शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कला शाखेच्या शेतकरीपुत्रांनाच परीक्षा शुल्कमाफी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2020 18:38 IST

विज्ञान, वाणिज्य शाखेचे विद्यार्थी वगळले : ‘क्यार’, ‘महा’ चक्रीवादळात पिकांचे नुकसान; उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे परिपत्रक

अमरावती - राज्यात ऑक्टोबर, नोव्हेंबर २०१९ मध्ये आलेल्या ‘क्यार’ व ‘महा’ चक्रीवादळामुळे पिकांचे नुकसान झेलणाऱ्या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पाल्यांना परीक्षा शुल्कमाफीचा निर्णय घेण्यात आला. मात्र, यात केवळ कला महाविद्यालयात प्रवेशित विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफीचा लाभ मिळणार आहे. उर्वरित अन्य शाखांमधील पात्र शेतकरीपुत्रांना शुल्कमाफी मिळणार नसल्याचे परिपत्रक २१ जानेवारी २०२० रोजी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने जारी केले. हा विद्यार्थ्यांमध्ये भेद निर्माण करणारा निर्णय असल्याची भावना व्यक्त होत आहे.

राज्यात ३४ जिल्ह्यांतील ३२५ तालुक्यांमध्ये पारंपरिक व बहुवार्षिक पिकांचे नुकसान झाले होते. यात आपद्ग्रस्तांना विशेष दराने मदत देण्याबाबत आणि विविध सवलती लागू करण्याचा निर्णय महसूल व वन विभागांकडून १८ नोव्हेंबर २०१९ रोजी जारी करण्यात आला. या शासननिर्णयान्वये पिकांचे नुकसान झालेल्या शेतकºयांच्या पाल्यांना शाळा-महाविद्यालयांच्या परीक्षा शुल्कमाफीचा निर्णय झाला. त्याअनुषंगाने कला संचालनालयाच्या नियंत्रणातील कला महाविद्यालयांतील पात्र विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफी सवलत देण्याचे आदेश विद्यापीठ तसेच कला संचालनालयास देण्यात आले आहे. याचा लाभ सन २०१९-२०२० या शैक्षणिक वर्षात प्रवेशित विद्यार्थ्यांना मिळेल. शासन परिपत्रकानुसार ज्या विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क आकारले असेल, त्यांना संबंधित संस्थांकडून परत करावे लागणार आहे. ही सवलत केवळ आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी लागू राहील. 

छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती  योजनेखाली शिष्यवृत्तीासाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना ५० टक्के परीक्षा शुल्कमाफी मिळेल. या योजनेत पात्र रकमेची मागणी महाविद्यालयांनी विद्यापीठ अथवा कला संचालनालयाकडे करावी, असे नमूद केले आहे. 

शासन परिपत्रकाचे काटेकोरपणे पालन केले जाईल. यात जे शेतकरीपुत्र विद्यार्थी पात्र असतील, त्यांना परीक्षा शुल्कमाफीचा लाभ दिला जाईल.

- केशव तुपे, सहसंचालक, उच्च व तंत्र शिक्षण अमरावती 

टॅग्स :examपरीक्षाAmravatiअमरावतीFarmerशेतकरीStudentविद्यार्थी