शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

‘सुपर’मध्ये ८६१० रुग्णांचे डायलेसिस, तर सहा किडनी शस्त्रक्रिया

By उज्वल भालेकर | Updated: April 5, 2023 18:15 IST

किडनीचा आजार झाल्यास डायलिसिस किंवा किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेशिवाय इतर कोणताही पर्याय नाही. 

अमरावती : किडनीचा आजार झाल्यास डायलिसिस किंवा किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेशिवाय इतर कोणताही पर्याय नाही. परंतु हे उपचार सर्वसामान्य रुग्णांना परवडणारे नाहीत; परंतु विभागीय संदर्भ रुग्णालय (सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल) येथे मागील ११ महिन्यांमध्ये ८,६१० रुग्णांवर डायलेसिस उपचार, तर सहा रुग्णांना किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी करून त्यांचे प्राण वाचविण्यात आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली. बदलत्या जीवनशैलीमुळे जिल्ह्यातही किडनी आजाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.

किडनी हा मानवाच्या सर्वांत महत्त्वाच्या अवयवांपैकी एक अवयव आहे. शरीरातील विष किंवा कचरा काढून टाकणे, शरीरातील रक्त आणि अतिरिक्त द्रव पदार्थ बाहेर फेकणे आणि स्वच्छ करणे, लाल रक्तपेशींसाठी हार्माेन्स तयार करणे, तसेच व्हिटॅमिन-डीचे शोषण वाढविण्याचे काम किडनी करते. बदलती जीवनशैली खाण्या-पिण्याच्या वाईट सवयी यामुळे आरोग्यावर दुष्परिणाम होत असून, याचा सर्वाधिक परिणाम हा किडनीवर होत असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मागील अकरा महिन्यांत ८,६१० रुग्णांवर डायलेसिस उपचार करण्यात आले आहेत.

दरमहा अशी आहे डायलेसिस रुग्णांची आकडेवारी

  • एप्रिल ७०९
  • मे             ७३०
  • जून             ७७५
  • जुलै            ७८७
  • ऑगस्ट ७५७
  • सप्टेंबर ७२५
  • ऑक्टोबर ६८३
  • नोव्हेंबर ७५३
  • डिसेंबर ९१६
  • जानेवारी ९१०
  • फेब्रुवारी ८६५
  • एकूण ८,६१०

 डायलेसिस मशीनद्वारे अशुद्ध घटक बाहेर काढून शुद्ध रक्ताचा पुरवठाकिडनी निकामी ठरल्यानंतर रुग्णाला वाचविण्यासाठी डायलेसिस हा पर्याय उत्तम ठरतो. सुपरच्या डायलेसिस युनिटमध्ये एकूण १९ मशीन आहेत. या मशीनद्वारे रुग्णांच्या शरीरातील रक्तातील अशुद्ध घटक बाहेर फेकून शुद्ध रक्त शरीरात पुरविले जाते. ही मशीन किडनीसारखेच कृत्रिमरीत्या काम करते. किडनीग्रस्त रुग्ण हा डायलेसिस उपचार घेऊन १५ वर्षांपासून जास्त काळ जगू शकतो.

ही लक्षणे आढळताच डॉक्टरांचा सल्ला घ्याकिडनी निकामी झाल्याचे काही लक्षणावरून दिसून येते. यामध्ये लघवीचा रंग बदलणे, सतत लघवीला होणे, लघवी करताना जळजळ होणे, घोट आणि पाय सुजणे, मळमळ किंवा उलट्या होणे, भूक न लागणे, चिडचिड होणे, अशक्तपणा आणि थकवा जाणवणे, पाठदुखी होणे, ओटीपोटात दुखणे अशी ही लक्षणे आहेत. त्यामुळे ही लक्षणे दिसताच तातडीने डॉक्टरांना दाखविणे गरजेचे आहे.

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डायलेसिसचे उपचार हे मोफत होतात. मागील अकरा महिन्यांमध्ये ८,६१० रुग्णांवर डायलिसिस उपचार केले आहेत. तर सहा रुग्णांची किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियादेखील यशस्वी केल्या आहेत. किडनीच्या आजारापासून दूर राहण्यासाठी खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीपासून दूर राहणे गरजेचे आहे. - डॉ. अमोल नरोटे, वैद्यकीय अधीक्षक, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. 

 

टॅग्स :Amravatiअमरावतीhospitalहॉस्पिटल