शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

चिखलदऱ्यातील गाविलगड किल्ल्याची पडझड, ऐतिहासिक नोंदीचे शोधकार्य नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 05:00 IST

ऐतिहासिक गाविलगड किल्ल्याला हजारो पर्यटक भेट देत असले तरी  पुरातत्त्व विभागाच्यावतीने आवश्यक त्या ऐतिहासिक नोंदी व माहिती देण्यासाठी कुठल्याही प्रकारचे शोधकार्य केले गेले नसल्याचे वास्तव आहे. या किल्ल्यावर एकीकडे भिंतीची डागडुजी करण्याचे काम पुरातत्त्व विभाग करीत असताना, किल्ल्यातील दुसऱ्या भागाची पडझड मात्र सुरूच आहे.

ठळक मुद्देअनेक वास्तू, भिंती कोसळू लागल्या ; व्याघ्र प्रकल्पाची नोटीस

  नरेंद्र जावरे    लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : ऐतिहासिक व विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा स्थित गाविलगड किल्ल्याची वाताहत होत असून, त्याला नामशेष होण्यापासून वाचवण्याची गरज आहे. गवळीगड ते गाविलगड अशी अनेक स्थित्यंतरे बघणाऱ्या या किल्ल्यात अनेक इतिहासकालीन स्मृती दडल्या आहेत. मात्र, कधी निधी, तर कधी व्याघ्र प्रकल्पाच्या जाचक अटींमध्ये किल्ल्याचे जतन थांबले आहे.ऐतिहासिक गाविलगड किल्ल्याला हजारो पर्यटक भेट देत असले तरी  पुरातत्त्व विभागाच्यावतीने आवश्यक त्या ऐतिहासिक नोंदी व माहिती देण्यासाठी कुठल्याही प्रकारचे शोधकार्य केले गेले नसल्याचे वास्तव आहे. या किल्ल्यावर एकीकडे भिंतीची डागडुजी करण्याचे काम पुरातत्त्व विभाग करीत असताना, किल्ल्यातील दुसऱ्या भागाची पडझड मात्र सुरूच आहे. महाराष्ट्रातील या महत्त्वाच्या किल्ल्याची ऐतिहासिक माहिती व योग्य जतन होत नसल्याने येणाऱ्या काही वर्षांत त्याची नोंद कागदावर राहण्याची भीती इतिहासतज्ज्ञ व पर्यटकांनी वर्तविली आहे. या किल्ल्ल्याला गवळीगड ते गाविलगड असा इतिहास असून, बहमनी, इंग्रज, भोसले, मोगल, राजा बेनिसिंग अशा राज्यकर्त्यांनी वऱ्हाडची राजधानी असलेल्या या किल्ल्यावर राज्य केले आहे. किल्ल्यात राजा बेनिसिंगसह अनेकांची समाधी आहे. झुडपी जंगलामुळे त्या झाकल्या आहेत. पुरातत्त्व विभागाच्यावतीने किल्ल्याचे ऐतिहासिक लिखाण करून फलक लावण्यात आले नसल्याने पर्यटकांना कुठल्याच प्रकारचा बोध होत नसल्याचे सत्य आहे.

ऐतिहासिक महत्त्वबाराव्या शतकात गवळीगड असलेल्या गाविलगड किल्ल्याची मुहूर्तमेढ इ.स. १४२५ मध्ये बहमनी शासक अहमदशहा वली यांनी रोवली. सर्वाधिक मोठ्या तोफा गाविलगड किल्ल्यात आहेत. २५ फूट लांब व ३२ टन वजनाच्या तोफा दुर्लक्षित आहेत. अनेक लहान तोफा बेपत्ता आहेत.  हैद्राबाद, अहमदनगर येथील पाथर्डी, माहूर व बैतूलच्या खेरला किल्ल्यावर नजर ठेवली जात होती.किल्ल्याच्या खालच्या भागात दारूगोळा बनवण्याचा कारखाना होता. किल्ल्याला मछली, वीरभान, शार्दुल व दिल्ली अशा दरवाजावर अत्यंत कोरीव व महत्त्वपूर्ण माहिती आहे. पुरातत्त्व विभागाचे यावर दुर्लक्ष आहे.किल्ल्यातील जुम्मा मशीद ही एकमेव वास्तू नामशेष होण्याच्या मार्गावर.

पाच वर्षांपासून डागडुजी, काम बंदपुरातत्त्व विभागाच्यावतीने पाच वर्षांपासून गाविलगड किल्ल्याचे काम संथगतीने सुरू आहे. त्यावर जवळपास दोन कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. पैकी एक कोटी रुपये खर्च झालेत. किल्ल्याच्या वास्तू वगळता वनजमिनीवरील कामाला मेळघाट व्याघ्र प्रकल्पाने ‘ब्रेक’ लावला आहे. झालेले काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप इतिहासतज्ज्ञांनी केला आहे.

इतिहासकालीन गाविलगड किल्ला नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. त्यातील वास्तू कोसळत आहेत. काम संथ गतीने सुरू आहे. किल्ल्याविषयीची ऐतिहासिक माहिती कुठेच लिहिण्यात आलेली नाही. पुरातत्त्व विभागाने योग्य दखल घेण्याची गरज आहे. अनिरुद्ध पाटील, इतिहासतज्ज्ञ 

गाविलगड किल्ल्याच्या कुठल्या कामाला बंद करण्याचे आदेश नाही. वनजमिनीवर विनापरवाना सुरू केलेले काम आवश्यक त्या परवानगी घेऊन करण्याचे आदेश दिले आहेत. - पीयूषा जगताप, उपवनसंरक्षक, मेळघाट वन्यजीव विभाग, परतवाडा

पर्यटकांसाठी आवश्यक सुविधांची कामे करण्यात आली.  त्यानंतर व्याघ्र प्रकल्पाच्या आदेशाने सहा महिन्यांपासून काम बंद आहे. दोन कोटींचा निधी शासनातर्फे मिळाला. पैकी एक कोटी रुपये खर्च झाले.मिलिंद अंगाईतकर, कंझर्व्हेशन अधिकारी, पुरातत्त्व विभाग

 

टॅग्स :ChikhaldaraचिखलदराFortगड