शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन निवडणुकीत शिंदेसेनेच्या २ उमेदवारांनी अर्ज घेतला मागे; उपजिल्हाप्रमुखांसह भाजपात केला प्रवेश
2
Russia Ukraine War: युक्रेनचा रशियावर पुन्हा 'घाव'; भयंकर हवाई हल्ल्यात लहान मुलांसह २५ नागरिकांचा मृत्यू
3
शाहांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंचे नेत्यांना आदेश; जिल्हाप्रमुखांपासून सगळ्यांना पोहचला संदेश
4
‘कुठे गेले दंड फुगवून आव्हाने देणाऱ्या ठाकरेंचे आणि मविआचे उमेदवार?’, भाजपाने डिवचले  
5
देशात आता केवळ ४ सरकारी बँक राहणार? विलीनीकरणासाठी केंद्राकडे प्रस्ताव; 'या' ६ बँका एक होणार?
6
4-5 उचक्या अन् जीव सोडला; मुंबईहून उत्तर प्रदेशला जाणाऱ्या प्रवाशाचा ट्रेनमध्ये दुर्दैवी मृत्यू
7
सैराटची पुनरावृत्ती! प्रेमविवाहामुळे नाराज झालेल्या कुटुंबाने मुलीवर गोळ्या झाडून केली हत्या
8
नताशाशी घटस्फोटानंतर हार्दिक पांड्याचा माहिकासोबत साखरपुडा? अभिनेत्रीच्या हातात दिसली अंगठी
9
देवदिवाळी २०२५: कशी साजरी करतात देवदिवाळी? काय असतो नैवेद्य आणि कोणत्या देवांची होते पूजा? वाचा 
10
वैभव सूर्यवंशीचा सुपरहिट धमाका! गोलंदाजांची धुलाई करत बनला 'नंबर १'; भारतही सेमीफायनलमध्ये
11
"तू ओवर ॲक्टिंग करतोय"; शिक्षिकेने वर्गात केला अपमान; सांगलीच्या विद्यार्थ्याने दिल्लीत मेट्रोसमोर घेतली उडी
12
अमित शाह आणि एकनाथ शिंदेंमध्ये ५० मिनिटे बैठक; रवींद्र चव्हाणांबाबत तक्रारीचा सूर, काय घडलं?
13
कणकवलीत नाट्यमय घडामोडी, कट्टर विरोधक एकत्र, निलेश राणेंचा थेट ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
14
India Israel Trade: महाराष्ट्राचे 'हे' प्रश्न इस्रायल दौऱ्यात मार्गी लागणार का? पीयूष गोयल यांच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष!
15
पाकिस्तानच्या शेअर बाजारात पैशांचा पाऊस, भारत राहिला मागे; एक्सपर्ट म्हणाले, "पुढच्या १० वर्षांत..."
16
अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती आता कशी आहे? 'ही मॅन' यांच्याबाबत मोठी अपडेट समोर
17
"एका मिनिटात खटला संपला, ठाकरेंच्या वकिलांनी कोर्टात महत्त्वाचे मुद्दे मांडलेच नाही"; पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा
18
२१ नोव्हेंबर, मार्गशीर्ष मास; देवदिवाळी, नागदिवाळी, महालक्ष्मी व्रत, दत्त जयंती व्रत वैकल्याचा महिना
19
Palmistry: तळहातावर ‘या’ रेषा करतात अचानक श्रीमंत, शनिचे वरदान; भरपूर पैसा, राजयोगाचे जीवन!
20
देव दिवाळी २०२५: ९ राशींना शुभ-लाभ, मनासारखे यश; ठरलेली कामे होतील, पैसा मिळेल, पण मोह टाळा!
Daily Top 2Weekly Top 5

फवारणी औषधाच्या संसर्गामुळे शेतक-यावर उपासमारी, खर्च झाला पण पीक गेलं वाया

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2017 14:40 IST

शेतात राबराब राबून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवणाऱ्या स्थानिक शेतकरी मोहम्मद शरीफ याला फवारणी औषधाचा संसर्ग झाल्यामुळे महिनाभरापासून पायाने चालणंही अशक्य झालं आहे.

