शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

फवारणी औषधाच्या संसर्गामुळे शेतक-यावर उपासमारी, खर्च झाला पण पीक गेलं वाया

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2017 14:40 IST

शेतात राबराब राबून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवणाऱ्या स्थानिक शेतकरी मोहम्मद शरीफ याला फवारणी औषधाचा संसर्ग झाल्यामुळे महिनाभरापासून पायाने चालणंही अशक्य झालं आहे.

ठळक मुद्देशेतात राबराब राबून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवणाऱ्या स्थानिक शेतकरी मोहम्मद शरीफ याला फवारणी औषधाचा संसर्ग झाल्यामुळे महिनाभरापासून पायाने चालणंही अशक्य झालं आहे.पायात होत असलेल्या प्रचंड वेदाना, शेतीसाठी झालेला खर्च, आणि हाताशी आलेलं पीक वाया गेल्याने हा शेतकरी हवालदिल झाला आहे. या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. 

नांदगाव खंडेश्वर - शेतात राबराब राबून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवणाऱ्या स्थानिक शेतकरी मोहम्मद शरीफ याला फवारणी औषधाचा संसर्ग झाल्यामुळे महिनाभरापासून पायाने चालणंही अशक्य झालं आहे. पायात होत असलेल्या प्रचंड वेदाना, शेतीसाठी झालेला खर्च, आणि हाताशी आलेलं पीक वाया गेल्याने हा शेतकरी हवालदिल झाला आहे. या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. 

नांदगाव खंडेश्वर येथील मोहम्मद शरीफ यांनी ५ सप्टेंबर १७ ला नांदगावातील कृषी केंद्रातून यूपीएल कंपनीचे दोस्त सुपर नावाचे तणनाशक फवारणी औषध विकत घेतले व ७ सप्टेंबरला शेतात फवारणी करीत असताना डाव्या पायावर औषध सांडले. फवारणी करीत असतानाच दोन तासानंतर त्यांच्या पायाला वेदना होणे सुरू झाले. या शेतक-याने घरी आल्यानंतर स्वच्छ पाण्याने पाय धुतले. परंतु तरीही वेदना कमी होत नव्हत्या. अखेर गावामधील खासगी दवाखान्यात त्यांनी उपचार घेतले. आठ दिवस उपचार घेऊनही वेदना कमी होत नव्हत्या. त्यामुळे त्यांनी अमरावती येथील डॉ.पाटणकर, डॉ. संजय अग्रवाल, डॉ.राजेंद्र राठी यांचेकडे उपचार घेतले. परंतु अद्यापही त्यांचा पायाचा त्रास कमी झाला नाही. आता या शेतक-याला पायाने चालणेही कठीण झाले आहे.

शेतात जाणे अशक्य झाल्याने शेतीसाठी लागलेला ४०,००० रुपये खर्चही वाया गेला व हातातोंडाशी आलेले पीकही वाया गेल्याने या शेतकऱ्यासमोर आर्थिक विवंचना निर्माण झाली आहे. फवारणी औषधाच्या संसर्गामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. याबाबत संबंधित कृषी केंद्रधारकाने यूपीएल कंपनीच्या कर्मचाऱ्यांना माहिती दिली असता ते  या शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी आले. परंतु आमच्या औषधामुळे कुठलाच संसर्ग होत नाही, अशी बतावणी करून यूपीएल कंपनीचे कर्मचारी उडवाउडवीचे उत्तरे देऊन निघून गेल्याने हा शेतकरी हवालदिल झाला आहे. जर तणनाशक फवारणी औषध कंपनीचे कर्मचारी शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळत असेल तर शेतक-यांच्या व्यथा जाणणार कोण? हा प्रश्न निर्माण झाला आहे. 

यूपीएल कंपनीच्या दोस्त सुपर नावाच्या तणनाशक औषधामुळे शेतक-यांच्या पायाला संसर्ग झाला आहे. अनेक दवाखान्यात उपचार घेऊनही त्यांना आराम नाही. त्यामुळे उपचारावर झालेल्या नुकसानीची भरपाई यूपीएल कंपनीने द्यावी, अन्यथा कंपनीविरोधात तीव्र आंदोलन उभारू.- फिरोज खान, नगरसेवक, नांदगाव खंडेश्वर

टॅग्स :FarmerशेतकरीAmravatiअमरावती