शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

तळेगावातील सुप्रसिद्ध शंकरपट होणार सुरू; बैलगाडा धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2021 13:50 IST

बंदीमुळे १५० वर्षांपासून सुरू असलेला शंकरपट इतिहासजमा होईल का, असा प्रश्न तळेगाववासीयांना भेडसावत होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने परवानगी देऊन बंदी उठवल्याने १५ जानेवारीला शंकरपट त्याच जल्लोषात भरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देन्यायालयाने बंदी उठवल्याने शंकरपटप्रेमी व गावकऱ्यांमध्ये आनंदोत्सव

नीलेश रामगावकर 

अमरावती : धामणगाव रेल्वे तालुक्यातील तळेगाव दशासर हे 'पटाचे तळेगाव' म्हणून पश्चिम विदर्भात ओळखले जाते. विदर्भात तळेगाव नावाची अनेक गावे आहेत. तरीही तळेगाव म्हटले की, पटाचे तळेगाव हे नाव प्रकर्षाने पुढे येते. त्याची ओळख पुसली जाते की काय, असे वाटत असताना गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने सर्शत परवानगी दिली व निर्णय घटनापीठाकडे सोपविला. या निर्णयामुळे गावात जल्लोष व्यक्त होत आहे.

शेतातील कामे हातावेगळी झाली की, मकरसंक्रांतीच्या दुसऱ्या दिवसापासून येथे शंकरपट जात होता. शंकरपट म्हणजे बैलजोड्यांची शर्यंत. परंतु, गेल्या सात वर्षांपासून शंकरपटावर घातलेल्या बंदीमुळे १५० वर्षांपासून सुरू असलेला शंकरपट इतिहासजमा होईल का, असा प्रश्न तळेगाववासीयांना भेडसावत होता. मात्र, गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने शंकरपटावरील सशर्त परवानगी देऊन बंदी उठवल्याने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे १५ जानेवारीला तळेगाव येथील १५० वर्षांची परंपरा असलेल्या शंकरपट त्याच जल्लोषात भरण्याची शक्यता व्यक्त होत आहे. न्यायालयाने परवानगी देत बंदी उठवली. या निर्णयामुळे तळेगावात आनंद व्यक्त होत आहे.

तळेगाव दशासर येथील हा पट शेतकऱ्यांसाठी तसेच गावकऱ्यांसाठी एक उत्सवच असतो. हा शंकरपट पाहण्याकरिता पंचक्रोशीतून लोक येत असतात. त्यामुळे येथील व्यवसायाला चालना मिळते, या शंकरपटात सुसाट वेगाने पळणारी रिंगी वजनाने अत्यंत हलकी असते. शर्यतीच्या धावपट्टीच्या बाजूने विशिष्ट अंतरावर दोन खांब असतात. व त्याला धागा बांधलेला असतो, पहिला धागा तोडला की, घड्याळ सुरू होते व दुसरा धागा तोडला की घड्याळ बंद पडते. त्या दोन धाग्यांमधून धावतानाच्या नेमक्या वेगाची या घड्याळात नोंद होते. जी जोडी कमी वेळात अंतर कापेल, ती जोडी विजयी ठरते, या शंकरपटासाठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आणून बैलजोड्या या स्पर्धेत खेळविल्या जातात आपल्या कोठ्यात दावणीच्या सर्जा-राजावर जिवापाड जपणारा शेतकरी बैलगाडा शर्यतीसाठी अक्षरशः वेडा होतो.

सर्वोच्च न्यायालयाने शंकरपटावरील बंदी उठवल्याने या निर्णयाचे स्वागतच आहे. शंकरपट हा शेतकऱ्यांसाठी एक प्रकारे उत्सव आहे. शंकरपट पूर्ववत सुरू होण्याने गावातील जनतेला आर्थिक चालना मिळेल.

- भरत लोया, प्रगतिशील शेतकरी, तळेगाव दशासर

टॅग्स :Bull Cart Raceबैलगाडी शर्यतSocialसामाजिकFarmerशेतकरीagricultureशेती