शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्याला फडणवीस,अजित पवारांचा विरोध होता"
2
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
3
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
4
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
5
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
6
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
7
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
8
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
9
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
10
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
11
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
12
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
13
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
14
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
15
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
16
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
17
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
18
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
19
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
20
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 

शेतकरीच बनले लाईनमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 4:12 AM

सिंचनाचा प्रश्न फोटो पी १८ चांदूर बाजार चांदूर बाजार : सध्या तालुक्यातील सिंचनाची व्यवस्था असलेल्या गावांमध्ये उन्हाळी पीक घेण्यात ...

सिंचनाचा प्रश्न

फोटो पी १८ चांदूर बाजार

चांदूर बाजार : सध्या तालुक्यातील सिंचनाची व्यवस्था असलेल्या गावांमध्ये उन्हाळी पीक घेण्यात येत आहे. लखलखत्या उन्हामुळे या पिकांना पाण्याची नितांत गरज असते. मात्र, विद्युत पुरवठ्यात वारंवार बिघाड होत असल्याने सिंचनात खंड पडत आहे. एकाच लाईनमनकडे अनेक गावांचा प्रभार असल्यामुळे शेतकऱ्यांनाच लाईनमन बनून रोहित्रचे बॉक्स हाताळावे लागत आहेत. प्रसंगी घातपात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तालुका कृषिप्रधान असून, सिंचनाची मुबलक व्यवस्था असल्याने तालुक्यात विविध प्रकारची पिके घेण्याकडे शेतकरी वळले आहेत. त्या अनुषंगाने अलीकडे कृषिक्षेत्रात प्रचंड स्पर्धा निर्माण झाली आहे. शासकीय स्तरावरून सिंचन विहिरी, विंधन विहिरी बेरोजगारीवर मात करण्यासाठी पर्याय ठरू लागल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सिंचनासाठी कृषिपंपांचा वापर करणे सुरू केले आहे. मात्र, एकाच लाईनमनकडे पाच गावांचा प्रभार असल्याने लावण्यात आलेल्या ट्रांसफाॅर्मरचे देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष होतं आहे. विद्युत वाहिनीत जराही ओव्हरलोड झाल्यास वारंवार फ्यूज उडणे ही समस्या नेहमीच होते. त्यामुळे सिंचन सुविधा प्रभावी होत आहे. रोहित्र बॉक्समधील फ्यूज गेल्यास वायरमन कधी येईल आणि कधी शेतकरी सिंचन करेल? यामुळे गरजेच्या वेळी रोहित्राचा बॉक्स शेतकरीच उघडून फ्यूज टाकणे, कार्बन आल्यास साफ करणे अशी अनेक कामे शेतकऱ्यांना स्वतः करावी लागतात.

शेतकऱ्यांना सिंचनासाठी विद्युत पुरवठा हा रात्री असल्याने लाईनमन वेळेवर कधीच उपलब्ध होत नाही. यामुळे अनेकदा शेतकऱ्यांना खुले रोहित्रे हाताळावे लागतात. या खुल्या रोहित्रामुळे जिवावर उदार होऊन वेळीच फ्यूज टाकून सिंचन सुविधा नियमित करावी लागते. या रोहित्राचे तुटलेले दरवाजे नेहमीच उघडे राहतात. अनेकदा येथील विद्युत जोडणीसुद्धा उघडी असते. यामुळे मोठी जीवितहानी होण्याची शक्यता आहे. तरीदेखील वेळेवर लाईनमन उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांनाच जीव मुठीत धरून सिंचनासाठी वीजपुरवठा सुरळीत करावा लागतो.

केवळ सिंचनासाठी

शेतकऱ्यांना फ्यूज बदलण्यासाठी कोणतेच प्रशिक्षण नाही. त्यामुळे सुरक्षा सुविधांची फारशी जाणीव नसते. अशावेळी घातपात झाल्यास मोबदला मिळत नाही. केवळ सिंचन व्यवस्था सुरळीत राहावी, या अनुषंगाने शेतकरी जिवावर उदार होऊन महावितरण कंपनीचे कार्य चोखपणे बजावत आहे. अशात अनेकदा शेतकऱ्यांना जीवसुद्धा गमवावा लागतो. महावितरण दरवर्षी मेंटेनन्सचा नावावर लाखो रुपयांची देयके काढतात. मात्र, शेतात असेलेल्या रोहित्र दुरुस्तीबाबत महावितरण विभाग नेहमीच उदासीन असतो. दरवर्षी लाखो रुपये खर्च करूनही शेतात मोठ्या प्रमाणात उघड्या असलेल्या विद्युत वाहिन्या, रोहित्र अद्यापही कायम आहेत. त्यामुळे महावितरण कंपनी मेंटेनन्स केवळ कागदावरच करीत असल्याचे शेतकरी वर्गातर्फे बोलले जात आहे.