शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
4
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
5
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
6
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
8
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
9
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
10
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
11
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
12
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
13
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
14
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
15
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
16
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
17
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
18
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
19
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
20
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल

Video : ‘रुक्मिणीवल्लभ कृष्ण हरी’चा जयघोष; आमदार रवी राणांनी वारकऱ्यांसोबत घातली फुगडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2022 16:26 IST

वारकरी व भाविकांनी ‘रुक्मिणीवल्लभ कृष्ण हरी’चा एकच जयघोष केला. यावेळी भक्तिमय अभंगवाणी व टाळमृदंगाच्या साथीने आसमंत निनादून गेले होते.

ठळक मुद्देअंबानगरीत रुक्मिणीमातेच्या पालखीचे भव्य स्वागत

अमरावतीविदर्भातील ४२७ वर्षांची परंपरा असलेल्या श्री रुक्मिणीमातेच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले. तत्पूर्वी या पायदळ दिंडी पालखीचे सोमवारी सायंकाळी अमरावतीत आगमन झाले. यावेळी, शहरातील विविध ठिकाणी जल्लोषात पालखीचे स्वागत करण्यात आले. आमदार रवी राणा यांच्या हस्ते राजापेठ चौकात पालखीचे स्वागत करण्यात आले. राणांनी पूजन करून हनुमान चालीसा वाटप केली. यावेळी वारकऱ्यांनी फुगडीवर ताल धरला होता. आमदार राणांनाही फुगडी खेळण्याचा मोह आवरला नाही. त्यांनी वारकऱ्यांसोबत फुगडी खेळण्याचा आनंद लुटला.

विदर्भाची पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या कौंडण्यपूर येथील रुक्मिणीमातेची पालखी पंढरपूरकडे रवाना झाली आहे. मागील ४२८ वर्षांपासून ही पालखी दरवर्षी पंढरपूरला जात असते. दरम्यान, सोमवारी अमरावती येथे दाखल झालेल्या दिंडीचे राजापेठ मुख्य चौकात आमदार रवी राणा व युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी माता रुक्मिणीच्या पालखीचे भव्य स्वागत करून आशीर्वाद घेतले. शेतकरी बांधवांसाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाने हजेरी लावावी, अशी मनोकामना रवी राणा यांनी केली. 

पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यासह अनेक मान्यवरांकडून पूजन

शहरातील बियाणी चौकातही फटाक्यांची आतषबाजी तसेच टाळमृदुंगाच्या गजरात पालखीचे स्वागत व पूजन करण्यात आले. पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर, राजराजेश्वर महाराज यांच्यासह अनेक मान्यवरांनी पालखीपूजन व वारकऱ्यांचे स्वागत केले. श्री रामचंद्र युवक कल्याण संस्थेच्या वतीने तीन रुग्णवाहिकांचे लोकार्पण यावेळी करण्यात आले. पालखीच्या स्वागतानिमित्त बियाणी चौकात व्यासपीठ उभारण्यात येऊन श्री विठ्ठल व श्री रुक्मिणीमातेची मूर्ती ठेवण्यात आल्या होत्या. त्यासभोवती फुलांच्या माळा, रांगोळ्या, स्वागत फलकांनी संपूर्ण चौक सुशोभित करण्यात आला होता. वारकरी व भाविकांनी ‘रुक्मिणीवल्लभ कृष्ण हरी’चा एकच जयघोष केला. यावेळी भक्तिमय अभंगवाणी व टाळमृदंगाच्या साथीने आसमंत निनादून गेले होते.

प्रत्येक भाविकाला पालखीचे व्यवस्थित दर्शन घेता यावे यासाठी चौकाच्या मधोमध उभारलेल्या व्यासपीठावर पालखी थांबवून भाविकांना पूजन व दर्शनाची सोय करून देण्यात आली. कोविड साथीमुळे दोन वर्षांच्या निर्बंध संपल्यानंतर मुक्त वातावरणात पालखीचे अंबानगरीत आगमन झाल्यामुळे वारकरी बांधवांमध्ये उत्साह संचारला होता. श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथून श्रीक्षेत्र पंढरपूरकडे निघालेल्या पायदळ दिंडी पालखीच्या दर्शनासाठी शेकडो अमरावतीकर उपस्थित होते.  

टॅग्स :SocialसामाजिकRavi Ranaरवी राणाAmravatiअमरावती