शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीत होत असलेल्या दंगलीमागे भाजपचेच राजकारण; काँग्रेसचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2022 18:20 IST

राज्यात भाजपकडे सत्ता नसल्याने, जातीय दंगल घडवून आणायची आणि त्याचे खापर काँग्रेसवर फोडायचे हे इतकेच काम भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून केले जात आहे, असा आरोप जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी केला.

ठळक मुद्दे पालकमंत्र्यांना मास्टरमाइंड म्हणणाऱ्या अनिल बोंडेंचे डोके ठिकाणावर आहे का? : बबलू देशमुख

अमरावती : जिल्ह्यात होत असलेल्या या जातीय दंगलीमध्ये भाजपचेच दूषित राजकारण कारणीभूत आहे, पालकमंत्र्यांना दंगलीचा मास्टर माइंड म्हणणाऱ्या अनिल बोंडे यांचे डोके ठिकाणावर आहे का, असा प्रश्न उपस्थित करीत काँग्रेसला बदनाम करण्याचे षडयंत्र केले तर याद राखा, असा इशारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी डॉ. अनिल बोंडे यांना दिला आहे.

समाजात जातीय तेढ आपणच निर्माण करायची आणि त्याचे खापर काँग्रेसवर फोडायचे, एवढेच काम आता भाजप करीत आहे. भाजपच्या हातून सत्ता गेल्याने अपयशी ठरलेल्या भाजपच्या या स्वयंघोषित राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसह पालकमंत्री यशोमती ठाकूर यांना बदनाम करण्याचा प्रयत्न चालविलेला आहे, असेही ते म्हणाले.

अचलपूर येथे झालेला दोन गटातील वादाच्या प्रकारानंतर पोलिसांनी याप्रकरणी भाजपच्या एका पदाधिकाऱ्याला अटक केली. सदर प्रकरण चिघळू नये याकरिता प्रशासनासह काँग्रेसच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीत आहेत, अशातच स्वत:ला नेता समजणारे डॉ. अनिल बोंडे या प्रकरणावर मीठ चोळून प्रकरण चिघळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. यापूर्वीदेखील अमरावती शहरात झालेल्या दंगलीमध्ये कुणाचा हात होता हे सर्वश्रुत आहे. देशात आजवर ज्या दंगली घडल्या त्यातही कोणाचा हात होता हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे काँग्रेसवर आरोप करण्याऐवजी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्याच पक्षाचा इतिहास वाचावा, काँग्रेसने आजवर समाजात केवळ शांतता राखण्याचे काम केले आहे. परंतु या शांतीला भंग करण्याचे काम करू नये, असा सल्लाही देशमुख यांनी भाजपला दिला आहे.

राज्यात भाजपकडे सत्ता नसल्याने, जातीय दंगल घडवून आणायची आणि त्याचे खापर काँग्रेसवर फोडायचे हे इतकेच काम भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून केले जात आहे, असा आरोपदेखील यावेळी बबलू देशमुख यांनी केला. जिल्ह्यातील ही गंभीर परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे काम प्रशासन, पालकमंत्री यांच्यासह काँग्रेसच्या वतीने केले जात आहे. पालकमंत्र्यांनी परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे, असे असताना केवळ प्रसिद्धीसाठी बोंडे काँग्रेसवर निरर्थक आरोप करीत आहेत, त्यामुळे अनिल बोंडे यांनी बोलताना आपली जीभ सांभाळून बोलावे, असे बबलू देशमुख यांनी म्हटले आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणAnil Bondeअनिल बोंडेYashomati Thakurयशोमती ठाकूरBJPभाजपाcongressकाँग्रेस