शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

फवारणी औषधाच्या संसर्गामुळे शेतक-यावर उपासमारी, खर्च झाला पण पीक गेलं वाया

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2017 14:40 IST

शेतात राबराब राबून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवणाऱ्या स्थानिक शेतकरी मोहम्मद शरीफ याला फवारणी औषधाचा संसर्ग झाल्यामुळे महिनाभरापासून पायाने चालणंही अशक्य झालं आहे.

ठळक मुद्देशेतात राबराब राबून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवणाऱ्या स्थानिक शेतकरी मोहम्मद शरीफ याला फवारणी औषधाचा संसर्ग झाल्यामुळे महिनाभरापासून पायाने चालणंही अशक्य झालं आहे.पायात होत असलेल्या प्रचंड वेदाना, शेतीसाठी झालेला खर्च, आणि हाताशी आलेलं पीक वाया गेल्याने हा शेतकरी हवालदिल झाला आहे. या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. 

नांदगाव खंडेश्वर - शेतात राबराब राबून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवणाऱ्या स्थानिक शेतकरी मोहम्मद शरीफ याला फवारणी औषधाचा संसर्ग झाल्यामुळे महिनाभरापासून पायाने चालणंही अशक्य झालं आहे. पायात होत असलेल्या प्रचंड वेदाना, शेतीसाठी झालेला खर्च, आणि हाताशी आलेलं पीक वाया गेल्याने हा शेतकरी हवालदिल झाला आहे. या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. 

नांदगाव खंडेश्वर येथील मोहम्मद शरीफ यांनी ५ सप्टेंबर १७ ला नांदगावातील कृषी केंद्रातून यूपीएल कंपनीचे दोस्त सुपर नावाचे तणनाशक फवारणी औषध विकत घेतले व ७ सप्टेंबरला शेतात फवारणी करीत असताना डाव्या पायावर औषध सांडले. फवारणी करीत असतानाच दोन तासानंतर त्यांच्या पायाला वेदना होणे सुरू झाले. या शेतक-याने घरी आल्यानंतर स्वच्छ पाण्याने पाय धुतले. परंतु तरीही वेदना कमी होत नव्हत्या. अखेर गावामधील खासगी दवाखान्यात त्यांनी उपचार घेतले. आठ दिवस उपचार घेऊनही वेदना कमी होत नव्हत्या. त्यामुळे त्यांनी अमरावती येथील डॉ.पाटणकर, डॉ. संजय अग्रवाल, डॉ.राजेंद्र राठी यांचेकडे उपचार घेतले. परंतु अद्यापही त्यांचा पायाचा त्रास कमी झाला नाही. आता या शेतक-याला पायाने चालणेही कठीण झाले आहे.

शेतात जाणे अशक्य झाल्याने शेतीसाठी लागलेला ४०,००० रुपये खर्चही वाया गेला व हातातोंडाशी आलेले पीकही वाया गेल्याने या शेतकऱ्यासमोर आर्थिक विवंचना निर्माण झाली आहे. फवारणी औषधाच्या संसर्गामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. याबाबत संबंधित कृषी केंद्रधारकाने यूपीएल कंपनीच्या कर्मचाऱ्यांना माहिती दिली असता ते  या शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी आले. परंतु आमच्या औषधामुळे कुठलाच संसर्ग होत नाही, अशी बतावणी करून यूपीएल कंपनीचे कर्मचारी उडवाउडवीचे उत्तरे देऊन निघून गेल्याने हा शेतकरी हवालदिल झाला आहे. जर तणनाशक फवारणी औषध कंपनीचे कर्मचारी शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळत असेल तर शेतक-यांच्या व्यथा जाणणार कोण? हा प्रश्न निर्माण झाला आहे. 

यूपीएल कंपनीच्या दोस्त सुपर नावाच्या तणनाशक औषधामुळे शेतक-यांच्या पायाला संसर्ग झाला आहे. अनेक दवाखान्यात उपचार घेऊनही त्यांना आराम नाही. त्यामुळे उपचारावर झालेल्या नुकसानीची भरपाई यूपीएल कंपनीने द्यावी, अन्यथा कंपनीविरोधात तीव्र आंदोलन उभारू.- फिरोज खान, नगरसेवक, नांदगाव खंडेश्वर

टॅग्स :FarmerशेतकरीAmravatiअमरावती