मेळघाट ते नर्मदा, १३ वर्षांपासून अविरत ३१ जणांचा जत्था
(फोटो कॅप्शन मेळघाट ते नर्मदा नऊ दिवसाच्या पदयात्रेत निघाले कटकुंभ परिसरातील भक्त)
काटकुंभ (चिखलदरा) : मेळघाटच्या काटकुंभ-चुरणी परिसरातील भक्त २८० किलोमीटर पदयात्रेसाठी सोमवारी कटकुंभ येथून रवाना झाले. ३१ भक्तांच्या पदयात्रेत गाव शिवारपर्यंत ग्रामस्थ महिला-पुरुष भक्तांनी सहभाग घेतला होता.
काटकुंभ येथून होशंगाबादनजीक असलेल्या सकलनपूर येथे नर्मदा नदीच्या तटावर नऊ दिवसांच्या प्रवासानंतर भक्तांचा जत्था पोहोचणार आहे. २००८ साली नऊ भक्तांनी प्रारंभ केलेली ही पदयात्रा आज १३ व्या वर्षी ३१ भक्तांच्या सहभागाने पदयात्रा सोमवारी रवाना झाली. दिवसानंतर जी पदयात्रा नर्मदेच्या काठी पोहोचणार आहे. तेथे पूजाअर्चा करून १३१ फूट लांब चुनरी, मातेच्या चरणी अर्पण केले जाणार आहे. या पदयात्रेत विजय राठौर, संदीप राठौर, सागर मोरले, विशाल राठी, राहुल जामूनकर, राहुल विजेकर, अभिसेक राठौर, आकाश मालवीय, विवेक राठौर, रौनक, शिवम राठौर, शिवा जयसवाल, राहुल गाठे, आकाश बेले, बाजी जामूनकर, बाबू ठाकरे, टीलू बेठेकर, संतोष आटोले, डालू सतवासे, विशाल गोहे, संजेश राठौर, सुनील झाडखडे, उमेश ठाकरे आदी भाविक सहभागी झाले आहेत.
010921\img-20210831-wa0155.jpg
मेळघाटातील भक्त निघाले पदयात्रेला