कार्यालयाकडून अनामत रक्कम परत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:14 IST2021-03-01T04:14:43+5:302021-03-01T04:14:43+5:30
मोर्शी : फेब्रुवारी महिन्यात वाढता कोरोना संसर्ग आलेख पाहता, प्रशासनाने नवी नियमावली जाहीर करीत वर-वधूंसह २५ जणांनाच परवानगी दिल्याने ...

कार्यालयाकडून अनामत रक्कम परत!
मोर्शी : फेब्रुवारी महिन्यात वाढता कोरोना संसर्ग आलेख पाहता, प्रशासनाने नवी नियमावली जाहीर करीत वर-वधूंसह २५ जणांनाच परवानगी दिल्याने व गर्दी जमल्यास वधू पक्ष व कार्यालयाला दंड ठोठावण्याचे सुचित केल्याने लग्न समारंभ वधूच्या दारात संपन्न व्हायला सुरुवात झाली आहे. लग्न समारंभासाठी कोरोना नियमावलीत ५० जणांची परवानगी होती. तथापि, आचारी, कॅटरर्स, राबणाऱ्यांचीच संख्या त्याहून वर जात होती. साहजिकच लग्न समारंभात ५० च्या जागी ५०० सगेसोयरे जुळत होते.
विभागीय आयुक्तांनी १७ फेब्रुवारी रोजी नवीन आदेश जारी करताना मंगल कार्यालयाला दंडाची रक्कम वाढविताच मंगल कार्यालयांनी वधुपक्षांना अनामत रक्कम परत करीत कार्यालयातील लग्नच रद्द केले. कारण कुठल्याही परिस्थितीत वर-वधूसह २५ जणच उपस्थित राहणे शक्य नाही. त्यामुळे आता आमंत्रित नातेवाइकांना सोशल मीडिया व फोनवरून बदललेल्या स्थितीची माहिती देत घरूनच आशीर्वाद देण्याची विनंती केली जात आहे. नवीन कडक निर्बंध आल्याने मंगल कार्यालयांना दंडासह सील लागण्याच्या भीतीने कार्यालय संचालकांनी समारंभच नाकारले. शहरांसह ग्रामीण भागातही घरूनच लग्न समारंभ होताना दिसत आहेत.