शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
2
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
3
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
5
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
6
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
7
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
8
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
9
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
10
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
11
दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 
12
Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?
13
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
14
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
15
Anna Hazare: पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
16
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
17
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
18
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
19
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
20
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी

‘सुपर’मध्ये ८६१० रुग्णांचे डायलेसिस, तर सहा किडनी शस्त्रक्रिया

By उज्वल भालेकर | Updated: April 5, 2023 18:15 IST

किडनीचा आजार झाल्यास डायलिसिस किंवा किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेशिवाय इतर कोणताही पर्याय नाही. 

अमरावती : किडनीचा आजार झाल्यास डायलिसिस किंवा किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेशिवाय इतर कोणताही पर्याय नाही. परंतु हे उपचार सर्वसामान्य रुग्णांना परवडणारे नाहीत; परंतु विभागीय संदर्भ रुग्णालय (सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल) येथे मागील ११ महिन्यांमध्ये ८,६१० रुग्णांवर डायलेसिस उपचार, तर सहा रुग्णांना किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी करून त्यांचे प्राण वाचविण्यात आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली. बदलत्या जीवनशैलीमुळे जिल्ह्यातही किडनी आजाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.

किडनी हा मानवाच्या सर्वांत महत्त्वाच्या अवयवांपैकी एक अवयव आहे. शरीरातील विष किंवा कचरा काढून टाकणे, शरीरातील रक्त आणि अतिरिक्त द्रव पदार्थ बाहेर फेकणे आणि स्वच्छ करणे, लाल रक्तपेशींसाठी हार्माेन्स तयार करणे, तसेच व्हिटॅमिन-डीचे शोषण वाढविण्याचे काम किडनी करते. बदलती जीवनशैली खाण्या-पिण्याच्या वाईट सवयी यामुळे आरोग्यावर दुष्परिणाम होत असून, याचा सर्वाधिक परिणाम हा किडनीवर होत असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मागील अकरा महिन्यांत ८,६१० रुग्णांवर डायलेसिस उपचार करण्यात आले आहेत.

दरमहा अशी आहे डायलेसिस रुग्णांची आकडेवारी

  • एप्रिल ७०९
  • मे             ७३०
  • जून             ७७५
  • जुलै            ७८७
  • ऑगस्ट ७५७
  • सप्टेंबर ७२५
  • ऑक्टोबर ६८३
  • नोव्हेंबर ७५३
  • डिसेंबर ९१६
  • जानेवारी ९१०
  • फेब्रुवारी ८६५
  • एकूण ८,६१०

 डायलेसिस मशीनद्वारे अशुद्ध घटक बाहेर काढून शुद्ध रक्ताचा पुरवठाकिडनी निकामी ठरल्यानंतर रुग्णाला वाचविण्यासाठी डायलेसिस हा पर्याय उत्तम ठरतो. सुपरच्या डायलेसिस युनिटमध्ये एकूण १९ मशीन आहेत. या मशीनद्वारे रुग्णांच्या शरीरातील रक्तातील अशुद्ध घटक बाहेर फेकून शुद्ध रक्त शरीरात पुरविले जाते. ही मशीन किडनीसारखेच कृत्रिमरीत्या काम करते. किडनीग्रस्त रुग्ण हा डायलेसिस उपचार घेऊन १५ वर्षांपासून जास्त काळ जगू शकतो.

ही लक्षणे आढळताच डॉक्टरांचा सल्ला घ्याकिडनी निकामी झाल्याचे काही लक्षणावरून दिसून येते. यामध्ये लघवीचा रंग बदलणे, सतत लघवीला होणे, लघवी करताना जळजळ होणे, घोट आणि पाय सुजणे, मळमळ किंवा उलट्या होणे, भूक न लागणे, चिडचिड होणे, अशक्तपणा आणि थकवा जाणवणे, पाठदुखी होणे, ओटीपोटात दुखणे अशी ही लक्षणे आहेत. त्यामुळे ही लक्षणे दिसताच तातडीने डॉक्टरांना दाखविणे गरजेचे आहे.

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डायलेसिसचे उपचार हे मोफत होतात. मागील अकरा महिन्यांमध्ये ८,६१० रुग्णांवर डायलिसिस उपचार केले आहेत. तर सहा रुग्णांची किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियादेखील यशस्वी केल्या आहेत. किडनीच्या आजारापासून दूर राहण्यासाठी खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीपासून दूर राहणे गरजेचे आहे. - डॉ. अमोल नरोटे, वैद्यकीय अधीक्षक, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. 

 

टॅग्स :Amravatiअमरावतीhospitalहॉस्पिटल