शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीत होत असलेल्या दंगलीमागे भाजपचेच राजकारण; काँग्रेसचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2022 18:20 IST

राज्यात भाजपकडे सत्ता नसल्याने, जातीय दंगल घडवून आणायची आणि त्याचे खापर काँग्रेसवर फोडायचे हे इतकेच काम भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून केले जात आहे, असा आरोप जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी केला.

ठळक मुद्दे पालकमंत्र्यांना मास्टरमाइंड म्हणणाऱ्या अनिल बोंडेंचे डोके ठिकाणावर आहे का? : बबलू देशमुख

अमरावती : जिल्ह्यात होत असलेल्या या जातीय दंगलीमध्ये भाजपचेच दूषित राजकारण कारणीभूत आहे, पालकमंत्र्यांना दंगलीचा मास्टर माइंड म्हणणाऱ्या अनिल बोंडे यांचे डोके ठिकाणावर आहे का, असा प्रश्न उपस्थित करीत काँग्रेसला बदनाम करण्याचे षडयंत्र केले तर याद राखा, असा इशारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी डॉ. अनिल बोंडे यांना दिला आहे.

समाजात जातीय तेढ आपणच निर्माण करायची आणि त्याचे खापर काँग्रेसवर फोडायचे, एवढेच काम आता भाजप करीत आहे. भाजपच्या हातून सत्ता गेल्याने अपयशी ठरलेल्या भाजपच्या या स्वयंघोषित राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसह पालकमंत्री यशोमती ठाकूर यांना बदनाम करण्याचा प्रयत्न चालविलेला आहे, असेही ते म्हणाले.

अचलपूर येथे झालेला दोन गटातील वादाच्या प्रकारानंतर पोलिसांनी याप्रकरणी भाजपच्या एका पदाधिकाऱ्याला अटक केली. सदर प्रकरण चिघळू नये याकरिता प्रशासनासह काँग्रेसच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीत आहेत, अशातच स्वत:ला नेता समजणारे डॉ. अनिल बोंडे या प्रकरणावर मीठ चोळून प्रकरण चिघळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. यापूर्वीदेखील अमरावती शहरात झालेल्या दंगलीमध्ये कुणाचा हात होता हे सर्वश्रुत आहे. देशात आजवर ज्या दंगली घडल्या त्यातही कोणाचा हात होता हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे काँग्रेसवर आरोप करण्याऐवजी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्याच पक्षाचा इतिहास वाचावा, काँग्रेसने आजवर समाजात केवळ शांतता राखण्याचे काम केले आहे. परंतु या शांतीला भंग करण्याचे काम करू नये, असा सल्लाही देशमुख यांनी भाजपला दिला आहे.

राज्यात भाजपकडे सत्ता नसल्याने, जातीय दंगल घडवून आणायची आणि त्याचे खापर काँग्रेसवर फोडायचे हे इतकेच काम भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून केले जात आहे, असा आरोपदेखील यावेळी बबलू देशमुख यांनी केला. जिल्ह्यातील ही गंभीर परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे काम प्रशासन, पालकमंत्री यांच्यासह काँग्रेसच्या वतीने केले जात आहे. पालकमंत्र्यांनी परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे, असे असताना केवळ प्रसिद्धीसाठी बोंडे काँग्रेसवर निरर्थक आरोप करीत आहेत, त्यामुळे अनिल बोंडे यांनी बोलताना आपली जीभ सांभाळून बोलावे, असे बबलू देशमुख यांनी म्हटले आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणAnil Bondeअनिल बोंडेYashomati Thakurयशोमती ठाकूरBJPभाजपाcongressकाँग्रेस