माघार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:17 IST

मोर्शी (तालुका प्रतिनिधी) आज भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे मोर्शी येथे आगमन झाले असता कार्यकर्त्यांना संबोधित करताना ...

मोर्शी (तालुका प्रतिनिधी) आज भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे मोर्शी येथे आगमन झाले असता कार्यकर्त्यांना संबोधित करताना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलनाचा तसेच मंत्रालयापर्यंत ठिय्या देण्याची तयारी ठेवा, जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही, तोपर्यंत माघारी फिरणार नाही, असा निश्चय करण्याचा कानमंत्र भाजपा कार्यकर्त्यांना दिला.

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील महाराष्ट्र दौऱ्यावर असताना शुक्रवारी मोर्शी येथे जयस्तंभ चौकात त्यांनी भेट दिली. त्यावेळी हजारोंच्या संख्येत कार्यकर्त्यांनी फटाक्यांच्या आतषबाजीत, तर महिलांनी औक्षण करून व भाजपा भटक्या विमुक्त जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष कमलसिंह चितोडिया यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट देऊन चंद्रकांत पाटील यांचे स्वागत केले. यावेळी त्यांच्यासमवेत खासदार रामदास तडस, माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रताप अडसड, जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मनीष मेन, भटक्या विमुक्त जाती मोर्चा अध्यक्ष कमलसिंग चितोडीया, अधिवक्ता सेल अध्यक्ष जयंत ढोले उपस्थित होते. मोर्शीकरांना संबोधित करताना चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीचे वाभाडे काढले. कुणाचे नाव न घेता शिवसेनेने कसा विश्वासघात केला तेही सांगितले. तसेच महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांवर कसा अन्याय चालविला, याचा पाढाच वाचला. डॉ.अनिल बोंडे यांनी केलेल्या कामाची चंद्रकांत पाटील यांनी मुक्तकंठाने स्तुती केली. मोर्शी मतदारसंघात एवढे कार्य करणाऱ्या डॉ. बोंडे यांच्या पराभवाबाबत आश्चर्य व्यक्त केले. आताच्या सरकारने विदर्भातील संत्रा पिकाच्या पीक विमाबाबत वाढवलेली रक्कम कशी अन्यायकारक आहे, हेसुद्धा पटवून दिले. तसेच विदर्भातील संत्रा आणि मोसंबी याच्या गळती बाबत सरकारने कुठलीही मदत केली नाही तर आपल्या कृषी विभागामार्फत कुठल्याही प्रकारचे नियोजन केलेलं नाही. याबाबत त्यांनी सरकारचे वाभाडे काढले आणि महाविकास आघाडीने यापुढे शेतकऱ्यांच्या बाबतीत अशा प्रकारचे अन्यायकारक पाऊल उचलले तर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसावे प्रत्येक तहसीलवर आंदोलन करावे. तरीही सरकार जागे झाले नाही तर मुंबईला ठिय्या देऊ आणि जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळणार, नाही तोपर्यंत माघारी फिरणार नाही, असा निर्धार चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केला. कार्यक्रमाला भाजपा अध्यक्ष देव बुरंगे, शहराध्यक्ष रवी मेटकर, विधानसभा अध्यक्ष अजय आगरकर, नगरसेवक नितीन राऊत, अशोक ठाकरे, सुनील ढोले, मनोहर शेंडे, ज्योती प्रसाद मालविय, मनोज मोकलकर, उमेश कोंडे, शरद मोहोड, संजय गुलसे, सारंग खोडस्कर, सभापती विना बोबडे, यादव चोपडे, सुनील कडू, नीलेश शिरभाते, प्रमोदराव बोबडे, हरी गेडाम, गजानन मधपुरे, रमेश खातदेव, महिला आघाडीच्या लांजेवार, वर्षा काळमेघ, प्रभा फंदे, कल्पना पाखोडे, प्रतिभा राऊत, विद्या गेडाम, अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रवीण राऊत यांनी केले.