शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याशिवाय माघार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:17 IST

मोर्शी (तालुका प्रतिनिधी) आज भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे मोर्शी येथे आगमन झाले असता कार्यकर्त्यांना संबोधित करताना ...

मोर्शी (तालुका प्रतिनिधी) आज भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे मोर्शी येथे आगमन झाले असता कार्यकर्त्यांना संबोधित करताना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलनाचा तसेच मंत्रालयापर्यंत ठिय्या देण्याची तयारी ठेवा, जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही, तोपर्यंत माघारी फिरणार नाही, असा निश्चय करण्याचा कानमंत्र भाजपा कार्यकर्त्यांना दिला.

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील महाराष्ट्र दौऱ्यावर असताना शुक्रवारी मोर्शी येथे जयस्तंभ चौकात त्यांनी भेट दिली. त्यावेळी हजारोंच्या संख्येत कार्यकर्त्यांनी फटाक्यांच्या आतषबाजीत, तर महिलांनी औक्षण करून व भाजपा भटक्या विमुक्त जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष कमलसिंह चितोडिया यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट देऊन चंद्रकांत पाटील यांचे स्वागत केले. यावेळी त्यांच्यासमवेत खासदार रामदास तडस, माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रताप अडसड, जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मनीष मेन, भटक्या विमुक्त जाती मोर्चा अध्यक्ष कमलसिंग चितोडीया, अधिवक्ता सेल अध्यक्ष जयंत ढोले उपस्थित होते. मोर्शीकरांना संबोधित करताना चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीचे वाभाडे काढले. कुणाचे नाव न घेता शिवसेनेने कसा विश्वासघात केला तेही सांगितले. तसेच महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांवर कसा अन्याय चालविला, याचा पाढाच वाचला. डॉ.अनिल बोंडे यांनी केलेल्या कामाची चंद्रकांत पाटील यांनी मुक्तकंठाने स्तुती केली. मोर्शी मतदारसंघात एवढे कार्य करणाऱ्या डॉ. बोंडे यांच्या पराभवाबाबत आश्चर्य व्यक्त केले. आताच्या सरकारने विदर्भातील संत्रा पिकाच्या पीक विमाबाबत वाढवलेली रक्कम कशी अन्यायकारक आहे, हेसुद्धा पटवून दिले. तसेच विदर्भातील संत्रा आणि मोसंबी याच्या गळती बाबत सरकारने कुठलीही मदत केली नाही तर आपल्या कृषी विभागामार्फत कुठल्याही प्रकारचे नियोजन केलेलं नाही. याबाबत त्यांनी सरकारचे वाभाडे काढले आणि महाविकास आघाडीने यापुढे शेतकऱ्यांच्या बाबतीत अशा प्रकारचे अन्यायकारक पाऊल उचलले तर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसावे प्रत्येक तहसीलवर आंदोलन करावे. तरीही सरकार जागे झाले नाही तर मुंबईला ठिय्या देऊ आणि जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळणार, नाही तोपर्यंत माघारी फिरणार नाही, असा निर्धार चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केला. कार्यक्रमाला भाजपा अध्यक्ष देव बुरंगे, शहराध्यक्ष रवी मेटकर, विधानसभा अध्यक्ष अजय आगरकर, नगरसेवक नितीन राऊत, अशोक ठाकरे, सुनील ढोले, मनोहर शेंडे, ज्योती प्रसाद मालविय, मनोज मोकलकर, उमेश कोंडे, शरद मोहोड, संजय गुलसे, सारंग खोडस्कर, सभापती विना बोबडे, यादव चोपडे, सुनील कडू, नीलेश शिरभाते, प्रमोदराव बोबडे, हरी गेडाम, गजानन मधपुरे, रमेश खातदेव, महिला आघाडीच्या लांजेवार, वर्षा काळमेघ, प्रभा फंदे, कल्पना पाखोडे, प्रतिभा राऊत, विद्या गेडाम, अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रवीण राऊत यांनी केले.