शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह आणि एकनाथ शिंदेंमध्ये ५० मिनिटे बैठक; रवींद्र चव्हाणांबाबत तक्रारीचा सूर, काय घडलं?
2
दिल्लीत तक्रार अन् मुंबईत डिल? उपमुख्यमंत्री पदासाठी शिंदेचा नेता भाजपशी जुळवून घेण्याच्या प्रयत्नात, अंधारेंचा दावा
3
Ashish Shelar:... तर मुंबईत अजित पवार गटाशी युती करणार नाही, आशिष शेलार यांचा इशारा!
4
SBI मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४१,८२६ चं फिक्स व्याज; परताव्याची गॅरंटी
5
आजचे राशीभविष्य - २० नोव्हेंबर २०२५, 'या' राशीच्या व्यक्तींसाठी आज लाभदायी दिवस, शेअर-सट्टा ह्यात धनलाभ होईल
6
Mahayuti: एकनाथ शिंदे दिल्लीत, अजित पवार ‘वर्षा' बंगल्यावर, महायुतीत 'ऑल इज वेल'?
7
Dombivli: डोंबिवलीत भाजप मजबूत, मनसेच्या माजी नगरसेवकांसाठी शिंदेसेनेने टाकले जाळे!
8
Ulhasnagar: पक्षांतर करणाऱ्यांच्या फोटोला आधी फासले काळे; नंतर सन्मानाने स्थान!
9
India- Israel: भारत-इस्रायलचे संबंध आणखी होणार वृद्धिंगत!
10
Andhra Pradesh: आंध्र प्रदेशात सात नक्षलवाद्यांचा खात्मा, ५० जणांना अटक; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त
11
Palghar: पालघरमध्ये शिक्षकाच्या मारहाणीला घाबरून मुलं लपली जंगलात, मग पुढं काय घडलं?
12
SC: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे का ढकलत नाहीत? न्यायालयाकडून राज्य सरकारला जाब
13
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
14
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
15
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
16
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
17
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
18
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
19
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
20
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
Daily Top 2Weekly Top 5

भूखंड प्रमाणपत्र न मिळाल्याने लाभार्थी लाभापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 22:15 IST

तालुक्यातील येरड येथील एका दिव्यांग प्रकल्पग्रस्ताला अमरावतीचे जिल्हा पुनर्वसन अधिकारी अजय लहाने यांनी भूखंड प्रमाणपत्र न दिल्यामुळे ते लाभार्थी विशेष घटक योजनेपासून वंचित राहिल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्यांच्या अशा प्रतापामुळे लाभार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष खदखदत आहे. 

ठळक मुद्देजिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्यांचा प्रताप : लाभार्थी शंकर उईके यांची कारवाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर रेल्वे : तालुक्यातील येरड येथील एका दिव्यांग प्रकल्पग्रस्ताला अमरावतीचे जिल्हा पुनर्वसन अधिकारी अजय लहाने यांनी भूखंड प्रमाणपत्र न दिल्यामुळे ते लाभार्थी विशेष घटक योजनेपासून वंचित राहिल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. जिल्हा पुनर्वसन अधिकाºयांच्या अशा प्रतापामुळे लाभार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष खदखदत आहे. सन २०१८-२०१९ आर्थिक वर्षात विशेष घटक योजनेंतर्गत ७५ टक्के अनुदानावर अनुसूचित जाती-जमाती व नवबौद्ध लाभार्थ्यांकरिता ३० जुलैपर्यंत अर्ज मागविण्यात आले. या योजनेमधून शासनाच्या सहाय्याने स्वयंरोजगार उभा करण्यासाठी शेळीच्या लाभाकरिता चांदूर रेल्वे तालुक्यातील येरड (बाजार) येथील शंकर जगदेव उईके यांनी भूखंड प्रमाणपत्र वगळता इतर सर्व कागदपत्रे जमा केली. त्यानंतर ते भूखंड प्रमाणपत्राकरिता २४ जुलैला दिव्यांग प्रकल्पग्रस्त संजय विठ्ठलराव डगवार यांच्यासमवेत जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा पुनर्वसन अधिकारी (उपजिल्हाधिकारी, पुनर्वसन) यांच्या कार्यालयात गेले होते. मात्र, भूखंडाचे पैसे भरल्याशिवाय भूखंड प्रमाणपत्र मिळणार नसल्याचे फर्मान जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांनी सोडले. परंतु, यापूर्वी आपल्या कार्यालयाकडून सर्व प्रकल्पग्रस्तांना पैसे न भरता भूखंड प्रमाणपत्र दिल्याचे अजय लहाने यांच्या लक्षात आणून दिले. यापूर्वी भूखंडाची रक्कम भरण्यास प्रकल्पग्रस्तांना कोणतीही पूर्वसूचना दिली नाही. ग्रामपंचायत कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर पुनर्वसन विभागाने अशी नोटीससुद्धा लावली नाही.भूखंड प्रमाणपत्र अतिआवश्यक असल्याने ते देण्याची वारंवार विनंती केल्याचे शंकर उईके यांनी सांगितले. मात्र, त्यांनी दमदाटी करीत भूखंड जप्तीची धमकी दिल्याचा आरोप उईके यांनी केला आहे. जिल्हा पुनर्वसन अधिकाºयाने भूखंड प्रमाणपत्र न दिल्यामुळे मला योजनेचा अर्ज सादर करता आला नाही व मी विशेष घटक योजनेपासून वंचित राहिल्याचे शंकर उईके यांनी म्हटले. विविध शासकीय योजनेपासून लाभार्थी वंचित राहता कामा नये, असे सरकारचे आदेश असताना प्रशासनाची जबाबदार अधिकारी अशाप्रकारे कागदपत्रांची अडवणूक करीत असल्याने सदर लाभार्थी वंचित राहिले. जिल्हा पुनर्वसन अधिकाºयांच्या या प्रतापामुळे आधीच हलाखीत जीवन जगत असलेल्या शंकर उईके यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. शंकर उईके यांना न्याय मिळेल का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.अजय लहानेेंंवर कारवाईची मागणीजिल्हा पुनर्वसन अधिकारी अजय लहाने यांच्यावर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. मी लाभापासून वंचित राहिलो असून, यापुढे अशी वेळ कुणावरही येऊ शकते. त्यामुळे वरिष्ठांनी अशा बेजबाबदार अधिकाºयांवर कठोर कारवाई करून धडा शिकवावा, अशी मागणी शंकर उईके यांनी केली. प्रकल्पग्रस्तांसोबत दबंगगिरीजिल्हा पुनर्वसन अधिकारी अजय लहाने यांच्याकडून अशाप्रकारे बोलण्याची अपेक्षाही केली नव्हती. या अधिकाऱ्याला प्रकल्पग्रस्तांसोबत कसे बोलावे, हे जर समजत नसेल तर त्यांना त्या पदावर राहण्याचा अधिकार नाही. आमच्यासोबत दबंगगिरी करीत भूखंड जप्त करण्याची धमकी दिल्याने आमच्यावर हे अन्याय नव्हे काय, असा सवाल दिव्यांग प्रकल्पग्रस्त संजय डगवार यांनी केला आहे.