शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

अमरावतीत 39 लाखांपैकी 53 हजार शेतक-यांनाच कर्जवाटप, बँकांना शासन हमी न दिल्याचा परिणाम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2017 15:08 IST

कर्जमाफी होईस्तोवर अडचणीतील शेतक-यांना तातडीच्या स्वरूपात १० हजारांचे कर्ज शासन हमीवर देण्याचे आदेश राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बँकांना दिले होते. मात्र तब्बल २४ दिवस शासन हमी बँकांना देण्यातच आली नसल्याने बँकांनी कर्जवाटपास ठेंगा दाखविला आहे

अमरावती, दि. 16- कर्जमाफी होईस्तोवर अडचणीतील शेतक-यांना तातडीच्या स्वरूपात १० हजारांचे कर्ज शासन हमीवर देण्याचे आदेश राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बँकांना दिले होते. मात्र तब्बल २४ दिवस शासन हमी बँकांना देण्यातच आली नसल्याने बँकांनी कर्जवाटपास ठेंगा दाखविला आहे. राज्यात पात्र ३८ लाख ९७ हजार ११९ शेतकरी खातेदारांपैकी केवळ ५२ हजार ९६१ शेतक-यांनाच ४२ कोटी ९६ लाखांचे तातडीच्या स्वरूपात १० हजारांचे कर्ज देण्यात आल्याचे वास्तव आहे.

अडचणीतील शेतक-यांना यंदाच्या खरिपासाठी अर्थसहाय्य व्हावे, यासाठी शासनाच्या हमीवर थकबाकीदार शेतक-यांना स्वयंघोषित शपथपत्र घेऊन तातडीच्या स्वरूपात १० हजारांचे कर्ज देण्याचे आदेश राज्य शासनाने १४ जूनला दिलेत. यातील काही निकषामध्ये सुधारणा करीत सुधारित आदेश २० जुनला दिलेत. मात्र राज्य शासनाची हमीच नसल्यामुळे एसएलबीसीव्दारा बँकांना निर्देशच देण्यात आलेले नव्हते. 

विशेष म्हणजे शेतक-यांची म्हणवणा-या जिल्हा बँकांनीदेखील शेतक-यांना १० हजारांचे कर्ज दिलेले नव्हते. अखेर एसएलबीसीने राष्ट्रीयीकृत बँकांना १० हजार रूपयांच्या कर्जाचे निर्देश दिलेत. मात्र बँकांनी गंभीरतेने न घेतल्यामुळे शेतक-यांना अडचणीच्या काळात कर्जवाटप झालेले नाही. हा सर्व बनवेगिरीचा प्रकार असल्याचा आरोप शहर, जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष किशोर बोरकर यांनी पत्रकाद्वारे केला आहे.

राज्यात ३० जुनअखेर ३८ लाख ९७ हजार ११९ शेतकरी खातेदार आहेत. मात्र बँकांव्दारा सहकार्य होत नसल्याने ६३ हजार २३ शेतकरी खातेदारांनी बँकांकडे अर्ज दाखल केले आहेत. यापैकी ६१ हजार ५४८ शेतकºयांचे ३० ऑगस्टअखेर अर्ज मंजूर करण्यात आले. प्रत्यक्षात बँकांनी ५२ हजार ९६९ शेतकºयांना ५२ कोटी ७७ लाख रूपयांचे कर्जवाटप केलेले आहेत.

जिल्हानिहाय झालेले कर्जवाटपठाणे जिल्ह्यात ९४८,पालघर ४३०, रायगड ८५८, सिंधुदुर्ग ६८, रत्नागिरी १२८, नाशिक ३४१, धुळे १९०, नंदूरबार ८२, तळेगाव ६४, अहमदनगर ५,४७६, पूणे २४९, सोलापूर ७५१, कोल्हापूर २८३. सांगली ५१६, सातारा १२६, औरंगाबाद १,९६९, जालना ३,४८१, परभणी २०,५६७, हिंगोली ३,२५६, बीड १,५२८, नांदेड ९८४, उस्मानाबद ९१६, लातूर १३७, बुलडाणा १,५०४, अकोला २८२, वाशिम ३४७, अमरावती २,२२३, यवतमाळ १,८०८, वर्धा १,२९३, नागपूर ७९२, भंडारा २१२, चंद्रपूर ६२२, गडचिरोली ३२६, गोंदिया ३०५, असे एकूण ५२ हजार ९६१ शेतक-यांनाच कर्जवाटप करण्यात आलेले आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरी