उड्डाणपुलावरील वाहतुकीमुळे दिलासा :
By Admin | Updated: February 27, 2017 00:21 IST2017-02-27T00:21:10+5:302017-02-27T00:21:10+5:30
अमरावती-बडनेरा मार्गावरून गेलेल्या नरखेड रेल्वे मार्गामुळे मागील अनेक वर्षांपासून प्रवाशांना त्रास सहन करावा लागत होता.

उड्डाणपुलावरील वाहतुकीमुळे दिलासा :
उड्डाणपुलावरील वाहतुकीमुळे दिलासा : अमरावती-बडनेरा मार्गावरून गेलेल्या नरखेड रेल्वे मार्गामुळे मागील अनेक वर्षांपासून प्रवाशांना त्रास सहन करावा लागत होता. हा मार्ग अत्यंत वर्दळीचा असल्याने आणि उड्डाणपुलाचे काम सुरू असताना अरुंद रस्त्यामुळे वाहनधारकांना धुळीसह इतर समस्यांचा नाहक त्रास सहन करावा लागला; मात्र आता काही दिवसांपूर्वी या उड्डाणपुलाचे काम पूर्णत्वास गेल्याने वाहतुकीस मोकळा झाला आहे. त्यामुळे वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.