शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
4
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
5
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
6
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
7
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
8
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
9
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
10
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
11
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
12
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
13
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
14
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
15
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
16
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
17
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
18
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
19
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
20
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय

टोमॅटो उत्पादकांना आर्थिक फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:11 IST

नांदगाव खंडेश्वर : कोरोनाच्या संकटामुळे ग्रामीण भागातील आठवडी बाजार बंद झाले. जिल्ह्याच्या बाजारपेठेत मालाची आवक वाढली. पण, मागणी घटल्याने ...

नांदगाव खंडेश्वर : कोरोनाच्या संकटामुळे ग्रामीण भागातील आठवडी बाजार बंद झाले. जिल्ह्याच्या बाजारपेठेत मालाची आवक वाढली. पण, मागणी घटल्याने त्याचा फटका टोमॅटो उत्पादकांना बसला. ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात टोमॅटोला हजार ते १,२०० रुपये प्रतिक्रेटचे भाव होते. ते कोसळून आता चांगल्या प्रतीच्या मालाला दीडशे ते दोनशे रुपये दर मिळत आहेत.

माहुली चोर शिवारात अनिल झंझाट या शेतकऱ्याने चार एकरांत टोमॅटोची लागवड केली होती. १ ऑक्टोबरपासून माल निघणे सुरू झाले. दररोज दोनशे क्रेटचे उत्पादन निघत होते. तो अमरावती बाजारपेठेत विक्रीसाठी नेला जात होता. त्याला पाचशे ते सहाशे रुपये प्रतिक्रेटचे भाव मिळत होते. ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यातील टोमॅटोचे दर पाहता इतरही बऱ्याच शेतकऱ्यांनी शेतात टोमॅटोची लागवड केली. त्यामुळे बाजारपेठेत मालाची आवक वाढली. कोरोनाच्या संकटामुळे व बाजारपेठेत मागणी घटल्याने दर कोसळून आता दीडशे ते दोनशे रुपये क्रेटवर आल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. याचा टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे.

कोट

चार एकर टोमॅटो लागवडीसाठी व मशागत, मजुरी, खते, वाहतूक, फवारणी इत्यादीसाठी सुमारे ७ ते ८ लाख रुपयांचा खर्च येतो. १० ऑगस्टला लागवड केलेल्या झाडावरचा १५ ते ३० एप्रिलपर्यंत माल निघतो. पण बाजारपेठेतील भाव पडल्याने झाडावरील माल तोडणे व वाहतूक याचा खर्चही निघत नव्हता. त्यामुळे १५ फेब्रुवारीपासून माल तोडणे बंद केले.

- अनिल झंझाट,

शेतकरी, माहुली चोर