शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ठाण्यात EVM पडले बंद
2
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
3
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
4
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
5
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
6
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
7
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
8
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
9
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
10
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
11
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
12
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
13
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
14
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
15
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
16
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
17
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
18
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
19
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
20
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट

जिल्हा मध्यवर्ती बँकेने शेतकऱ्यांना कर्ज नाकारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 4:15 AM

वरूड : तोट्यातली शेती करूनही दरवर्षी कृषी कर्ज नियमित भरत आलेल्या शेतकऱ्यांना अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वरूड शाखेने ...

वरूड : तोट्यातली शेती करूनही दरवर्षी कृषी कर्ज नियमित भरत आलेल्या शेतकऱ्यांना अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वरूड शाखेने कृषी कर्ज नाकारल्याने वघाळ सेवा सहकारी सोसायटीच्या शेतकरी सभासदांमध्ये रोष निर्माण झाला आहे.

३१ मार्चच्या आत कृषी कर्ज भरायचे व पुन्हा नव्या शेती हंगामासाठी कर्ज उचलायचे. या बळावर आजतागायत शेती कसणाऱ्या इथल्या शेतकऱ्यांना वरूडच्या बँक अधिकाऱ्याच्या आडमुठेपणामुळे मनस्ताप सहन करण्याची वेळ आली आहे.

वघाळ येथे उपसा जलसिंचन योजना असून असंख्य शेतकऱ्यांनी शेतजमिनी गहाण ठेवून ४०० हेक्टर जमीन सिंचनाखाली आणली. वर्धा नदीवरील झुंज धबधब्यावर कोल्हापुरी बंधाऱ्याच्या पाण्यावर या योजनेंतर्गत सिंचन सुरू आहे. या योजनेच्या बळावर वघाळ संत्रा मोसंबी बागांनी बहरलेले एक गाव आहे.

गेल्या तीन दशकांपासून ही उपसा जलसिंचन योजना असून आर्थिक संकटात सापडलेल्या इथल्या शेतकऱ्यांवर थकबाकी आहे. अनेकवेळा शासनाकडे उपसा जलसिंचन योजनेच्या कर्ज माफीबाबत पाठपुरावा केला. उपसा जलसिंचन योजनेच्या थकबाकीचा व अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या कृषी कर्जाचा परस्पर संबंध नसताना अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कृषी कर्ज मंजुरी अधिकाऱ्याने नवीन अट घालणे म्हणजे आश्चर्यच. यंदा कृषीकर्ज मंजुरी अधिकाऱ्याने वघाळच्या शेतकऱ्यांपुढे उपसा जलसिंचन योजनेची थकबाकी भरा, अन्यथा कृषीकर्ज नाही, असा अजब निर्वाळा दिला. शेतकरीहीत जोपासणारे माजी अध्यक्ष बबलू देशमुख यांनी लक्ष घालण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.