शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

डॉक्टरांना बदनाम कराल तर याद राखा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 22:38 IST

शहरात डेंग्यू आजाराने थैमान घातले आहे, खासगी डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करून रुग्णांना डेंग्यूच्या आजारातून बाहेर काढण्यासाठी अहोरात्र झटत आहेत. अशा स्थितीत डॉक्टरांचे बळ वाढविण्याऐवजी त्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाते, अशा संतप्त भावना व्यक्त करून अमरावती इंडियन मेडिकल असोसिएशनने या मानसिकतेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला.

ठळक मुद्देआयएमएचा इशारा : हा तर राजकीय पोळी शेकण्याचा डाव

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरात डेंग्यू आजाराने थैमान घातले आहे, खासगी डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करून रुग्णांना डेंग्यूच्या आजारातून बाहेर काढण्यासाठी अहोरात्र झटत आहेत. अशा स्थितीत डॉक्टरांचे बळ वाढविण्याऐवजी त्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाते, अशा संतप्त भावना व्यक्त करून अमरावती इंडियन मेडिकल असोसिएशनने या मानसिकतेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला.वैयक्तिक स्वार्थ आणि राजकीय पोळी शेकण्याच्या उद्देशाने डॉक्टरांचे केले जाणारे खच्चीकरण आणि चारित्र्यहनन निषेधार्ह आहे. यापुढे राजकीय पोळी शेकण्याकरिता डॉक्टरांचे नाव वापरून बदनाम केल्यास, त्याद्वारे समाजमन कलुषित केल्यास, आम्हाला गृहीत धरल्यास खबरदार! याद राखा - सडेतोड उत्तर देण्यास आम्हीही सक्षम आहोत, असा इशाराही आयएमएने दिला आहे.कायदेशीर मार्ग अवलंबावेरूग्णालय वा डॉक्टरांविषयी कुणाला काही तक्रार असल्यास ग्राहक मंच, आय.एम.ए., मेडिकल कौन्सिल आॅफ इंडिया अथवा महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडे तक्रार करण्याचे कायदेशीर मार्ग उपलब्ध आहेत. तथापि स्वत: न्यायाधीश बनून समाज व डॉक्टर यांच्यातील विश्वासाच्या धाग्यांची वीण उसविणे कितपत योग्य, असा सवालही आयएमएच्या सभेत उपस्थित करण्यात आला.केसपेपर्स देऊच, तुमच्याकडेआहेत काय तज्ज्ञ डॉक्टर ?स्थानिक प्रशासनाला हाताशी धरून डॉक्टरांची मुस्कटदाबी करण्याचा निंदनीय प्रकार सुरू झालेला आहे. महानगर पालिका प्रशासनाने सर्व रूग्णालयांना काही महिन्यांपासून रुग्णालयांमध्ये दाखल झालेल्या डेंग्यूच्या रूग्णांचे तपासणी रिपोर्ट व इस्पितळातील कागदपत्रे मागवण्याची प्रक्रिया सुरू केली. माध्यमांतून तशी वृत्ते प्रसिद्ध झाली. हवे ते केसपेपर्स देण्यास आमची ना नाही; परंतु रुग्णांना बघितल्याशिवाय केवळ केसपेपर्सवरून निर्णायक मत नोंदविणारे उच्चविद्याविभूषित डॉक्टर महापालिकेकडे उपलब्ध आहेत काय, असा सवाल आयएमएने महापालिकेला केला आहे. तसे डॉक्टर नसतील, तर केसपेपर्स देण्याच्या प्रक्रियेला अर्थ उरतो तरी काय, असाही सूर उमटला.डॉक्टर व इस्पितळांनी रुग्ण आणि त्यांच्या आजारासंबंधी गोपनियता बाळगणे बंधनकारक आहे. महापालिकेला पुरविण्यात आलेले केसपेर्स लीक झाल्यास त्याला जबाबदार कोण राहील, याचेही उत्तर महापालिकेने द्यावे, असे मत डॉक्टरांनी व्यक्त केले.का संतापले डॉक्टर्स? काय आहे प्रकरण?शहरात डेंग्यूचे थैमान आहे. महापालिकेकडे तज्ज्ञ डॉक्टरांची वैद्यकीय चमू नाही. खासगी डॉक्टरांकडे डेंग्यूच्या रुग्णांचा ओघ वाढला आहे. झोपही अशक्य व्हावी इतके डॉक्टर डेंग्यू आणि इतर साथीच्या रुग्णांमध्ये व्यस्त असताना, ज्यांनी डेंग्यू असल्याचे निदान केले, अशा डॉक्टरांचेच केसपेपर महापालिकेने मागविले. त्या केसपेपर्सची तपासणी करून त्यात काही गैर आढळल्यास संबंधित डॉक्टरांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही महापालिकेच्या बैठकीत देण्यात आला होता. या कृतीमुळे डॉक्टरांवर अविश्वास तयार झाला आहे. डेंग्यू नसतानाही डेंग्यू असल्याचे सांगितले जात आहे. नागरिकांची लूट केली जात आहे, असे चित्र उभे केले गेले. प्रामाणिक प्रयत्नांना असे बदनाम केले जात असल्याने डॉक्टरांची संघटना संतप्त झाली आहे.

