शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती तालुक्यातील नाव दुर्घटनेतील अकराही मृतदेह सापडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 18:34 IST

Amravati News श्रीक्षेत्र झुंज येथे १४ सप्टेंबर रोजी वर्धा नदीच्या पात्रात नाव उलटून एकूण ११ जण बुडाले होते. त्यातील तीन मृतदेह घटनेच्या दिवशीच सापडले होते, उर्वरित आठ मृतदेह गुरुवारी सापडले आहेत.

ठळक मुद्देमटरे, खंडाळे, शिवणकर, वाघमारे कुटुंबीयांचा आकांत गगनभेदी

लोकमत न्यूज नेटवर्क

अमरावती : तालुक्यातील श्रीक्षेत्र झुंज येथे १४ सप्टेंबर रोजी वर्धा नदीच्या पात्रात नाव उलटून एकूण ११ जण बुडाले होते. त्यातील तीन मृतदेह घटनेच्या दिवशीच सापडले होते, उर्वरित आठ मृतदेह गुरुवारी सापडले आहेत. सर्व मृतदेह गवसल्याने शोधकार्य थांबविण्यात आले. घटनेच्या दिवसापासून राष्ट्रीय आपत्ती निवारण दल, राज्य आपत्ती निवारण दलाची पथके तसेच जिल्हा शोध व बचाव पथक घटनास्थळी अविरत मदतकार्य करीत होते. (Eleven bodies were found in a boat accident in Amravati taluka)

             मृतांमध्ये नारायण भोमाजी मटरे (५९), किरण विजय खंडाळे (२८), वंशिका प्रदीप शिवणकर (२), मोनाली उर्फ मोहनी सुखदेव खंडाळे (११), अदिती सुखदेव खंडाळे (१३), निशा नारायण मटरे (२२), पीयूष तुळशीदास मटरे (८), अतुल गणेश वाघमारे (२५), वृषाली अतुल वाघमारे (१९), अश्विनी अमर खंडाळे (२५), पूनम प्रदीप शिवणकर (२४) यांचा समावेश आहे.

             घटनेच्या दिवशी श्याम मनोहर मटरे (२५) व राजकुमार रामदास उईके (४५) हे दोघे नदीतून पोहत बाहेर आल्याची माहिती मोर्शीचे उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले यांनी दिली. मृतांच्या नातेवाईकांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व मुख्यमंत्री साहाय्यता निधीच्या माध्यमातून तात्काळ मदत मिळावी, यासाठी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी नुकतेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून निवेदन दिले. दुर्घटनाग्रस्तांच्या नातेवाईकांना शासनाकडून निश्चितच मदत दिली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.

२२ दिवसात संसार उद्ध्वस्त

मृतांपैकी एका दाम्पत्याचे नुकतेच लग्न झाले होते. अतुल वाघमारे (२५) व वैशाली अतुल वाघमारे (१९) असे या दाम्पत्याचे नाव आहे. अवघ्या २२ दिवसांत त्यांच्या सुखी संसाराचा डाव मोडल्याने हळहळ व्यक्त होत आहे. २२ ऑगस्ट रोजी त्यांचे लग्न झाले. संसार सुरळीत सुरू होता. मात्र, १४ सप्टेंबर रोजी या दुर्घटनेत त्यांच्या संसाराचा शेवट झाला. गुरुवारी पहाटेच त्यांचे मृतदेह हाती लागले.

तिसऱ्या दिवशी सापडले आठही मृतदेह

मंगळवारपासून सुरू असलेल्या शोधकार्याला गुरुवारी दुपारी ४ वाजता ब्रेक लागला. बुधवारी दिवसभर शोधकार्य केल्यानंतर निराशेने शोध पथक झोपी गेले. गुरुवारी पहाटे ५.३० पासून शोधकार्याला पुन्हा सुरुवात झाली. यात सर्वप्रथम पियूष तुलसीदास मटरे या बालकाचा मृतदेह घटनास्थळापासून ७ ते ८ किमीवरील हातुर्णानजीक सापडला. पाठोपाठ सहाही मृतदेह हाती लागले. दुपारी ४ वाजता एका मुलीचा मृतदेह सापडल्याने शोधकार्य थांबविण्यात आले.

घटनास्थळावरच शवविच्छेदन

मृतदेहांना दुर्गंधी येत असल्याने प्रशासनाने तीर्थक्षेत्र झुंज येथेच शवविच्छेदन करण्याचा निर्णय घेतला. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रमोद पोतदार आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीष बदनावरे यांनी सात मृतदेहांचे घटनास्थळावर, तर एकाचे रुग्णालयात शवविच्छेदन केले आणि तेथून प्रशासनाने मृतदेह त्यांच्या गावी रुग्णवाहिकेतून पोहचवून दिले. यावेळी नातेवाईकांच्या रुदनाने उपस्थितांना गहिवर दाटून आला होता.

टॅग्स :Deathमृत्यूAccidentअपघात