शहरं
Join us  
Trending Stories
1
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
2
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
3
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
4
तोंडात कुरकुरे अन् निपचित पडलेला मृतदेह; कोर्टातून फरार झालेल्या आरोपीचा चिमुकलीवर अत्याचार
5
मुंबई-पुण्यात घरांच्या विक्रीत १७% घट; 'या' कारणांमुळे ग्राहकांनी फिरवली पाठ; किमती कमी होणार का?
6
‘आयुष्मान भारत’ योजना बंद पडली? नागपूरच्या रुग्णालयांमध्ये उघडकीस आले धक्कादायक वास्तव; रुग्णांना सेवा नाकारल्या
7
Video - "देवाने हे नियम बनवले नाहीत..."; शॉर्ट्स घालून महिलेने मंदिरात प्रवेश केल्याने मोठा गोंधळ
8
VIDEO: 'पॉवर हिटिंग'! ३ वर्षांच्या चिमुरड्याची बॅटिंग पाहून तुम्हीही म्हणाल- What a Shot!
9
मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना...
10
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
11
कोजागरी शरद पौर्णिमा २०२५: पंचकाची अशुभ छाया अन् अमंगल काळ, शुभ मुहूर्त कधी? लक्ष्मी लाभेल!
12
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
13
Dombivli Crime: मोबाईलचा पासवर्ड बदलला, कुटुंबात राडा! आई, दोन्ही मुले, आजोबामध्ये तुंबळ हाणामारी
14
अमानुष! लेकीशी भांडण... सासरच्यांनी जावयाला विष पाजलं, पळवून पळवून मारलं; झाला मृत्यू
15
२०२७ पर्यंत ५ राशींना साडेसाती, प्रदोषात ‘हे’ करावे; पंचक कायमचे टळेल, शनि शुभ-कल्याण करेल!
16
आंध्र प्रदेशात देवरगट्टू बन्नी उत्सवादरम्यान दोन जणांचा मृत्यू, ९० जण जखमी
17
Video: छातीत झाडल्या तीन गोळ्या, मित्राच्या हत्येचा बनवला व्हिडीओ; पोलिसांची उडाली झोप
18
हव्वा अन् धुव्वा...! महिंद्रा थार फेसलिफ्ट लाँच! हे दोन मुख्य बदल, ग्राहकांची मागणी ऐकली..., दोन नवे रंग...
19
Crime: 'मी तुमच्या मुलीची हत्या केलीये'; मित्रासोबत रुमवर गेली अन् निळ्यामध्ये ड्रममध्ये...; तरुणीची हत्या का केली?
20
Neena Kulkarni: ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना मानाचे विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर!

विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणात समस्यांचा ‘एरर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 05:01 IST

नवीन शैक्षणिक वर्ष २६ जूनपासून सुरू झाले. मात्र, त्यापूर्वीच कोरोनाचा शिरकाव झाला. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणासाठी शिक्षण विभागासह विविध शाळांनी स्थानिक पातळीवर तयारी केली आहे. झूम अ‍ॅपच्या माध्यमातून शिक्षण विभाग शाळांना विद्यार्थ्यांची तयारी करून घेण्याविषयी मार्गदर्शन करीत आहे. त्यानुसार जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याविषयी जिल्हा परिषद, पंचायत समिती स्तरावर नियोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देगावखेड्याचे चित्र; विविध अडचणींचा सामना

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती/भातकुली : शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये, यासाठी ग्रामीण भागातील काही शाळांच्या शिक्षकांनी व्हॉट्सअ‍ॅप गु्रप तयार करून शिक्षण देणे सुरू केले आहे. ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिकणाऱ्या शेतमजूर, शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी कुठल्याही प्रकारची व्यवस्था अद्याप झालेली नाही. अनेक ठिकाणी मोबाईल रेंज, संगणकाचा अभाव, वीजपुरवठा वेळोवेळी खंडित होणे अशा विविध अडचणींना समोरे जावे लागत आहे. याशिवाय ऑनलाईन शिक्षणामुळे पालकांनाही आर्थिक भार सोसावा लागत आहे.नवीन शैक्षणिक वर्ष २६ जूनपासून सुरू झाले. मात्र, त्यापूर्वीच कोरोनाचा शिरकाव झाला. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणासाठी शिक्षण विभागासह विविध शाळांनी स्थानिक पातळीवर तयारी केली आहे. झूम अ‍ॅपच्या माध्यमातून शिक्षण विभाग शाळांना विद्यार्थ्यांची तयारी करून घेण्याविषयी मार्गदर्शन करीत आहे. त्यानुसार जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याविषयी जिल्हा परिषद, पंचायत समिती स्तरावर नियोजन करण्यात आले आहे. शाळा सुरू झाल्यानंतर काय खबरदारी घ्यावी, विद्यार्थ्यांची सुरक्षा कशी करायची, पालकांचे प्रबोधन कसे करायचे, असा विविधांगी विचार-विनिमय सध्या सुरू आहे.शहरी भागासह ग्रामीण भागात इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत. या शाळांमध्ये शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांमध्ये विविध घटकांतील पाल्यांचा समावेश आहे. शालेय विद्यार्थ्यांची दहावी ते बारावी वर्गापासून भविष्याची वाटचाल सुरू होते. ग्रामीण भागात जास्तीत जास्त शेतमजूर, शेतकरी वर्गातील मुले, मुली आहेत. त्यांनीदेखील सावलीतील नोकरी करावी, अशी पालकांची इच्छा असते. त्यामुळे ग्रामीण भागातही पालक आपल्या पाल्यांना चांगले शिक्षण मिळावे व तो एक चांगला शासकीय अधिकारी, कर्मचारी व्हावा, अशी अपेक्षा प्रत्येक पालकाला आहे. अशातच यंदा कोरोना महामारीच्या संकटामुळे मागील तीन महिन्यांपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. तेव्हापासून शाळा-महाविद्यालये बंद आहेत. अशातच आता लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिली असली तरी अद्यापही शाळा-महाविद्यालये सुरू झालेली नाहीत. परिणामी शहरासह ग्रामीण भागातील अनेक शाळा विद्यार्थ्यांना व्हॉटसअ‍ॅप, झूमअ‍ॅपद्वारे मोबाइलवर शिक्षणाचे धडे देत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण सध्या मोबाईलवर सुरू आहे. या शिक्षणासाठी शेतकरी, शेतमजूर व अन्य पालकांना मोबाईल रिचार्जच्या खर्चाचा भारही सोसावा लागत आहे. या खर्चानंतरही अनेक गावात मोबाईलची रेंज मिळत नाही. मोबाईल बॅटरी डिस्चार्ज झाली, तर चार्जिंगसाठी वीजपुरवठा नसतो. याचवेळी आॅनलाईन शिक्षणाचा वर्ग असतो. यासारख्या अडचणींमुळे पाल्य यात सहभागी होऊ शकत नाही.अनेक अडचणीअनेक शाळा व्हॉट्सअ‍ॅप, झूम अ‍ॅपवर विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत. मात्र, ग्रामीण भागात फारच वेगळी परिस्थिती आहे. संगणक, इंटरनेट, मोबाईल उपलब्ध नसल्याने आॅनलाइन शिक्षण देणे अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे यावर योग्य पर्याय शोधणे आवश्यक आहे. गरिबांवर खर्चाचाही भार पडत असल्याचे पालक जयकृष्ण सहारे यांनी सांगितले.

टॅग्स :Educationशिक्षणonlineऑनलाइन