शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

Video : ‘रुक्मिणीवल्लभ कृष्ण हरी’चा जयघोष; आमदार रवी राणांनी वारकऱ्यांसोबत घातली फुगडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2022 16:26 IST

वारकरी व भाविकांनी ‘रुक्मिणीवल्लभ कृष्ण हरी’चा एकच जयघोष केला. यावेळी भक्तिमय अभंगवाणी व टाळमृदंगाच्या साथीने आसमंत निनादून गेले होते.

ठळक मुद्देअंबानगरीत रुक्मिणीमातेच्या पालखीचे भव्य स्वागत

अमरावतीविदर्भातील ४२७ वर्षांची परंपरा असलेल्या श्री रुक्मिणीमातेच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले. तत्पूर्वी या पायदळ दिंडी पालखीचे सोमवारी सायंकाळी अमरावतीत आगमन झाले. यावेळी, शहरातील विविध ठिकाणी जल्लोषात पालखीचे स्वागत करण्यात आले. आमदार रवी राणा यांच्या हस्ते राजापेठ चौकात पालखीचे स्वागत करण्यात आले. राणांनी पूजन करून हनुमान चालीसा वाटप केली. यावेळी वारकऱ्यांनी फुगडीवर ताल धरला होता. आमदार राणांनाही फुगडी खेळण्याचा मोह आवरला नाही. त्यांनी वारकऱ्यांसोबत फुगडी खेळण्याचा आनंद लुटला.

विदर्भाची पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या कौंडण्यपूर येथील रुक्मिणीमातेची पालखी पंढरपूरकडे रवाना झाली आहे. मागील ४२८ वर्षांपासून ही पालखी दरवर्षी पंढरपूरला जात असते. दरम्यान, सोमवारी अमरावती येथे दाखल झालेल्या दिंडीचे राजापेठ मुख्य चौकात आमदार रवी राणा व युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी माता रुक्मिणीच्या पालखीचे भव्य स्वागत करून आशीर्वाद घेतले. शेतकरी बांधवांसाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाने हजेरी लावावी, अशी मनोकामना रवी राणा यांनी केली. 

पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यासह अनेक मान्यवरांकडून पूजन

शहरातील बियाणी चौकातही फटाक्यांची आतषबाजी तसेच टाळमृदुंगाच्या गजरात पालखीचे स्वागत व पूजन करण्यात आले. पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर, राजराजेश्वर महाराज यांच्यासह अनेक मान्यवरांनी पालखीपूजन व वारकऱ्यांचे स्वागत केले. श्री रामचंद्र युवक कल्याण संस्थेच्या वतीने तीन रुग्णवाहिकांचे लोकार्पण यावेळी करण्यात आले. पालखीच्या स्वागतानिमित्त बियाणी चौकात व्यासपीठ उभारण्यात येऊन श्री विठ्ठल व श्री रुक्मिणीमातेची मूर्ती ठेवण्यात आल्या होत्या. त्यासभोवती फुलांच्या माळा, रांगोळ्या, स्वागत फलकांनी संपूर्ण चौक सुशोभित करण्यात आला होता. वारकरी व भाविकांनी ‘रुक्मिणीवल्लभ कृष्ण हरी’चा एकच जयघोष केला. यावेळी भक्तिमय अभंगवाणी व टाळमृदंगाच्या साथीने आसमंत निनादून गेले होते.

प्रत्येक भाविकाला पालखीचे व्यवस्थित दर्शन घेता यावे यासाठी चौकाच्या मधोमध उभारलेल्या व्यासपीठावर पालखी थांबवून भाविकांना पूजन व दर्शनाची सोय करून देण्यात आली. कोविड साथीमुळे दोन वर्षांच्या निर्बंध संपल्यानंतर मुक्त वातावरणात पालखीचे अंबानगरीत आगमन झाल्यामुळे वारकरी बांधवांमध्ये उत्साह संचारला होता. श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथून श्रीक्षेत्र पंढरपूरकडे निघालेल्या पायदळ दिंडी पालखीच्या दर्शनासाठी शेकडो अमरावतीकर उपस्थित होते.  

टॅग्स :SocialसामाजिकRavi Ranaरवी राणाAmravatiअमरावती