शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

मागणी ४६ कोटींची मिळाले २८ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 06:00 IST

गतवर्षी १७ ते २८ ऑक्टोबर दरम्यान काढणीला आलेले सोयाबीनला सडले. भिजलेल्या शेंगांमध्ये बीजांकुर निघाले. सोयाबीनचे ८० टक्कयांवर क्षेत्रात नुकसान झाले. सरकीमधूनही बीजांकुर निघाले. कापसाची प्रतवारी खराब झाली. बोंडअळीचा धोका वाढला. आंबिया बहराच्या फुटीसाठी ताण न मिळाल्याने संत्र्याचे नुकसान झाले. अवकाळीने केलेल्या नुकसानासाठी शासनाने प्रचलित निकषापेक्षा जास्त म्हणजेच हंगामी पिकांसाठी हेक्टरी आठ हजार व बहुवार्र्षिक पिकांसाठी १८ हजार रुपये अशी मदत जाहीर केली.

ठळक मुद्देअवकाळीचा मदतनिधी : आता चौथ्या टप्प्याच्या निधीची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दहा दिवसांच्या अवकाळीने ८० टक्के खरीप हंगाम बाधित झाल्यानंतर मदतनिधीसाठीही शासनाकडून खेळखंडोबा सुरू आहे. तिसऱ्या टप्प्यासाठी जिल्ह्याची ४५.९८ कोटींची मागणी असताना प्रत्यक्षात २७.८१ कोटींचा निधी शासनाने उपलब्ध केला. चौथ्या टप्प्याच्या १८.७७ कोटींसाठी शेतकऱ्यांना पुन्हा प्रतीक्षा करावी लागणार आहे.गतवर्षी १७ ते २८ ऑक्टोबर दरम्यान काढणीला आलेले सोयाबीनला सडले. भिजलेल्या शेंगांमध्ये बीजांकुर निघाले. सोयाबीनचे ८० टक्कयांवर क्षेत्रात नुकसान झाले. सरकीमधूनही बीजांकुर निघाले. कापसाची प्रतवारी खराब झाली. बोंडअळीचा धोका वाढला. आंबिया बहराच्या फुटीसाठी ताण न मिळाल्याने संत्र्याचे नुकसान झाले. अवकाळीने केलेल्या नुकसानासाठी शासनाने प्रचलित निकषापेक्षा जास्त म्हणजेच हंगामी पिकांसाठी हेक्टरी आठ हजार व बहुवार्र्षिक पिकांसाठी १८ हजार रुपये अशी मदत जाहीर केली. पहिल्या टप्प्यात ७२.४० कोटी, दुसऱ्या टप्प्यात १५८ कोटींची मदत मिळाली. तिसºया टप्प्यासाठी ४५ कोटी ९८ लाख ९२ हजार ६६५ रुपयांची मागणी जिल्हा प्रशासनाने केली असताना, सोमवारी २७ कोटी ८१ लाख ४३ हजार रुपये उपलब्ध झाले. त्यामुळे मदतीच्या चौथ्या टप्प्यासाठी पुन्हा प्रतीक्षा करावी लागणार आहे.असे आहे तिसऱ्या टप्प्याचे वाटपअवकाळीच्या मदतीच्या तिसऱ्या टप्प्यात भातकुली तालुक्यात २.२७ कोटी, तिवसा २.९६ कोटी, चांदूर रेल्वे २.९६ कोटी, धामणगाव रेल्वे २.९६ कोटी, नांदगाव खंडेश्वर २.९६ कोटी, मोर्शी १.७५ कोटी, अचलपूर २.९६ कोटी, चांदूर बाजार २.९६ कोटी, दर्यापूर २.९६ कोटी, अंजनगाव सुर्जी २.९६ कोटी, धारणी १० लाख तसेच अमरावती व चिखलदरा तालुक्यात मदतनिधीचे वाटप निरंक आहे.खरीप पिकांचे नुकसानसंयुक्त सर्वेक्षणानुसार ३ लाख ७४ हजार ८०४ शेतकऱ्यांच्या २ लाख १२ हजार ३२९ हेक्टरवरील सोयाबीन, १ लाख ३५ हजार ४७२ हेक्टरवरील कपाशी, ११ हजार ३६ हेक्टरवरील ज्वारी, २ हजार ७०६ हेक्टरवरील तूर, ५ हजार ६३ हेक्टरवरील मका, ५ हजार ५३८ हेक्टरवरील धान, १२६ हेक्टरवरील उडीद तसेच ७४७ हेक्टरवरील इतर पिकांचे नुकसान झाले. एकूण ३ लाख ७३ हजार १९ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांवर नुकसान झाले. याव्यतिरिक्त ४५२ हेक्टर बागायती पिके व ७८ हेक्टरवरील फळपिकांचे नुकसान झाले होते.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी