शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

अमरावतीत होत असलेल्या दंगलीमागे भाजपचेच राजकारण; काँग्रेसचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2022 18:20 IST

राज्यात भाजपकडे सत्ता नसल्याने, जातीय दंगल घडवून आणायची आणि त्याचे खापर काँग्रेसवर फोडायचे हे इतकेच काम भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून केले जात आहे, असा आरोप जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी केला.

ठळक मुद्दे पालकमंत्र्यांना मास्टरमाइंड म्हणणाऱ्या अनिल बोंडेंचे डोके ठिकाणावर आहे का? : बबलू देशमुख

अमरावती : जिल्ह्यात होत असलेल्या या जातीय दंगलीमध्ये भाजपचेच दूषित राजकारण कारणीभूत आहे, पालकमंत्र्यांना दंगलीचा मास्टर माइंड म्हणणाऱ्या अनिल बोंडे यांचे डोके ठिकाणावर आहे का, असा प्रश्न उपस्थित करीत काँग्रेसला बदनाम करण्याचे षडयंत्र केले तर याद राखा, असा इशारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी डॉ. अनिल बोंडे यांना दिला आहे.

समाजात जातीय तेढ आपणच निर्माण करायची आणि त्याचे खापर काँग्रेसवर फोडायचे, एवढेच काम आता भाजप करीत आहे. भाजपच्या हातून सत्ता गेल्याने अपयशी ठरलेल्या भाजपच्या या स्वयंघोषित राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसह पालकमंत्री यशोमती ठाकूर यांना बदनाम करण्याचा प्रयत्न चालविलेला आहे, असेही ते म्हणाले.

अचलपूर येथे झालेला दोन गटातील वादाच्या प्रकारानंतर पोलिसांनी याप्रकरणी भाजपच्या एका पदाधिकाऱ्याला अटक केली. सदर प्रकरण चिघळू नये याकरिता प्रशासनासह काँग्रेसच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीत आहेत, अशातच स्वत:ला नेता समजणारे डॉ. अनिल बोंडे या प्रकरणावर मीठ चोळून प्रकरण चिघळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. यापूर्वीदेखील अमरावती शहरात झालेल्या दंगलीमध्ये कुणाचा हात होता हे सर्वश्रुत आहे. देशात आजवर ज्या दंगली घडल्या त्यातही कोणाचा हात होता हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे काँग्रेसवर आरोप करण्याऐवजी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्याच पक्षाचा इतिहास वाचावा, काँग्रेसने आजवर समाजात केवळ शांतता राखण्याचे काम केले आहे. परंतु या शांतीला भंग करण्याचे काम करू नये, असा सल्लाही देशमुख यांनी भाजपला दिला आहे.

राज्यात भाजपकडे सत्ता नसल्याने, जातीय दंगल घडवून आणायची आणि त्याचे खापर काँग्रेसवर फोडायचे हे इतकेच काम भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून केले जात आहे, असा आरोपदेखील यावेळी बबलू देशमुख यांनी केला. जिल्ह्यातील ही गंभीर परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे काम प्रशासन, पालकमंत्री यांच्यासह काँग्रेसच्या वतीने केले जात आहे. पालकमंत्र्यांनी परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे, असे असताना केवळ प्रसिद्धीसाठी बोंडे काँग्रेसवर निरर्थक आरोप करीत आहेत, त्यामुळे अनिल बोंडे यांनी बोलताना आपली जीभ सांभाळून बोलावे, असे बबलू देशमुख यांनी म्हटले आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणAnil Bondeअनिल बोंडेYashomati Thakurयशोमती ठाकूरBJPभाजपाcongressकाँग्रेस