शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
4
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
5
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
6
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
7
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
8
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
9
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
10
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
11
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
12
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
13
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
14
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
15
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
16
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
19
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
20
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या

साद्राबाडीत बुधवारी रात्री पुन्हा भूकंपाचे आठ धक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 1:12 AM

मागील दोन आठवड्यांपासून भूगर्भातील आवाजासह भूकंपाचे धक्के जाणवत असलेल्या साद्राबाडीत बुधवारी रात्री पुन्हा भूगर्भातील आवाजासह सौम्य स्वरूपाचे आठ धक्के जाणवले. गावात तीन ठिकाणी बसविलेल्या सिस्मोग्राफ यंत्रांवर याची दोन रिश्टर स्केलपर्यंत नोंद झाली असल्याची माहिती ........

ठळक मुद्देसिस्मोग्राफवर २ रिश्टर स्केलपर्यंत नोंद : ‘एनसीएस’ टीम इंचार्जची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती/धारणी : मागील दोन आठवड्यांपासून भूगर्भातील आवाजासह भूकंपाचे धक्के जाणवत असलेल्या साद्राबाडीत बुधवारी रात्री पुन्हा भूगर्भातील आवाजासह सौम्य स्वरूपाचे आठ धक्के जाणवले. गावात तीन ठिकाणी बसविलेल्या सिस्मोग्राफ यंत्रांवर याची दोन रिश्टर स्केलपर्यंत नोंद झाली असल्याची माहिती या ठिकाणी आठ दिवसांपासून ठाण मांडून असलेले नवी दिल्ली येथील नॅशनल सेंटर फॉर सिस्मोग्रॉफ (एनसीएस) या टीमचे प्रमुख बलबीरसिंग यांनी दिली.धारणी तालुक्यातील साद्राबाडी, झिल्पी, खारी, गावलानडोह, सुसर्दा व राणीपिसा येथे दोन आठवड्यांपासून भूगर्भात हालचाली होत आहेत. मात्र, २१ आॅगस्टला मोठ्या प्रमाणात कंपने, आवाज झाला; अनेक घरांना तडे गेले . यानंतर जिल्हा प्रशासनाने साद्राबाडी व परिसरातील भूकंपसदृश घटनांबाबत नेमके कारण व शास्त्रीयदृष्ट्या तपासासाठी या पथकाला पाचारण केले होते. साद्राबाडी व परिसरात मंगळवारी १.२ रिश्टर स्केलच्या भूकंपाची नोंद गावात बसविलेल्या सिस्मोग्राफ यंत्रावर झाली.भूकंप म्हणजे काय?अमरावती : जमिनीत खोलवर जी हालचाल होते व त्यामुळे जी कंपने होतात, त्यालाच आपण भूकंप म्हणतो, अशी साधी व सोपी व्याख्या ‘एनसीएस’चे पथकप्रमुख बलबीरसिंग यांनी सांगितली. साद्राबार्डी परिसरातील भूगर्भातील कंपनांची २.५ ते १.२ रिश्टर स्केलपर्यंत नोंद झाली. ही भूगर्भातील कंपने आहेत. त्यामुळे या परिसरात जाणवत असलेले धक्के हे भूकंपाचेच असल्याचे बलविरसिंग यांनी सांगितले. २४ आॅगस्टला दुपारी जीआयएस पथक साद्राबाडी गावात पाहणी करीत असताना २.२१ वाजता पथकातील भूवैज्ञानिकांनी भूंकपाचा धक्का व आवाजाचा थरार अनुभवला. गुरूवारी मध्यरात्री पाच वेळा धक्के जाणवले. या धक्यांची सिस्मोग्राफवर १.५ रिश्टरस्केल अशी नोंद झाली. धक्का जाणवल्यावर विशिष्ट असा वास आला, हा वास कशाचा, याचा अद्याप उलगडा झालेला नाही.

गुरुवारी पुन्हा धक्कासाद्राबाडी व झिल्पी गावांमध्ये बुधवारी रात्री १२ नंतर सकाळपर्यंत भूकंपाचे आठ सौम्य धक्के बसल्यानंतर गुरुवारी दुपारी १२.५७ वाजता पुन्हा एक धक्का बसला. ‘एनसीएस’च्या सिस्मोग्राफ यंत्रावर याची तीव्रता २ रिश्टर स्केलपेक्षा कमी नोंदविण्यात आलेली आहे. दरम्यान, या भूकंपाच्या धक्क््यांनी आदिवासी बांधवांमध्ये मात्र गोंधळाची स्थिती आहे.‘जीएसआय’ची टीम पुन्हा डेरेदाखलजिल्हाधिकाऱ्यांची माहिती : दोन्ही टीमच्या संवादानंतर देणार अहवालअमरावती : जिआॅलॉजिकल सर्व्हे आॅफ इंडियाच्या पथकाने भूगर्भात पाणी झिरपल्याने निर्माण झालेल्या वायूची हालचाल कंपनास कारणीभूत असल्याचे मत नोंदविले. मात्र, भूगर्भातील हालचाली, कंपने व आवाज हे आता ३५ किमी परिघात पोहोचले आहे व याची श्रुंखला सुरूच असल्याची माहिती प्रशासनाद्वारा देण्यात आल्यामुळे वरिष्ठ शास्त्रज्ञांसह पाच दिवसांतच ही टीम पुन्हा साद्राबाडीत डेरेदाखल झाली. भूवैज्ञानिक मिलिंद धकाते, मुकेश शर्मा, भूपेश उरखडे, प्रसाद, संजय वानखडे आदींनी साद्राबाडी परिसरात घरांना गेलेले तडे, विहिरी, तलाव, आरोग्य केंद्र आदी ठिकाणांची पाहणी केली. टीमद्वारा काही यंत्राच्या सहाय्याने पुन्हा निरीक्षण करण्यात आले. उशिरा रात्री या टीमसोबत एनसीएसच्या पथकातील शास्त्रज्ञांचा संवाद होण्याची शक्यता आहे व त्यानंतर साद्राबाडी येथे नेमके काय, याचा अहवाल मिळून उलगडा होण्याची शक्यता असल्याचे जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी सांगितले.

टॅग्स :Earthquakeभूकंप