ठळक मुद्देशेतात राबराब राबून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवणाऱ्या स्थानिक शेतकरी मोहम्मद शरीफ याला फवारणी औषधाचा संसर्ग झाल्यामुळे महिनाभरापासून पायाने चालणंही अशक्य झालं आहे.पायात होत असलेल्या प्रचंड वेदाना, शेतीसाठी झालेला खर्च, आणि हाताशी आलेलं पीक वाया गेल्याने हा शेतकरी हवालदिल झाला आहे. या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. 

नांदगाव खंडेश्वर - शेतात राबराब राबून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवणाऱ्या स्थानिक शेतकरी मोहम्मद शरीफ याला फवारणी औषधाचा संसर्ग झाल्यामुळे महिनाभरापासून पायाने चालणंही अशक्य झालं आहे. पायात होत असलेल्या प्रचंड वेदाना, शेतीसाठी झालेला खर्च, आणि हाताशी आलेलं पीक वाया गेल्याने हा शेतकरी हवालदिल झाला आहे. या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. 

नांदगाव खंडेश्वर येथील मोहम्मद शरीफ यांनी ५ सप्टेंबर १७ ला नांदगावातील कृषी केंद्रातून यूपीएल कंपनीचे दोस्त सुपर नावाचे तणनाशक फवारणी औषध विकत घेतले व ७ सप्टेंबरला शेतात फवारणी करीत असताना डाव्या पायावर औषध सांडले. फवारणी करीत असतानाच दोन तासानंतर त्यांच्या पायाला वेदना होणे सुरू झाले. या शेतक-याने घरी आल्यानंतर स्वच्छ पाण्याने पाय धुतले. परंतु तरीही वेदना कमी होत नव्हत्या. अखेर गावामधील खासगी दवाखान्यात त्यांनी उपचार घेतले. आठ दिवस उपचार घेऊनही वेदना कमी होत नव्हत्या. त्यामुळे त्यांनी अमरावती येथील डॉ.पाटणकर, डॉ. संजय अग्रवाल, डॉ.राजेंद्र राठी यांचेकडे उपचार घेतले. परंतु अद्यापही त्यांचा पायाचा त्रास कमी झाला नाही. आता या शेतक-याला पायाने चालणेही कठीण झाले आहे.

शेतात जाणे अशक्य झाल्याने शेतीसाठी लागलेला ४०,००० रुपये खर्चही वाया गेला व हातातोंडाशी आलेले पीकही वाया गेल्याने या शेतकऱ्यासमोर आर्थिक विवंचना निर्माण झाली आहे. फवारणी औषधाच्या संसर्गामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. याबाबत संबंधित कृषी केंद्रधारकाने यूपीएल कंपनीच्या कर्मचाऱ्यांना माहिती दिली असता ते  या शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी आले. परंतु आमच्या औषधामुळे कुठलाच संसर्ग होत नाही, अशी बतावणी करून यूपीएल कंपनीचे कर्मचारी उडवाउडवीचे उत्तरे देऊन निघून गेल्याने हा शेतकरी हवालदिल झाला आहे. जर तणनाशक फवारणी औषध कंपनीचे कर्मचारी शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळत असेल तर शेतक-यांच्या व्यथा जाणणार कोण? हा प्रश्न निर्माण झाला आहे. 

यूपीएल कंपनीच्या दोस्त सुपर नावाच्या तणनाशक औषधामुळे शेतक-यांच्या पायाला संसर्ग झाला आहे. अनेक दवाखान्यात उपचार घेऊनही त्यांना आराम नाही. त्यामुळे उपचारावर झालेल्या नुकसानीची भरपाई यूपीएल कंपनीने द्यावी, अन्यथा कंपनीविरोधात तीव्र आंदोलन उभारू.- फिरोज खान, नगरसेवक, नांदगाव खंडेश्वर

टॅग्स :FarmerशेतकरीAmravatiअमरावती