शहरं
Join us  
Trending Stories
1
MVA MNS Morcha Live: आजचा मोर्चा हा राग दाखवण्याचा, ताकद दाखवण्याचा मोर्चा: राज ठाकरे
2
जबरदस्त शक्तीप्रदर्शन होणार...! एकाचवेळी ५५ देश आपल्या युद्धनौका भारताच्या समुद्रात पाठविणार; नौदलाने हुंकार भरला...
3
8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय रे भाऊ? नवीन वेतन कसं ठरणार? जाणून घ्या
4
Retirement: स्टार खेळाडूनं चाहत्यांना दिला मोठा धक्का, अचानक केली निवृत्तीची घोषणा!
5
रोहित आर्याबाबत मोठा खुलासा! कोथरुडचा घरमालक उलटे १.७५ लाख द्यायला तयार झालेला; शेवटी...
6
"नरेंद्र मोदींची छाती ११२ इंचाची, अवघ्या ५ तासांत पूर्ण पाकिस्तानवर कब्जा केला असता, पण..."
7
पाच वर्षांत अफाट परतावा देणारे शेअर्स कोणते, गुंतवणूकदारांसाठी संकेत काय? तुमच्याकडे आहे का?
8
BCCI: "आणखी दोन-तीन दिवस वाट पाहू, जर ट्रॉफी परत मिळाली नाही तर...", बीसीसीआयची कडवी भूमिका
9
“मविआचे ३१ खासदार निवडून आले, तेव्हा मतचोरी झाली का”; भाजपाचा सवाल, राज ठाकरेंबद्दल म्हणाले... 
10
Andhra Pradesh Stampede: आंध्र प्रदेशच्या व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी; ९ भक्तांचा मृत्यू 
11
आज पुन्हा घसरलं सोनं-चांदी, लग्नसराईला सुरुवात होण्यापूर्वी किती स्वस्त झाला? पटापट चेक करा लेटेस्ट रेट
12
भारतानं मिळवलं दहशतवादावर नियंत्रण, २०१३ नंतर कुठेही मोठा दहशतवादी हल्ला नाही - अजित डोवाल
13
"७५ वर्षांत काश्मीर ताब्यात घेता आले नाही अन्..."; तालिबानने पाकिस्तानच्या दुखऱ्या बाजूवर मीठ रगडले....
14
'या' रेल्वे कंपनीला मुंबई मेट्रोकडून मिळालं २४८१ कोटी रुपयांचं काम, फोकसमध्ये राहणार शेअर्स
15
Mumbai Traffic Update: मनसेचा 'सत्याचा मोर्चा', मुंबईच्या वाहतुकीत बदल;  'या' भागांत रस्त्यांवर निर्बंध, पोलिसांच्या सूचना
16
Plastic Bans: महाराष्ट्राच्या शेजारी राज्याने प्लास्टिक वापराबाबत उचललं कठोर पाऊल!
17
केरळमध्ये आता कुणीही 'अत्यंत गरीब' नाही, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचा मोठा दावा
18
टेस्ला... सॅम अल्टमन बुक करून फसला; साडे सात वर्षे झाली डिलिव्हरीच मिळाली नाही, रिफंड तर...
19
शुक्र गोचर २०२५: २ नोव्हेंबर, कार्तिकीच्या मुहूर्तावर 'मालव्य' राजयोगात ५ राशींना धन-समृद्धी योग!
20
SSC-HSC Exam Dates: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षा २०२६ चे वेळापत्रक जाहीर; पहिला पेपर कधी?

नाफेड विक्रीसाठी शेतकरी वंचित; खरेदी-विक्री संघावर कारवाईची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 14:11 IST

Amravati : अनेकांनी सोयाबीन विक्रीला कागदपत्रे खरेदी-विक्री संस्थेकडे जमा केली होती

सुमित हरकुट लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर बाजार : तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्रीसाठी आवश्यक कागदपत्रे चांदूर बाजार खरेदी-विक्री संस्थेकडे जमा केली होती. मात्र, ही कागदपत्रे वेळेत ऑनलाइन करण्यात आली नाहीत. परिणामी, शेतकऱ्यांना बाजारभाव मिळण्यापासून वंचित राहावे लागले. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी संस्थेवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

खरेदी-विक्री संस्थेकडून नाफेड अंतर्गत सोयाबीन खरेदी करण्यात येत आहे. यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने आवारात जागा उपलब्ध केली. यासाठी तालुक्यातील रसुल्लापूर येथील शेतकरी अश्विन भेटाळू, नितीन भेटाळू व लीलाबाई भेटाळू यांनी १७ डिसेंबर २०२४ रोजी खरेदी-विक्री संस्थेकडे सर्व कागदपत्रे जमा केली होती. त्यांचा अनुक्रमे ८४७, ८४८, ८४९ असून, खरेदी-विक्री संस्थेने त्यांच्या पुढील शेतकऱ्यांचे ऑनलाइन करून माल खरेदी सुद्धा केला. याबाबत संबंधित शेतकऱ्यांनी सहकार राज्यमंत्री, जिल्हा निबंधक कार्यालय व सहायक निबंधक कार्यालयात तक्रार दाखल केली. याप्रकरणी जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी त्यांनी केले. १७ डिसेंबर २०२४ मध्ये खरेदी-विक्री संस्थेकडे सर्व कागदपत्रे जमा केली होती. परंतू संस्थेनी ऑनलाइन केल्याचा आरोप आहे.

कापसासारखेच ठेवावे लागणार का साठवून?शेतकऱ्यांच्या कपाशीला फेब्रुवारी महिना लागला तरी हे पीक घरातच पडून आहे. जास्त दिवस झाल्याने आता अंग खाजवायला सुरुवात झाली आहे. सोयाबीनचेही तेच होणार का, असा प्रश्न विचारला जात आहे. सुरुवातीच्या काळामध्ये पिकाला भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या घरातच सोयाबीन ठेवले होते. शासकीय खरेदी सुरू झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपल्या घरातील सोयाबीन हे विक्रीस काढले. परंतु नोंदणी होऊनही काहींना ते मुदतीत विकता आले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मार्केटमध्ये भाव नाही, नाफेडचे पोर्टल बंद झाले आहे. त्यामुळे घरातील सोयाबीनचे काय करावे, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

शेतकऱ्यांचे क्विंटलमागे हजार रुपयांचे नुकसानसरकारी हमीभाव सोयाबीनसाठी ४,५०० ते ५,००० रुपये प्रतिक्विंटल निश्चित करण्यात आला होता. मात्र, संस्थेच्या दिरंगाईमुळे अनेक शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांना केवळ ३,५०० ते ४,००० रुपये दराने सोयाबीन विक्री करावी लागली. यामुळे शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे. यामध्ये उत्पादन खर्चही पदरी पडत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली.

३०० शेतकरी वंचितस्थानिक खरेदी-विक्री संस्थेत नाफेड खरेदीची अंतिम तारीख ६ फेब्रुवारी रोजी संपली. जवळजवळ ३०० शेतकऱ्यांची नोंदणी झाली नसल्याची माहिती आहे

टॅग्स :Amravatiअमरावती