शहरं
Join us  
Trending Stories
1
काय झालास तू? 'व्होट बँके'साठी महाभियोग प्रस्ताव आणल्याचा आरोप, ठाकरेंना अमित शाहांनी घेरले
2
नेहरू, इंदिरा गांधी अन् सोनिया गांधी...! अमित शाह यांनी थेट लोकसभेत दिली मत चोरीची 3 उदाहरणं, स्पष्टच बोलले
3
"त्यांच्यावर बोलायला मी रिकामा नाही"; राहुल गांधींच्या आरोपांची मुख्यमंत्री फडणवीसांनी उडवली खिल्ली
4
सीतामढी जिल्ह्यात 'HIV ब्लास्ट', आतापर्यंत 7400 HIV ग्रस्त आढळले? डॉक्टर म्हणाले, बाधितांनी निगेटिव्हसोबत लग्न करू नये
5
इस्रायली पंतप्रधानांचा PM मोदींना फोन, या संदर्भात व्यक्त केला आनंद; गाझावरही चर्चा
6
भरधाव ब्रेझा उभ्या असलेल्या वॅगनआरला धडकली, दोन्ही कारने घेतला पेट; 5 जणांचा मृत्यू
7
संस्थेची गाडी, हातात अर्ज अन् चर्चांना उधाण; तानाजी सावंतांच्या मुलाने भरला भाजपचा उमेदवारी अर्ज?
8
'उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाला वाचवताय का?'; मुंढवा जमीन घोटाळ्याच्या FIR वर हायकोर्टाचा पोलिसांना थेट सवाल
9
स्मृती मानधना लग्न मोडल्यावर पहिल्यांदाच सर्वांसमोर, 'तिला' पाहताच मारली मिठी... (VIDEO)
10
STवर ४ हजार कोटींचा आर्थिक भार, देणी कधीपर्यंत फेडणार?; प्रताप सरनाईकांनी तारीखच सांगितली
11
मार्गशीर्ष गुरुवार २०२५: लक्ष्मी देवीसह स्वामी सेवा करा; धनधान्य, वैभव, कालातीत कृपा लाभेल!
12
IND vs SA T20: संजू सॅमसनला Playing XI मध्ये का घेतलं नाही? माजी क्रिकेटरने सांगितलं 'लॉजिक'
13
समसप्तक वसुमान योगात कालाष्टमी २०२५: ६ राशींना धनलाभ योग, चौपट भरभराट; पण पैसे उसने देऊ नका!
14
अयोध्येच्या राम मंदिरात दर्शन घ्यायला केव्हा जाणार? अखिलेश यादव यांनी काय उत्तर दिलं पाहा
15
"काय बोलायचं ते मी ठरवेन, तुम्ही सांगू नका..."; अमित शाह-राहुल गांधींमध्ये लोकसभेत खडाजंगी
16
रोहित शर्मा नंबर १, विराट कोहली नंबर २ ... ताज्या ICC ODI क्रमवारीत टीम इंडियाचा धुमधडाका
17
“ज्यांनी लाडकी बहीण योजना आणली ते १ नंबरवरून दोनवर गेले”; जयंत पाटलांचा एकनाथ शिंदेंना टोला
18
चालत्या बसमधून उचलून २ महिने जेलमध्ये डांबलं; टॉपर विद्यार्थ्याला अडकवणारे पोलीस CCTV मुळे फसले
19
"EVM नव्हे, पंतप्रधान मोदी...!"; कंगना रनौतचा काँग्रेसवर जोरदार निशाणा, स्पष्टच बोलल्या
20
IPL 2026 Auction : मिनी लिलावाच्या फायनल यादीत घोळ! विराट-क्रिसचं नाव झालेले ‘गायब’, आता...
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्याची आत्महत्या; मृतदेह कलेक्ट्रेटमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 06:00 IST

सुधाकर महादेवराव पाटेकर (४७) असे मृत शेतकऱ्यांचे नाव आहे. ते नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सिद्धनाथपूर येथील रहिवासी आहेत. बुधवारी दुपारी २ च्या सुमारास त्यांनी विष प्राशन केले. त्यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले गेले. रात्री २ वाजता त्यांना मृत्यू झाला. सुधाकर पाटेकर यांच्या वडिलांना कर्करोग होता. त्यांनी आजारपणाला कंटाळून महिनाभरापूर्वी आत्महत्या केली.

ठळक मुद्देनांदगाव तालुक्यात उद्ध्वस्त खरिपाचा बळी : हातातोंडाचा घास निसर्गाने हिरावला; पंचनामे झाले नसल्याचा नातेवाईकांचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महिनाभरापूर्वी आई-वडिलांचे निधन झाले. त्यांच्या उपचारात तजवीज संपली. तीन एकरांतील सोयाबीनवर आशा असताना परतीच्या पावसाने तेही मातीमोल झाले. आतापर्यंतच्या संघर्षावर नैराश्याने मात केल्याने शेतकºयाने मृत्यूला कवटाळल्याची घटना नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सिद्धनाथपूर येथे बुधवारी घडली. गुरुवारी दुपारी नातेवाइकांनी मृतदेह जिल्हाधिकारी कार्यालयात आणला व उद्ध्वस्त खरिपाचा हा बळी असल्याचा आरोप करीत आर्थिक मदतीची मागणी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.सुधाकर महादेवराव पाटेकर (४७) असे मृत शेतकऱ्यांचे नाव आहे. ते नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सिद्धनाथपूर येथील रहिवासी आहेत. बुधवारी दुपारी २ च्या सुमारास त्यांनी विष प्राशन केले. त्यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले गेले. रात्री २ वाजता त्यांना मृत्यू झाला. सुधाकर पाटेकर यांच्या वडिलांना कर्करोग होता. त्यांनी आजारपणाला कंटाळून महिनाभरापूर्वी आत्महत्या केली. आई विमल पाटेकर यांचादेखील याच कालावधीत मृत्यू झाला. वडिलांचे आजारपण ते मृत्यू व नंतरचे सोपस्कार यामध्ये सुधाकर पाटेकर यांचा खर्च झाला. सततच्या नापिकीमुळे आर्थिक संकटात असलेल्या सुधाकर यांनी दोन लाखांचे कर्ज नातेवाइकांजवळून घेतले. महाराष्ट्र बँक व गावातील सेवा सहकारी सोसायटीचे पीक कर्ज आधीच डोक्यावर कायम आहे. अशा विपरीत परिस्थितीत अवकाळी पावसाने सोयाबीनचे मातेरे झाले. त्यामुळे सुधाकर यांचा धीर खचला व जगाव कसं, या विवंचनेत त्यांनी शेतात विषारी औषधाचे सेवन करून आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली व मुलगा आहे. त्यांचे भाऊ संतोष पाटेकर, जावई देविदास खाडे, शेजारी प्रशांत भागेवार, मोहन पवार, विजय पाटेकर आदींनी त्यांचा मृतदेह जिल्हाधिकारी कार्यालयात आणला व अप्पर जिल्हाधिकारी संजय पवार यांना निवेदन देऊन तत्काळ आर्थिक मदतीची मागणी केली. यावेळी पवार यांनी शासकीय निकषानुसार देय रक्कम देण्यात येईल, असे आश्वासन दिले.अपर जिल्हाधिकाºयांचे चौकशीचे आदेशपरतीच्या दहा दिवसांच्या पावसाने सुधाकर पाटेकर यांच्या तीन एकरातील सोयाबीन मातीमोल झाले. बाधित क्षेत्राचे अद्याप पंचनामे करण्यात न आल्याचा आरोप मृताच्या नातेवाइकांनी केला. यावर अप्पर जिल्हाधिकारी संजय पवार यांनी हा आरोप फेटाळत याविषयी तत्काळ चौकशीचे आदेश उपजिल्हाधिकारी (महसूल) स्रेहल कनिचे यांना दिले. आत्महत्याग्रस्त कुटुंबातील वारसाला मदत मिळावी याविषयी सकारात्मक अहवाल देण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.कृषिसमृद्ध पट्ट्यावर निसर्गाची अवकळानांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोणी ते धनज (बु.) या मार्गावर असलेल्या गावांना काळी माती, भरपूर भूअतंर्गत पाणी व बेंबळा नदीच्या पृष्ठभूमीमुळे समृद्धीचा वारसा लाभला आहे. तथापि, या वारशाला निसर्गानेच दृष्ट लावली आहे. गेल्या चार वर्षांपासून सातत्याने नापिकी होत आहे. यात या परिसरातील शेतकरी कसाबसा तरून गेला. तथापि, यंदा परतीच्या पावसाने शेतीचे होत्याचे नव्हते केले. जोडीला असलेली प्रशासकीय अनास्था शेतकºयांना हवालदिल करून गेली आहे.पंचनाम्यात नाव आहे किंवा नाही, याषियी खात्री करण्याचे निर्देश दिले. मृत शेतकºयाच्या कुटुंबास निकषानुसार मदत मिळेल. याविषयी सकारात्मक अहवाल देण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत.- संजय पवारअप्पर जिल्हाधिकारी

टॅग्स :FarmerशेतकरीDeathमृत्यू