शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

शहरांचे पर्यावरण ठेवणार सुरक्षित, संवेदनशील क्षेत्रांचे होणार सॅटेलाईट मॅपिंग, भौगोलिक माहिती प्रणाली लागू

By गणेश वासनिक | Updated: December 27, 2022 18:00 IST

Maharashtra News: महानगरपालिका, प्राधिकरणे, नगरपरिषदांमध्ये विकास जलदगतीने व नियोजन पूर्ण करण्याकरिता शासनाने आराखडा हाती घेतला असून भौगोलिक माहिती प्रणालीने (जीआयएस) हा आराखडा तयार केला जाणार आहे

- गणेश वासनिक अमरावती : महानगरपालिका, प्राधिकरणे, नगरपरिषदांमध्ये विकास जलदगतीने व नियोजन पूर्ण करण्याकरिता शासनाने आराखडा हाती घेतला असून भौगोलिक माहिती प्रणालीने (जीआयएस) हा आराखडा तयार केला जाणार आहे. यात पर्यावरण, वनक्षेत्र, वन्यजीवांची काळजी घेण्यात येणार आहे. या नव्या प्रणालीद्वारे शहरातील पर्यावरण क्षेत्र अबाधित ठेवले जाणार आहे.

राज्याच्या नगर विकास विभागाने २९ नोव्हेंबर २०२२ राेजी महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम १५४ अन्वये महापालिका, विशेष नियोजन प्राधिकरणे, नगरपरिषद, नगरपंचायतींच्या क्षेत्रासाठीचा विकास योजना या जीआयएस प्रणाली वापरून द्रुतगती पद्धतीने तयार केला जाणार आहे. महानगरांची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. शहरे अपुरे पडत असल्याने शासकीय जमिनीवर अतिक्रमणे वाढली आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेचा विकास आराखडा थातुर मातुर असल्याने शहरांचा श्वास गुदमरत आहे. शहर सुंदर आणि सुटसुटीत असावे, याकरिता जिल्हाधिकारी व भूमी अभिलेखमार्फत हे जीआयएस सर्वेक्षण करण्यात येणार आहे.बेस मॅप तयार करणारमहानगरपालिका, नगर परिषद अशा ठिकाणचे भूमी अभिलेख विभाग गाव, नकाशे हे जीआयएसने रेफरन्स उपलब्ध करुन घेतील. दोन्ही नकाशे सुसंगत करण्यात येईल. यासाठी जमाबंद आयुक्त, पुणे खात्री करतील. शिवाय हा रिझोल्युशन ड्रोनद्वारे रेफरसिंग, जीआयएस पद्धतीने कॅडस्टूल नकाशा अद्ययावत करुन बेसमॅप तयार करण्यात येणार आहे.असे होणार ३३ प्रकारचे सर्वेक्षण बेस मॅप, सॅटेलाईट ईमेज, झोनल मास्टर प्लॅन, सब- झोन मास्टर प्लॅन, टुरिझम मास्टर प्लॅन, अधिसूचित वन विभाग, वन सदृश्य क्षेत्र, वृक्ष आणि वनसंपत्ती, जलस्त्रोत्र, गावठाण व मानवी वस्त्या, २० अंश पेक्षा जास्त उतार क्षेत्र, पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र, वन्यजीव, वारसा जतन स्थळे, प्रेक्षणीय स्थळे, घन कचरा व्यवस्थापन, कचरा साठवण स्थळ, मैलाशुद्धीकरण प्रकल्प, टाकाऊ पदार्थ गोळा करण्याचे स्थळ, पर्जन्यमान, हवामान खाते, व्याघ्र प्रकल्प राखीव क्षेत्र, बफर झोन, रस्त्याचे जाळे, रिंग रोड, वर्गिकृत रस्ते, अग्निप्रवण क्षेत्र, एनजीओ व तज्ञ्जांची बैठक, खनीकर्म स्थळ, पवनचक्की, भूजल सारणी, पायाभूत सुविधा प्रकल्प, उच्चदाब विद्युत वाहिनीचे जाळे, पिण्याच्या पाण्याची सुविधा, भूकंप पूर, जमीन खचणे, मोबाईल टॉवर्स, गावनिहाय ईंधन वापरचा सर्वेक्षणात समावेश असणार आहे. 

टॅग्स :AmravatiअमरावतीGovernmentसरकार