शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

वऱ्हाडातील चार हजार गावांना दुष्काळ सवलतीतून डावलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2019 17:55 IST

यंदाच्या खरिपात ५० पेक्षा कमी पैसेवारीची २००७ गावे यापूर्वीच दुष्काळ जाहीर झालेल्या क्षेत्रातील आहेत. या पार्श्वभूमीवर महसूल विभागाने ८ जानेवारीला कमी पैसेवारीतील ९३१ गावांमध्ये दुष्काळसदृष्य स्थिती जाहीर करून आठ प्रकारच्या सवलती दिल्या.

अमरावती - यंदाच्या खरिपात ५० पेक्षा कमी पैसेवारीची २००७ गावे यापूर्वीच दुष्काळ जाहीर झालेल्या क्षेत्रातील आहेत. या पार्श्वभूमीवर महसूल विभागाने ८ जानेवारीला कमी पैसेवारीतील ९३१ गावांमध्ये दुष्काळसदृष्य स्थिती जाहीर करून आठ प्रकारच्या सवलती दिल्या. यामध्ये विभागात बुलडाणा जिल्ह्यातील २४६ गावांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त विभागतील ५० पेक्षा कमी पैसेवारीच्या चार हजार ६५ गावांना स्थान देण्यात आलेले नाहीत. शासनाकडून अन्याय झाल्याची भावना या गावांत आहे. 

विभागीय आयुक्तांनी  ३१ डिसेंबरला यंदाच्या खरिपाची अंतीम पैसेवारी जाहीर केली. यामध्ये अमरावती विभागात लागवडीयोग्य सात हजार २१६ गावांमध्ये ५० पेक्षा कमी पैसेवारी जाहीर करण्यात आली. विभागात यापूर्वी २८ तालुक्यांसह ४७ महसूल मंडळामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला. यामध्ये जून ते सप्टेंबरमध्ये पर्जन्याची तुट, उपलब्ध असलेल्या भूजलाची कमतरता, दूरसंवेदन विषयक निकष, वनस्पती निर्देशांक, मृदू आर्द्रता, पेरणीखालील क्षेत्र व पिकांची स्थिती या सर्व घटकांचा विचार करता शासनाने दुष्काळस्थिती जाहीर केली. ही परिस्थिती मागील दोन महिन्यांतील आहे. मात्र, पीक कापणी प्रयोगाअंती  जिल्ह्यात दुष्काळ जाहीर गावांव्यतिरिक्त ४,३११ गावांमध्ये खरिपाची पैसेवारी ५० पैशांचे आत असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे या सर्व गावांना दुष्काळाच्या सवलती देणे क्रमप्राप्त असताना शासनाने ३ जानेवारीच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीचा हवाला देत शासनादेश जारी केला. त्यामध्ये विभागातील ४,०६५ गावांना दुष्काळ स्थितीतून डावलल्याची बाब स्पष्ट झाली आहे. 

 कमी पैसेवारीच्या गावांना समान न्याय नाही  दुष्काळाच्या नव्या संहितेनुसार शासनाने ३१ आॅक्टोबरला विभागातील २८ तालुक्यात दुष्काळ जाहीर केला व त्यानंतर सहा नोव्हेंबरला ७५ टक्क्यांपेक्षा कमी पर्जन्यमानाच्या आधारावर विभागातील ४७ महसूल मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर केला. त्यानंतर आठ जानेवारी २०१९ रोजी राज्यातील ९३१ गावांमध्ये कमी पैैसेवारीच्या निकषाच्या आधारे दुष्काळ जाहीर केला. यामध्ये विभागातील ४,०६५ गावांमध्ये कमी पैसेवारी असताना एकाही गावाचा समावेश नसल्याने शासनाद्वारा दुष्काळी गावांना समान न्याय नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे.

टॅग्स :Amravatiअमरावतीdroughtदुष्काळ