शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

शोषित महिलांनी प्रतिसंस्कृतीची निर्मिती केली पाहिजे : हेमलता महिश्वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2022 14:25 IST

भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही स्रीला दुय्यम समजणारी, तिचं अस्तित्वच नाकारणारी, धार्मिक बंधनांनी गुलाम म्हणून वागवणारी संस्कृती इथे अजूनही नांदत असल्याचे आंबेडकरी विचारवंत हेमलता महिश्वर म्हणाल्या.

ठळक मुद्दे तिसरे आंबेडकरी महिला साहित्य संमेलनसेरींग डोल्मा, वृंदा साखरकर, छायाताई खोब्रागडे, डॉ. पुष्पा थोरात यांची उपस्थिती

अमरावती : समकाळात कार्यरत असलेल्या परंपरावादी संस्कृती नाकारून नव्या प्रतिसंस्कृतीची निर्मिती केली पाहिजे आणि ती आंबेडकरी महिलाच मोठ्या जबाबदारीने करु शकते असे आश्वासक प्रतिपादन आंबेडकरी विचारवंत हेमलता महिश्वर यांनी केले.

आशय या संस्थेच्या वतीने शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संस्कार भवन, भीमटेकडी परीसरात अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य आणि संस्कृती संवर्धन महामंडळाच्या तिसऱ्या अखिल भारतीय महिला आंबेडकरी साहित्य संमेलनाचे उद्घाटन हेमलता महिश्वर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या.

भारतीय समाजव्यवस्थेने सतत स्त्रियांना दुय्यम स्थान दिले आहे. यासंबंधी अनेकवेळा जनजागृतीचे कार्यक्रम झाले, विविध आंदोलने झाली आहेत. स्रीवादी चळवळींनी  पुरुष आणि स्त्रियांमधीलसुद्धा पुरुषी मानसिकता बदलविण्याकरीता अटोकाट प्रयत्न केले आहेत. परंतु भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही स्रीला दुय्यम समजणारी, तिचं अस्तित्वच नाकारणारी, धार्मिक बंधनांनी गुलाम म्हणून वागवणारी संस्कृती इथे अजूनही नांदत असल्याचे त्या म्हणाल्या. 

माणसाच्या भावनिकतेला फुंकर घालून निर्माण होणारी धार्मिक तेढ ही राजसत्तेला खतपाणी घालीत आहे. ते भाषा आणि संस्कृतीवर हल्ले चढवून त्यांना त्यांची संस्कृती आपल्यावर लादायची आहे. त्यामुळे आपणही त्याचा प्रतिकार करीत बालकांना आणि महिलांना तयार केले पाहिजे, असेही त्या म्हणाल्या. 

बालकांमध्ये अनुकरण आणि अनुसरण प्रवृत्ती असते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आंबेडकरी बाल साहित्याची निर्मिती झाली पाहिजे. पाली भाषा देशातील सर्व विद्यापीठांमध्ये शिकवायला हवा. संविधानाच्या आठव्या अनुसूचित समावेश करण्यात यावा अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी तिबेटच्या सेरींग डोल्मा, वृंदा साखरकर (अमेरिका), अमरावती विद्यापीठाचे माजी परीक्षा नियंत्रक डॉ. बी. आर. वाघमारे, अशोक बुरबुरे, छायाताई खोब्रागडे, स्वागताध्यक्ष डॉ. पुष्पा थोरात, प्रशांत वंजारे यांची उपस्थिती होती.

पुरुषांच्या मानसिकतेत बदल हवा - सेरींग डोल्मा

तिसऱ्या अखिल भारतीय महिला आंबेडकरी साहित्य संमेलनात बोलताना तिबेटी महिला असोसिएशनच्या प्रवक्त्या सेरींग डोल्मा म्हणाल्या की भारतात पुरुषांच्या बरोबरीने महिलांना ठेवण्यासाठी त्यांच्या मानसिकतेत मूलगामी बदल होणे गरजेचे आहे. आपण स्री आणि पुरुषांनी वेगळा विचार करणे धोक्याचे आहे. आमच्या तिबेटमध्ये जगणे कठीण झाले आहे. अनेकांची सरेआम कत्तल झाली आहे. आमच्या तिबेटमधील स्वातंत्र्याची चळवळ आम्ही भारतात राहून चालवित आहोत. आमच्या महिलांना साथ देण्यासाठी इथल्या आंबेडकरी महिलांनी पुढे आले पाहिजे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

टॅग्स :SocialसामाजिकAmravatiअमरावतीDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरliteratureसाहित्य