नालीतील पाण्याने शेत खरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:12 IST2021-02-14T04:12:56+5:302021-02-14T04:12:56+5:30

जिल्हाधिकाºयांकडे तक्रार : वृद्ध शेतकºयाची फरफट, आत्महत्येचा इशारा चांदूर बाजार : तालुक्यातील आखतवाडा येथील ७० वर्षीय वृद्ध शेतकºयाच्या ...

Drain water flooded the field | नालीतील पाण्याने शेत खरडले

नालीतील पाण्याने शेत खरडले

जिल्हाधिकाºयांकडे तक्रार : वृद्ध शेतकºयाची फरफट, आत्महत्येचा इशारा

चांदूर बाजार : तालुक्यातील आखतवाडा येथील ७० वर्षीय वृद्ध शेतकºयाच्या शेतात रस्त्यालगतच्या नालीतून वाहणारे पाणी शिरल्याने तीन एकर शेतातील सोयाबीन पीक पूर्णत: खरडून गेले. त्यामुळे खरीप हंगामात त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. याबाबत त्यांनी स्थानिक महसूल विभाग, जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सहा महिन्यांपूर्वी तक्रार केली होती. मात्र, प्रशासनाकडून कोणतीच दखल घेतली जात नसल्याने खचलेल्या शेतकºयाने अखेर आत्महत्येचा इशारा दिला आहे.

तालुक्यातील आातवाडा येथे बाबूराव रामचंद्र भुयार यांचे शेत आहे. त्यांचा शेताजवळ मुख्यमंत्री निधीतून खरवाडी ते आखतवाडा आणि आखतवाडा ते जैनपूर असे रस्ता बांधकाम झाले आहे. या बांधकाम दरम्यान सदर रस्त्याचे खोदलेल्या नालीतून वाहून जाणारे पावसाचे पाणी शेतात घुसल्याने संबंधित शेतकºयाचे सोयाबीनचे पीक पूर्णत: खरडून गेले होते. संबंधित शेतात रस्ता बांधकामामुळे या रस्त्याचे दोन किलोमीटर अंतरावरील पाणी शेतात शिरले.

असा आहे तलाठ्याचा अहवाल

भुयार यांनी तहसीलदारांकडे सहा महिन्यांपूर्वी दोनदा लेखी तक्रार केली होती. याप्रकरणी तहसीलदारांनी दखल घेत तलाठ्याकडून अहवाल मागितला होता. त्यानुसार अर्जदाराच्या शेतातील धुºयावर असलेली नाली पूर्ववत केली, तर साचलेले पाणी सरळ नाल्यात निघून जाऊन अर्जदाराचे नुकसान टाळता येते. अर्जदार यांच्या शेताच्या धुºयावर असलेल्या नालीवर पायली टाकून त्यावर माती टाकल्यास अर्जदार यांच्या शेताला रस्ताही होतो, असे अहवालात नमूद आहे. त्या अहवालाला एक महिना लोटूनही शेतकºयाला न्याय मिळालेला नाही.

Web Title: Drain water flooded the field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.