शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

टोमॅटो उत्पादकांना आर्थिक फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:11 IST

नांदगाव खंडेश्वर : कोरोनाच्या संकटामुळे ग्रामीण भागातील आठवडी बाजार बंद झाले. जिल्ह्याच्या बाजारपेठेत मालाची आवक वाढली. पण, मागणी घटल्याने ...

नांदगाव खंडेश्वर : कोरोनाच्या संकटामुळे ग्रामीण भागातील आठवडी बाजार बंद झाले. जिल्ह्याच्या बाजारपेठेत मालाची आवक वाढली. पण, मागणी घटल्याने त्याचा फटका टोमॅटो उत्पादकांना बसला. ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात टोमॅटोला हजार ते १,२०० रुपये प्रतिक्रेटचे भाव होते. ते कोसळून आता चांगल्या प्रतीच्या मालाला दीडशे ते दोनशे रुपये दर मिळत आहेत.

माहुली चोर शिवारात अनिल झंझाट या शेतकऱ्याने चार एकरांत टोमॅटोची लागवड केली होती. १ ऑक्टोबरपासून माल निघणे सुरू झाले. दररोज दोनशे क्रेटचे उत्पादन निघत होते. तो अमरावती बाजारपेठेत विक्रीसाठी नेला जात होता. त्याला पाचशे ते सहाशे रुपये प्रतिक्रेटचे भाव मिळत होते. ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यातील टोमॅटोचे दर पाहता इतरही बऱ्याच शेतकऱ्यांनी शेतात टोमॅटोची लागवड केली. त्यामुळे बाजारपेठेत मालाची आवक वाढली. कोरोनाच्या संकटामुळे व बाजारपेठेत मागणी घटल्याने दर कोसळून आता दीडशे ते दोनशे रुपये क्रेटवर आल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. याचा टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे.

कोट

चार एकर टोमॅटो लागवडीसाठी व मशागत, मजुरी, खते, वाहतूक, फवारणी इत्यादीसाठी सुमारे ७ ते ८ लाख रुपयांचा खर्च येतो. १० ऑगस्टला लागवड केलेल्या झाडावरचा १५ ते ३० एप्रिलपर्यंत माल निघतो. पण बाजारपेठेतील भाव पडल्याने झाडावरील माल तोडणे व वाहतूक याचा खर्चही निघत नव्हता. त्यामुळे १५ फेब्रुवारीपासून माल तोडणे बंद केले.

- अनिल झंझाट,

शेतकरी, माहुली चोर