शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

विदर्भात फुलू लागले पर्यावरणपूरक पळस वृक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 14:14 IST

रंगासोबतच मधग्रंथीचे वरदान लाभलेल्या पळस वृक्षाला जैवविविधतेत अनन्य साधारण महत्त्व आहे. कोठेही सहज उपलब्ध होणाऱ्या पळस वृक्षाची मुळापासून तर फुलापर्यंतच्या भागाला आयुर्वेदात महत्त्व आहे. पळस वृक्षांमुळे पर्यावरणाचे संतुलन टिकून आहे.

ठळक मुद्देअंगवृद्धीसाठी गुणकारी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : रंगासोबतच मधग्रंथीचे वरदान लाभलेल्या पळस वृक्षाला जैवविविधतेत अनन्य साधारण महत्त्व आहे. कोठेही सहज उपलब्ध होणाऱ्या पळस वृक्षाची मुळापासून तर फुलापर्यंतच्या भागाला आयुर्वेदात महत्त्व आहे. पळस वृक्षांमुळे पर्यावरणाचे संतुलन टिकून आहे.पळसाची फुले, शेंगा व त्यावर येणारे सर्व प्रकारचे कीटक, कीटकभक्षी पक्षी, बिया खाण्यासाठी येणारे पोपट व इतर पक्षी अशी ही शृंखलाच तयार होते. विविध प्रकारच्या कीटकांच्या वावरामुळे परागीकरणाची क्रिया वृद्धींगत होऊन किडीचे निर्मूलन याच पक्ष्यांच्या माध्यमातून घडून येते. हिंदू आणि बौद्ध संप्रदायांमध्ये पळसाला पवित्र वृक्ष मानले जाते. हिंदू धर्मात पळसाच्या तीन पानांपैकी मधले पान विष्णुचे, डावीकडील ब्रम्हा व उजवीकडील पानाला शिवाचे वास्तव्य दर्शविते. अशा पवित्र झाडाची चातुर्मासात आस्थेने पूजा केली जाते. वाळलेल्या फांद्यांचे तुकडे समिधा म्हणून होमहवनात वापरतात. यावरून याज्ञिक हे संस्कृत नाव दिले असावे. कवी कालिदासाने 'ऋतुसंहार' या काव्यात पळसाचे वर्णन केले आहे. या वृक्षांची अरण्ये म्हणजे देदिप्यमान अग्नीच होत.अंगवृद्धीसाठी गुणकारीआम्लपित्तावरदेखील पळस गुणकारी ठरतो. पोट दुखत असल्यास पळसाच्या लहान झाडाचा क्षार देतात. हत्तीपाय या विकारात पळसमूळ सरस तेलात मिसळून प्यायला देतात. लहान बालकांमध्ये आढळणाऱ्या अंगवृद्धीत सालीचा काढा करून देण्यात येतो. कृमिनाशक म्हणून वापरताना पलाश बीजातील दल काढून घ्यावा. बिया कोरड्या वाळवून त्याचा चुर्ण २० ग्रॅम प्रमाणात दिल्यास पोटावरील गोल चपटे कृमी नाहीसे होतात.

पळसाचा सामान्य उपयोगपळसाची फुले कृमीनाशक, दाहप्रशमकपळसाची लाल पिवळी फुले उकळून बनविलेला रंग खेळल्यास त्वचेचा विकार नाहीसा होतो. होळीपासून वाढणाºया कृमीपासून त्वचेचे रक्षण करून त्वचेची प्रतिकारकक्षमता वाढविण्यासाठी हा धूळवडीचा सण असतो. पळसाची फुले कृमीनाशक व दाहशमक असतात. ताप, गोवर, काजण्या, बारीक पूरळ व घामोळ्या आदी विकारापासून पळसाची फुले रक्षण करतात.शेताच्या धुºयावर पळस लावल्यास शेतकऱ्यांना ते फायद्याचे ठरेल. पळसातील विविध गुणांमुळे पक्षी, कीटक आकर्षित होतात. अशातच पिकांवर अळ्यांचा प्रादुर्भाव झाल्यास त्याचा नायनाट या पक्ष्यांद्वारे होण्यास मदत होते.- डॉ. गणेश हेडावू, वनस्पतीशास्त्र विभाग, श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय

टॅग्स :forestजंगल