शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
ठाकरे गटाला पुन्हा कोकणात मोठा धक्का; बडे पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा रामराम, भाजपात प्रवेश
5
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
6
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
7
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
8
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
9
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
10
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
11
मुंबई-पुण्यात घरं घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज! मालमत्ता विक्रीत ३०% घट; 'या' कारणामुळे किमती खाली येणार!
12
भयंकर! कर्ज फेडण्यासाठी, विम्याचे २ कोटी हडपण्यासाठी मित्राची केली हत्या, जिवंत जाळलं अन्...
13
अनिल अग्रवाल याच्या वेदांतानं भाजपला चार पट जास्त देणगी दिली, काँग्रेसच्या देणगीत मोठी घट, रिपोर्टमधून खुलासा
14
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
15
Karka Sankranti 2025 : कर्क संक्रांतीला 'या' पाच राशींच्या आयुष्यात होईल मोठे संक्रमण; येतील अच्छे दिन!
16
“एसटीचे कदापि खाजगीकरण होऊ देणार नाही”; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
17
निमिषा प्रियाची फाशी आता अटळ? ब्लड मनीसाठी ठाम नकार; सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं?
18
आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार
19
Ahilyanagar: पोलिसांना बघून धरणात मारल्या उड्या, एका चोराचा बुडून मृत्यू, तर दुसरा...
20
Astro Tips: बायपाससारख्या मोठ्या शस्त्रक्रीया होण्यामागे कारणीभूत असते 'ही' ग्रहस्थिती!

अमरावतीत 39 लाखांपैकी 53 हजार शेतक-यांनाच कर्जवाटप, बँकांना शासन हमी न दिल्याचा परिणाम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2017 15:08 IST

कर्जमाफी होईस्तोवर अडचणीतील शेतक-यांना तातडीच्या स्वरूपात १० हजारांचे कर्ज शासन हमीवर देण्याचे आदेश राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बँकांना दिले होते. मात्र तब्बल २४ दिवस शासन हमी बँकांना देण्यातच आली नसल्याने बँकांनी कर्जवाटपास ठेंगा दाखविला आहे

अमरावती, दि. 16- कर्जमाफी होईस्तोवर अडचणीतील शेतक-यांना तातडीच्या स्वरूपात १० हजारांचे कर्ज शासन हमीवर देण्याचे आदेश राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बँकांना दिले होते. मात्र तब्बल २४ दिवस शासन हमी बँकांना देण्यातच आली नसल्याने बँकांनी कर्जवाटपास ठेंगा दाखविला आहे. राज्यात पात्र ३८ लाख ९७ हजार ११९ शेतकरी खातेदारांपैकी केवळ ५२ हजार ९६१ शेतक-यांनाच ४२ कोटी ९६ लाखांचे तातडीच्या स्वरूपात १० हजारांचे कर्ज देण्यात आल्याचे वास्तव आहे.

अडचणीतील शेतक-यांना यंदाच्या खरिपासाठी अर्थसहाय्य व्हावे, यासाठी शासनाच्या हमीवर थकबाकीदार शेतक-यांना स्वयंघोषित शपथपत्र घेऊन तातडीच्या स्वरूपात १० हजारांचे कर्ज देण्याचे आदेश राज्य शासनाने १४ जूनला दिलेत. यातील काही निकषामध्ये सुधारणा करीत सुधारित आदेश २० जुनला दिलेत. मात्र राज्य शासनाची हमीच नसल्यामुळे एसएलबीसीव्दारा बँकांना निर्देशच देण्यात आलेले नव्हते. 

विशेष म्हणजे शेतक-यांची म्हणवणा-या जिल्हा बँकांनीदेखील शेतक-यांना १० हजारांचे कर्ज दिलेले नव्हते. अखेर एसएलबीसीने राष्ट्रीयीकृत बँकांना १० हजार रूपयांच्या कर्जाचे निर्देश दिलेत. मात्र बँकांनी गंभीरतेने न घेतल्यामुळे शेतक-यांना अडचणीच्या काळात कर्जवाटप झालेले नाही. हा सर्व बनवेगिरीचा प्रकार असल्याचा आरोप शहर, जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष किशोर बोरकर यांनी पत्रकाद्वारे केला आहे.

राज्यात ३० जुनअखेर ३८ लाख ९७ हजार ११९ शेतकरी खातेदार आहेत. मात्र बँकांव्दारा सहकार्य होत नसल्याने ६३ हजार २३ शेतकरी खातेदारांनी बँकांकडे अर्ज दाखल केले आहेत. यापैकी ६१ हजार ५४८ शेतकºयांचे ३० ऑगस्टअखेर अर्ज मंजूर करण्यात आले. प्रत्यक्षात बँकांनी ५२ हजार ९६९ शेतकºयांना ५२ कोटी ७७ लाख रूपयांचे कर्जवाटप केलेले आहेत.

जिल्हानिहाय झालेले कर्जवाटपठाणे जिल्ह्यात ९४८,पालघर ४३०, रायगड ८५८, सिंधुदुर्ग ६८, रत्नागिरी १२८, नाशिक ३४१, धुळे १९०, नंदूरबार ८२, तळेगाव ६४, अहमदनगर ५,४७६, पूणे २४९, सोलापूर ७५१, कोल्हापूर २८३. सांगली ५१६, सातारा १२६, औरंगाबाद १,९६९, जालना ३,४८१, परभणी २०,५६७, हिंगोली ३,२५६, बीड १,५२८, नांदेड ९८४, उस्मानाबद ९१६, लातूर १३७, बुलडाणा १,५०४, अकोला २८२, वाशिम ३४७, अमरावती २,२२३, यवतमाळ १,८०८, वर्धा १,२९३, नागपूर ७९२, भंडारा २१२, चंद्रपूर ६२२, गडचिरोली ३२६, गोंदिया ३०५, असे एकूण ५२ हजार ९६१ शेतक-यांनाच कर्जवाटप करण्यात आलेले आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरी