शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

अमरावतीत 39 लाखांपैकी 53 हजार शेतक-यांनाच कर्जवाटप, बँकांना शासन हमी न दिल्याचा परिणाम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2017 15:08 IST

कर्जमाफी होईस्तोवर अडचणीतील शेतक-यांना तातडीच्या स्वरूपात १० हजारांचे कर्ज शासन हमीवर देण्याचे आदेश राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बँकांना दिले होते. मात्र तब्बल २४ दिवस शासन हमी बँकांना देण्यातच आली नसल्याने बँकांनी कर्जवाटपास ठेंगा दाखविला आहे

अमरावती, दि. 16- कर्जमाफी होईस्तोवर अडचणीतील शेतक-यांना तातडीच्या स्वरूपात १० हजारांचे कर्ज शासन हमीवर देण्याचे आदेश राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बँकांना दिले होते. मात्र तब्बल २४ दिवस शासन हमी बँकांना देण्यातच आली नसल्याने बँकांनी कर्जवाटपास ठेंगा दाखविला आहे. राज्यात पात्र ३८ लाख ९७ हजार ११९ शेतकरी खातेदारांपैकी केवळ ५२ हजार ९६१ शेतक-यांनाच ४२ कोटी ९६ लाखांचे तातडीच्या स्वरूपात १० हजारांचे कर्ज देण्यात आल्याचे वास्तव आहे.

अडचणीतील शेतक-यांना यंदाच्या खरिपासाठी अर्थसहाय्य व्हावे, यासाठी शासनाच्या हमीवर थकबाकीदार शेतक-यांना स्वयंघोषित शपथपत्र घेऊन तातडीच्या स्वरूपात १० हजारांचे कर्ज देण्याचे आदेश राज्य शासनाने १४ जूनला दिलेत. यातील काही निकषामध्ये सुधारणा करीत सुधारित आदेश २० जुनला दिलेत. मात्र राज्य शासनाची हमीच नसल्यामुळे एसएलबीसीव्दारा बँकांना निर्देशच देण्यात आलेले नव्हते. 

विशेष म्हणजे शेतक-यांची म्हणवणा-या जिल्हा बँकांनीदेखील शेतक-यांना १० हजारांचे कर्ज दिलेले नव्हते. अखेर एसएलबीसीने राष्ट्रीयीकृत बँकांना १० हजार रूपयांच्या कर्जाचे निर्देश दिलेत. मात्र बँकांनी गंभीरतेने न घेतल्यामुळे शेतक-यांना अडचणीच्या काळात कर्जवाटप झालेले नाही. हा सर्व बनवेगिरीचा प्रकार असल्याचा आरोप शहर, जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष किशोर बोरकर यांनी पत्रकाद्वारे केला आहे.

राज्यात ३० जुनअखेर ३८ लाख ९७ हजार ११९ शेतकरी खातेदार आहेत. मात्र बँकांव्दारा सहकार्य होत नसल्याने ६३ हजार २३ शेतकरी खातेदारांनी बँकांकडे अर्ज दाखल केले आहेत. यापैकी ६१ हजार ५४८ शेतकºयांचे ३० ऑगस्टअखेर अर्ज मंजूर करण्यात आले. प्रत्यक्षात बँकांनी ५२ हजार ९६९ शेतकºयांना ५२ कोटी ७७ लाख रूपयांचे कर्जवाटप केलेले आहेत.

जिल्हानिहाय झालेले कर्जवाटपठाणे जिल्ह्यात ९४८,पालघर ४३०, रायगड ८५८, सिंधुदुर्ग ६८, रत्नागिरी १२८, नाशिक ३४१, धुळे १९०, नंदूरबार ८२, तळेगाव ६४, अहमदनगर ५,४७६, पूणे २४९, सोलापूर ७५१, कोल्हापूर २८३. सांगली ५१६, सातारा १२६, औरंगाबाद १,९६९, जालना ३,४८१, परभणी २०,५६७, हिंगोली ३,२५६, बीड १,५२८, नांदेड ९८४, उस्मानाबद ९१६, लातूर १३७, बुलडाणा १,५०४, अकोला २८२, वाशिम ३४७, अमरावती २,२२३, यवतमाळ १,८०८, वर्धा १,२९३, नागपूर ७९२, भंडारा २१२, चंद्रपूर ६२२, गडचिरोली ३२६, गोंदिया ३०५, असे एकूण ५२ हजार ९६१ शेतक-यांनाच कर्जवाटप करण्यात आलेले आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरी