शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
6
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
7
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
8
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
9
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
10
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
11
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
12
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
13
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
14
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
15
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
16
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
17
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
18
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
19
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
20
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक

देवगावचा साखर कारखाना भंगारावस्थेकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 5:00 AM

शासन बेरोजगारी दूर होण्यासाठी नवीन उद्योगधंदे, कारखाने काढत आहे. दुसरीकडे कोट्यवधी रुपयांची मालमत्ता असलेल्या कारखान्याचा दुर्देवी अस्त होतो, हा शेतकऱ्यांचा पराजय म्हणावा लागेल. धामणगाव परिसर पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे सुजलाम् सुफलाम् बनावा, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, या उद्देशाने धामणगावचे कै. अण्णासाहेब देशमुख यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याकडून हक्काने साखर कारखाना मंजूर करवून घेतला.

ठळक मुद्देमिळणार का नवसंजीवनी : कोट्यवधींची साधनसामुग्री धूळखात, चोरीचे प्रमाण वाढले, लोकप्रतिनिधींचा लक्षवेध

लोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव दशासर : धामणगाव तालुक्यातील एकमेव देवगाव साखर कारखान्याचा लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे अस्त झाल्याने शेकडो कामगारांचा रोजगार हिरावला. कारखान्याची कोट्यवधींची मालमत्ता बेभाव विकण्यात आली, ही तालुक्यासाठी दुर्देवी बाब आहे.शासन बेरोजगारी दूर होण्यासाठी नवीन उद्योगधंदे, कारखाने काढत आहे. दुसरीकडे कोट्यवधी रुपयांची मालमत्ता असलेल्या कारखान्याचा दुर्देवी अस्त होतो, हा शेतकऱ्यांचा पराजय म्हणावा लागेल. धामणगाव परिसर पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे सुजलाम् सुफलाम् बनावा, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, या उद्देशाने धामणगावचे कै. अण्णासाहेब देशमुख यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याकडून हक्काने साखर कारखाना मंजूर करवून घेतला. शेकडो शेतकºयांना एकत्र आणून कोट्यवधी रुपयांचे शेअर्स जमवून पैसा उभारला व परिसरात ऊसाची लागवड नसतानाही वास्तू उभी केली. परंतु त्यांचे आकस्मिक निधन झाल्यानंतर त्यावेळचे तत्कालिन आमदार व राज्यमंत्री यशवंतराव शेरेकर यांनी साखर कारखान्याची धुरा खांद्यावर घेतली. बाहेरून ऊस आणून लाखो पोते साखर निर्मिती केली. संचालक मंडळाने राजीनामे देऊन कारखान्यावर प्रशासक नेमण्याची पाळी आली. परिणामी कारखाना डबघाईस आला. कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नव्हता.अनेकांनी यात हात धुवून घेतले.कारखान्यातील बराच माल चोरीस गेला, काही माल पोलिसांनी जप्त केला. परंतु तो स्वीकारण्यास कोणीही पुढे आले नाही. या परिसरात अप्पर वर्धा धरणाचे पाणी आल्याने कारखान्यासाठी लागणारा संपूर्ण ऊस परिसरात उत्पादित झाला असता. लोकप्रतिनिधींनी कारखाना सुरू करण्यासाठी ठोस पावले उचलली नाही. कारखान्यामुळे रहदारीस असलेला देवगाव चौक शांत दिसू लागला. शेतकºयांच्या आशा मावळल्या. ७ मार्च २००३ रोजी मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख तळेगाव दशासर येथे आले असता आमदार वीरेंद्र जगताप यांनी प्रास्ताविकातून देवगाव साखर कारखान्याचा गंभीर प्रश्न मुख्यमंत्र्यांसमोर मांडला होता. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले. परंतु आश्वासनपूर्ती झाली नाही.सदर कारखाना शासनाने अवसायनात काढून विक्रीस काढला. सदर कारखान्याची मालमत्ता विक्रीची निविदा मागविण्यात आली व त्यावेळच्या १२ कोटी रूपयांच्या कारखान्याची मालमत्तेची किंमत फक्त ३ कोटी रुपये ठेवण्यात आली. त्यात भंगारवाल्यांनी फक्त ८५ लाखांत मागणी केली. शासनाने तेथील यंत्राची किंमत ३ कोटी ६० लाख रुपये ठेवली असताना औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथील शरद सहकारी साखर कारखान्याने निविदेनुसार तीन कोटी सात लाख रुपयांची निविदा भरल्याने त्यांना देवगाव साखर कारखान्याची यंत्रे विकण्यात आल्याचे पत्र जिल्हाधिकाºयांनी दिल्यानुसार पैठण शेतकरी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा माजी आमदार चंद्रकांत घोडके यांना देण्यात आले. त्यांना देवगाव शेतकरी साखर कारखान्यावर सुरक्षा नेमण्याविषयी पत्र देण्यात आले. या पत्राचे संदर्भानुसार साखर आयुक्त पुणे यांचे पत्र शेतकरी साखर कारखाना देवगाव या साखर कारखान्याची मशिनरी विक्रीबाबतचे १८ जून २००६ रोजी पत्र प्राप्त झाले.

टॅग्स :businessव्यवसाय