अपयश महापालिकेचे, खापर डॉक्टरांवरडास निर्मूलनात आलेले अपयश, शहरात सर्वत्र विखुरलेला ओला कचरा, पावसानंतर तुंबलेल्या नाल्या, रखडलेली भुयारी गटार योजना आदी बाबींमुळे डेंग्यू आणि इतर विषाणूजन्य आजारांचा उद्रेक रोखण्यास प्रशासन कमजोर पडले. याचे खापर मात्र डॉक्टरांच्या माथी फोडले. अमरावती शहरात डेंग्यूच नसल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत महापालिकेतील बैठकीत निष्पन्न झाल्याच्या बातम्या काही वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध केल्या गेल्या, हे हास्यास्पद असल्याचे मत नोंदवून खरे तर डेंग्यूचा उद्रेक झाल्यानंतर स्थिती हाताळण्यास महापालिका प्रशासनाकडे सक्षम आरोग्ययंत्रणाच अस्तित्वात नाही, हे वास्तव डॉक्टरांनी उघड केले.एनएस-वन सक्षम चाचणीमहाराष्ट्रात उच्चस्तरावर शासकीय सेवेत असणाऱ्या सूक्ष्मजीवशास्त्रज्ञांचा हवाला देऊन आयएमएने सर्व प्रशासन आणि समाजाला उद्देशून एनएस-वन ही चाचणी सक्षम असल्याच्या माहितीवर शिक्कामोर्तब केले. खासगी पॅथॉलॉजीस्तरावर उपलब्ध असलेली डेंग्यू रोगनिदानासाठीची एनएस-१ चाचणी नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ व्हायरॉलॉजीद्वारे यवतमाळ मेडिकल कॉलेज येथे उपलब्ध करविलेल्या इतर चाचण्यांइतक्याच सक्षम असल्याचे आयएमएने स्पष्ट केले आहे.एनएस-वन अँटिजन चाचणी आजाराच्या अगदी सुरुवातीच्या काळात पॉझीटीव्ह येते. त्याच्या आधारे होणारे निदान ग्राह्य धरले जाते. तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यवतमाळ येथे करण्यात येणारी आय.जी.एम. ही चाचणी अँटीबॉडी चाचणी आहे. ती आठवडाभरानंतर पॉझिटिव्ह येते. या दोन्ही चाचण्या भिन्न असून, आपापल्या जागी निर्णायक आहेत. त्यांची तुलना करता येत नाही, असेही आयएमएने महानगर प्रशासनाला ठणकावले आहे. चाचण्यांच्या मुद्यांवरूनच महापालिका प्रशासनाने शहरातील तमाम डॉक्टरांवर अविश्वासाची राळ उठविली होती. नोटीशीही जारी केल्या होत्या, हे येथे उल्लेखनीय.का केले जाते रुग्णाला दाखल?नुसते डेंग्यू पॉझिटिव्ह आहे म्हणून रुग्णाला भरती केले जात नाही. एनएस-वन चाचणी पॉझिटिव्ह असेल, प्लेटलेट्स व पांढºया पेशी कमी झालेल्या असतील आणि रुग्णामध्ये डेंग्यूची लक्षणे दिसत असतील अथवा आय.जी.जी., आय.जी.एम. चाचणी पॉझिटिव्ह असेल, प्लेटलेट्स व पांढºया पेशी कमी झालेल्या असतील आणि रुग्णामध्ये डेंग्यूची लक्षणे असतील, याशिवाय रुग्णाला १०३ च्या वर ताप येत असेल, उलटी येणे, चक्कर येणे, अन्नावरची वासना उडणे अशी लक्षणे दिसत असतील, त्यामुळे शरीरातील पाणी व क्षार कमी झाले असेल, श्वास घेण्यास त्रास, पोटदुखी, लघवी कमी होणे, तीव्र पोटशूळ उठणे, शरीरावर पुरळ, हृदयाची मंदावलेली गती, रक्तातील आॅक्सिजनचे मंदावलेले पामाण आणि किंवा डेंग्यूच्या विषाणूमुळे शरीरातील एक किंवा अनेक अवयव बाधित झालेले असतील, याव्यतिरिक्त खालावलेल्या तब्येतीमुळे नातेवाइकांचा रूग्णास भरती करून घेण्याचा आग्रह असेल, तरच रुग्णाला भरती केले जाते. हल्ली अनेक विषाणूजन्य आजारांच्या साथी सुरू आहेत. त्यात ही लक्षणे दिसल्यास रुग्णाला भरती करून उपचार देण्याची गरज असते.