शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
4
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
5
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
6
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
7
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
8
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
9
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
10
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
11
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
12
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
13
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
14
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
15
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
16
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
17
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
18
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
19
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
20
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन

चिखलदऱ्यातील गाविलगड किल्ल्याची पडझड, ऐतिहासिक नोंदीचे शोधकार्य नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 05:00 IST

ऐतिहासिक गाविलगड किल्ल्याला हजारो पर्यटक भेट देत असले तरी  पुरातत्त्व विभागाच्यावतीने आवश्यक त्या ऐतिहासिक नोंदी व माहिती देण्यासाठी कुठल्याही प्रकारचे शोधकार्य केले गेले नसल्याचे वास्तव आहे. या किल्ल्यावर एकीकडे भिंतीची डागडुजी करण्याचे काम पुरातत्त्व विभाग करीत असताना, किल्ल्यातील दुसऱ्या भागाची पडझड मात्र सुरूच आहे.

ठळक मुद्देअनेक वास्तू, भिंती कोसळू लागल्या ; व्याघ्र प्रकल्पाची नोटीस

  नरेंद्र जावरे    लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : ऐतिहासिक व विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा स्थित गाविलगड किल्ल्याची वाताहत होत असून, त्याला नामशेष होण्यापासून वाचवण्याची गरज आहे. गवळीगड ते गाविलगड अशी अनेक स्थित्यंतरे बघणाऱ्या या किल्ल्यात अनेक इतिहासकालीन स्मृती दडल्या आहेत. मात्र, कधी निधी, तर कधी व्याघ्र प्रकल्पाच्या जाचक अटींमध्ये किल्ल्याचे जतन थांबले आहे.ऐतिहासिक गाविलगड किल्ल्याला हजारो पर्यटक भेट देत असले तरी  पुरातत्त्व विभागाच्यावतीने आवश्यक त्या ऐतिहासिक नोंदी व माहिती देण्यासाठी कुठल्याही प्रकारचे शोधकार्य केले गेले नसल्याचे वास्तव आहे. या किल्ल्यावर एकीकडे भिंतीची डागडुजी करण्याचे काम पुरातत्त्व विभाग करीत असताना, किल्ल्यातील दुसऱ्या भागाची पडझड मात्र सुरूच आहे. महाराष्ट्रातील या महत्त्वाच्या किल्ल्याची ऐतिहासिक माहिती व योग्य जतन होत नसल्याने येणाऱ्या काही वर्षांत त्याची नोंद कागदावर राहण्याची भीती इतिहासतज्ज्ञ व पर्यटकांनी वर्तविली आहे. या किल्ल्ल्याला गवळीगड ते गाविलगड असा इतिहास असून, बहमनी, इंग्रज, भोसले, मोगल, राजा बेनिसिंग अशा राज्यकर्त्यांनी वऱ्हाडची राजधानी असलेल्या या किल्ल्यावर राज्य केले आहे. किल्ल्यात राजा बेनिसिंगसह अनेकांची समाधी आहे. झुडपी जंगलामुळे त्या झाकल्या आहेत. पुरातत्त्व विभागाच्यावतीने किल्ल्याचे ऐतिहासिक लिखाण करून फलक लावण्यात आले नसल्याने पर्यटकांना कुठल्याच प्रकारचा बोध होत नसल्याचे सत्य आहे.

ऐतिहासिक महत्त्वबाराव्या शतकात गवळीगड असलेल्या गाविलगड किल्ल्याची मुहूर्तमेढ इ.स. १४२५ मध्ये बहमनी शासक अहमदशहा वली यांनी रोवली. सर्वाधिक मोठ्या तोफा गाविलगड किल्ल्यात आहेत. २५ फूट लांब व ३२ टन वजनाच्या तोफा दुर्लक्षित आहेत. अनेक लहान तोफा बेपत्ता आहेत.  हैद्राबाद, अहमदनगर येथील पाथर्डी, माहूर व बैतूलच्या खेरला किल्ल्यावर नजर ठेवली जात होती.किल्ल्याच्या खालच्या भागात दारूगोळा बनवण्याचा कारखाना होता. किल्ल्याला मछली, वीरभान, शार्दुल व दिल्ली अशा दरवाजावर अत्यंत कोरीव व महत्त्वपूर्ण माहिती आहे. पुरातत्त्व विभागाचे यावर दुर्लक्ष आहे.किल्ल्यातील जुम्मा मशीद ही एकमेव वास्तू नामशेष होण्याच्या मार्गावर.

पाच वर्षांपासून डागडुजी, काम बंदपुरातत्त्व विभागाच्यावतीने पाच वर्षांपासून गाविलगड किल्ल्याचे काम संथगतीने सुरू आहे. त्यावर जवळपास दोन कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. पैकी एक कोटी रुपये खर्च झालेत. किल्ल्याच्या वास्तू वगळता वनजमिनीवरील कामाला मेळघाट व्याघ्र प्रकल्पाने ‘ब्रेक’ लावला आहे. झालेले काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप इतिहासतज्ज्ञांनी केला आहे.

इतिहासकालीन गाविलगड किल्ला नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. त्यातील वास्तू कोसळत आहेत. काम संथ गतीने सुरू आहे. किल्ल्याविषयीची ऐतिहासिक माहिती कुठेच लिहिण्यात आलेली नाही. पुरातत्त्व विभागाने योग्य दखल घेण्याची गरज आहे. अनिरुद्ध पाटील, इतिहासतज्ज्ञ 

गाविलगड किल्ल्याच्या कुठल्या कामाला बंद करण्याचे आदेश नाही. वनजमिनीवर विनापरवाना सुरू केलेले काम आवश्यक त्या परवानगी घेऊन करण्याचे आदेश दिले आहेत. - पीयूषा जगताप, उपवनसंरक्षक, मेळघाट वन्यजीव विभाग, परतवाडा

पर्यटकांसाठी आवश्यक सुविधांची कामे करण्यात आली.  त्यानंतर व्याघ्र प्रकल्पाच्या आदेशाने सहा महिन्यांपासून काम बंद आहे. दोन कोटींचा निधी शासनातर्फे मिळाला. पैकी एक कोटी रुपये खर्च झाले.मिलिंद अंगाईतकर, कंझर्व्हेशन अधिकारी, पुरातत्त्व विभाग

 

टॅग्स :ChikhaldaraचिखलदराFortगड