शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

जिल्हा परिषदेत 'कही खुशी कही गम'; गट, गणांच्या रचनेत प्रस्थापितांना धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2022 12:09 IST

विदर्भातील अमरावती, यवतमाळ, गडचिरोली, वर्धा जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत पंचायत समितीमध्ये येत्या काही दिवसात 'रणसंग्राम' होणार आहे.

ठळक मुद्देगटाची प्रारुप रचना जाहीरमतदारसंघ वाढले, पण गाव बदलले

अमरावती : जिल्हा पारषद निवडणुकीसाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. विदर्भातील अमरावती, यवतमाळ, गडचिरोली, वर्धा जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत पंचायत समितीमध्ये येत्या काही दिवसात 'रणसंग्राम' होणार आहे. त्यासाठी प्रशासनाने क्षेत्ररचना जाहीर केली. मतदारसंघामध्ये थोडाफार बदल तसेच नव्याने मतदारसंघाची भर पडली आहे. त्यासाठी नागरिकांचे आक्षेप मागविण्यात आले आहेत. त्या आक्षेपावर सुनावणी, समाधान झाल्यानंतर मतदारसंघ 'फायनल' होणार आहे.

अमरावती जिल्हा परिषदेतील बहुप्रतिक्षित वाढीव मतदारसंघांचा लेखाजोखा गुरुवारी जिल्हा प्रशासनाने गण व गटाचा प्रारूच रचना प्रसिध्द करून स्पष्ट केला. चांदूरबाजार, वरुड, धारणी, दर्यापूर, अंजनगाव सुर्जी, भातकुली व अचलपूर या सात तालुक्यांमध्ये सात मतदारसंघांच्या जागा वाढल्या आहे. या वाढीव मतदारसंघांमुळे जिल्हा परिषदेच्या एकूण गटांची संख्या ६६ तर ११ पंचायत समितीची गणांची संख्या ११२ जाऊन पोहोचली आहे. नवीन वाढलेल्या गटामध्ये चांदूरबाजार तालुक्यात सोनोरी, वरुड तालुक्यात शहापूर, धारणीतील घुटी, दर्यापूरमधील माहुली धांडे, अंजनगाव सुर्जी तालुक्यात खानमपूर पांढरी, भातकुलीत निंभा तर अचलपूर तालुक्यात गौरखेडा कुंभी हा नवा मतदारसंघ तयार झाला आहे.

गडचिरोली जिल्हा परिषदेच्या गटांसह पंचायत समित्यांच्या गणांची संख्या वाढविण्यात आल्याने त्यांची पुनर्रचना करण्यात आली आहे. त्यानुसार कोणत्या गटात आणि गणात कोणती गावे समाविष्ट राहतील याची यादी जिल्हाधिकारी संजय मिना यांनी दि. २ ला नागरिकांच्या माहितीसाठी जाहीर केली. त्यावर जर काही हरकती असतील तर त्या ८ जूनपर्यंत लेखी स्वरूपात स्वीकारल्या जाणार आहेत. त्यानंतर सदर यादीला (गट-गणांचा मसुदा) अंतिम स्वरूप दिले जाणार आहे. पूर्वी गडचिरोली जिल्हा परिषदेची संख्या ५१ तर पंचायत समिती सदस्यांची संख्या १०२ होती. आता ती जि.प.सदस्यांची संख्या ५७ तर पं.स.सदस्यांची संख्या ११४ झाली आहे.

यवतमाळमध्ये आठ जागांची भर

यवतमाळच्या जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारी जिल्हा परिषदेचे गट आणि पंचायत समितीच्या गणांची घोषणा केली. नवीन रचनेत जिल्हा परिषदेच्या आठ तर पंचायत समितीच्या १६ जागांची भर पडली आहे. आता जिल्हा परिषदेत ६१ ऐवजी ६९ तर पंचायत समितीत २२२ ऐवजी १३८ सदस्य निवडून येणार आहे. नवीन रचनेमुळे कहीं खुशी, कहीं गम अशी स्थिती निर्माण झाली आहे.

नवीन गट आणि गणांच्या रचनेत माजी अध्यक्षांना दिलासा मिळाला तर दोन्ही माजी उपाध्यक्षांचे गट गायब झाले आहेत. १६ पैकी आठ तालुक्यांत जिल्हा परिषदेच्या आठ आणि पंचायत समितीच्या १६ जागा वाढल्या आहेत. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी गुरुवारी गट आणि गणांचा मसुदा प्रसिद्ध केला. हा मसुदा प्रसिद्ध होताच राजकीय वर्तुळात विविध चर्चांना सुरुवात झाली आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदVidarbhaविदर्भElectionनिवडणूकZP Electionजिल्हा परिषद