शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याशिवाय माघार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:17 IST

मोर्शी (तालुका प्रतिनिधी) आज भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे मोर्शी येथे आगमन झाले असता कार्यकर्त्यांना संबोधित करताना ...

मोर्शी (तालुका प्रतिनिधी) आज भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे मोर्शी येथे आगमन झाले असता कार्यकर्त्यांना संबोधित करताना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलनाचा तसेच मंत्रालयापर्यंत ठिय्या देण्याची तयारी ठेवा, जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही, तोपर्यंत माघारी फिरणार नाही, असा निश्चय करण्याचा कानमंत्र भाजपा कार्यकर्त्यांना दिला.

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील महाराष्ट्र दौऱ्यावर असताना शुक्रवारी मोर्शी येथे जयस्तंभ चौकात त्यांनी भेट दिली. त्यावेळी हजारोंच्या संख्येत कार्यकर्त्यांनी फटाक्यांच्या आतषबाजीत, तर महिलांनी औक्षण करून व भाजपा भटक्या विमुक्त जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष कमलसिंह चितोडिया यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट देऊन चंद्रकांत पाटील यांचे स्वागत केले. यावेळी त्यांच्यासमवेत खासदार रामदास तडस, माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रताप अडसड, जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मनीष मेन, भटक्या विमुक्त जाती मोर्चा अध्यक्ष कमलसिंग चितोडीया, अधिवक्ता सेल अध्यक्ष जयंत ढोले उपस्थित होते. मोर्शीकरांना संबोधित करताना चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीचे वाभाडे काढले. कुणाचे नाव न घेता शिवसेनेने कसा विश्वासघात केला तेही सांगितले. तसेच महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांवर कसा अन्याय चालविला, याचा पाढाच वाचला. डॉ.अनिल बोंडे यांनी केलेल्या कामाची चंद्रकांत पाटील यांनी मुक्तकंठाने स्तुती केली. मोर्शी मतदारसंघात एवढे कार्य करणाऱ्या डॉ. बोंडे यांच्या पराभवाबाबत आश्चर्य व्यक्त केले. आताच्या सरकारने विदर्भातील संत्रा पिकाच्या पीक विमाबाबत वाढवलेली रक्कम कशी अन्यायकारक आहे, हेसुद्धा पटवून दिले. तसेच विदर्भातील संत्रा आणि मोसंबी याच्या गळती बाबत सरकारने कुठलीही मदत केली नाही तर आपल्या कृषी विभागामार्फत कुठल्याही प्रकारचे नियोजन केलेलं नाही. याबाबत त्यांनी सरकारचे वाभाडे काढले आणि महाविकास आघाडीने यापुढे शेतकऱ्यांच्या बाबतीत अशा प्रकारचे अन्यायकारक पाऊल उचलले तर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसावे प्रत्येक तहसीलवर आंदोलन करावे. तरीही सरकार जागे झाले नाही तर मुंबईला ठिय्या देऊ आणि जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळणार, नाही तोपर्यंत माघारी फिरणार नाही, असा निर्धार चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केला. कार्यक्रमाला भाजपा अध्यक्ष देव बुरंगे, शहराध्यक्ष रवी मेटकर, विधानसभा अध्यक्ष अजय आगरकर, नगरसेवक नितीन राऊत, अशोक ठाकरे, सुनील ढोले, मनोहर शेंडे, ज्योती प्रसाद मालविय, मनोज मोकलकर, उमेश कोंडे, शरद मोहोड, संजय गुलसे, सारंग खोडस्कर, सभापती विना बोबडे, यादव चोपडे, सुनील कडू, नीलेश शिरभाते, प्रमोदराव बोबडे, हरी गेडाम, गजानन मधपुरे, रमेश खातदेव, महिला आघाडीच्या लांजेवार, वर्षा काळमेघ, प्रभा फंदे, कल्पना पाखोडे, प्रतिभा राऊत, विद्या गेडाम, अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रवीण राऊत यांनी केले.