शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भाजपाने शंभरचा आकडा केला पार, काँग्रेस १९, ठाकरेंची शिवसेना ९; जाणून घ्या नगर पंचायत अन् नगर परिषदेचे निकाल
2
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
3
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
4
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
5
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
6
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
7
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
8
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
9
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
10
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
11
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
12
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
13
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
14
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
15
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
16
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
17
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
18
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
19
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
20
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
Daily Top 2Weekly Top 5

बदली हवी तर मंत्रालयात जाऊ नका, वनाधिकाऱ्यांना सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 10:53 IST

वनबल प्रमुखांचे आदेश : आरएफओंची मलईदार जागेसाठी मोर्चेबांधणी

गणेश वासनिक लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्यातील बदलीपात्र वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी (आरएफओ) मे महिन्यात होणाऱ्या बदल्यांच्या पार्श्वभूमीवर आतापासूनच मंत्रालयात 'फिल्डिंग' लावण्यास सुरुवात केली आहे. यावर वनमंत्री गणेश नाईक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यानंतर राज्याच्या वनबल प्रमुखांनी एका आदेशाद्वारे उपवनसंरक्षक ते आरएफओंना बदलीसाठी मंत्रालयात जाण्यास बंदी घातली आहे.

राज्यात ९६३ आरएफओ आणि ३०० सहायक वनसंरक्षक कार्यरत आहेत. दरवर्षी १४०च्या आसपास अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय आणि विनंती बदल्या मंत्रालयातून होतात. तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आरएफओंच्या बदल्यांचे अधिकार वनबल प्रमुखांकडे दिले होते. आरएफओंच्या बदल्यांमध्ये राजकीय शिफारशी, ओळखी व आर्थिक व्यवहार यामुळे अनेकदा नियमबाह्य बदल्या होतात. या बदल्यांमुळे वनविभागाची प्रतिमा मलीन होत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. त्यामुळे नियमात बसणाऱ्या आरएफओंना बदलीतून डावलले जाते. परिणामी, मे महिन्यात होणाऱ्या बदल्या लक्षात घेता ओळखीच्या मंत्र्यांच्या शिफारशींसाठी अनेक आरएफओंनी मंत्रालयात येरझाऱ्या सुरू केल्याची बाब वन प्रशासनाच्या निदर्शनास आली आहे. 

वनबल प्रमुखांचे २८ फेब्रुवारी रोजी आदेशवनविभागाच्या प्रधान मुख्य वनसंरक्षक शोमिता बिश्वास यांच्या २८ फेब्रुवारी २०२४ रोजीच्या पत्रानुसार वनविभागातील अधिकारी, कर्मचारी हे बदली अथवा पदस्थापनेकरिता थेट मंत्रालयात पत्रव्यवहार करीत असल्याप्रकरणी वनमंत्री गणेश नाईक यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ही बाब वनबल प्रमुखांनी गांभीर्याने घेत बदलीपात्र वनाधिकाऱ्यांनी थेट मंत्रालयात पत्रव्यवहार न करता नियंत्रक अधिकाऱ्यांमार्फत पत्रव्यवहार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. केवळ अपवादात्मक परिस्थितीत वनमंत्र्यांना भेटण्याची मुभा देण्यात आलेली आहे.

आरएफओ, एसीएफ यांची मंत्रालयात लॉबिंगमे महिन्यात होणाऱ्या बदल्या लक्षात घेता वनपरिक्षेत्र अधिकारी, सहायक वनसंरक्षक हे सध्या मंत्रालयात लॉबिंग करीत आहेत. ओळखीतील मंत्री, आमदार, खासदारांच्या शिफारशींचा सिलसिलादेखील सुरू झाला आहे. बदलीकरिता पत्र घेतले जात आहे. बदलीसाठी राजकीय पत्र घेणे हे शिस्तीला धरून नसले तरी मध्यंतरी आरएफओंच्या बदलीकरिता राजकीय वशिलेबाजी झाल्याची बाब 'लोकमत'ने चव्हाट्यावर आणली, हे विशेष.

वनविभागात 'प्रादेशिक'ला पसंतीसध्या सामाजिक वनीकरण कोमात गेले आहे. त्यामुळे बदलीपात्र आरएफओ, एसीएफ हे प्रादेशिक वनपरिक्षेत्राला पसंती देत आहेत. अर्थकारणाच्या पाठबळावर काही अधिकारी 'प्रादेशिक'मध्ये सहजतेने पोस्टिंग मिळवितात. त्यामुळे अशा या कारभारावर वनमंत्री नाईक लगाम लावणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

टॅग्स :Amravatiअमरावती