शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
3
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
4
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
5
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
6
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
7
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
8
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
9
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
10
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
11
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
12
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
13
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
14
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
15
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
16
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
17
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
18
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
19
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
20
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

मागणी ४६ कोटींची मिळाले २८ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 06:00 IST

गतवर्षी १७ ते २८ ऑक्टोबर दरम्यान काढणीला आलेले सोयाबीनला सडले. भिजलेल्या शेंगांमध्ये बीजांकुर निघाले. सोयाबीनचे ८० टक्कयांवर क्षेत्रात नुकसान झाले. सरकीमधूनही बीजांकुर निघाले. कापसाची प्रतवारी खराब झाली. बोंडअळीचा धोका वाढला. आंबिया बहराच्या फुटीसाठी ताण न मिळाल्याने संत्र्याचे नुकसान झाले. अवकाळीने केलेल्या नुकसानासाठी शासनाने प्रचलित निकषापेक्षा जास्त म्हणजेच हंगामी पिकांसाठी हेक्टरी आठ हजार व बहुवार्र्षिक पिकांसाठी १८ हजार रुपये अशी मदत जाहीर केली.

ठळक मुद्देअवकाळीचा मदतनिधी : आता चौथ्या टप्प्याच्या निधीची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दहा दिवसांच्या अवकाळीने ८० टक्के खरीप हंगाम बाधित झाल्यानंतर मदतनिधीसाठीही शासनाकडून खेळखंडोबा सुरू आहे. तिसऱ्या टप्प्यासाठी जिल्ह्याची ४५.९८ कोटींची मागणी असताना प्रत्यक्षात २७.८१ कोटींचा निधी शासनाने उपलब्ध केला. चौथ्या टप्प्याच्या १८.७७ कोटींसाठी शेतकऱ्यांना पुन्हा प्रतीक्षा करावी लागणार आहे.गतवर्षी १७ ते २८ ऑक्टोबर दरम्यान काढणीला आलेले सोयाबीनला सडले. भिजलेल्या शेंगांमध्ये बीजांकुर निघाले. सोयाबीनचे ८० टक्कयांवर क्षेत्रात नुकसान झाले. सरकीमधूनही बीजांकुर निघाले. कापसाची प्रतवारी खराब झाली. बोंडअळीचा धोका वाढला. आंबिया बहराच्या फुटीसाठी ताण न मिळाल्याने संत्र्याचे नुकसान झाले. अवकाळीने केलेल्या नुकसानासाठी शासनाने प्रचलित निकषापेक्षा जास्त म्हणजेच हंगामी पिकांसाठी हेक्टरी आठ हजार व बहुवार्र्षिक पिकांसाठी १८ हजार रुपये अशी मदत जाहीर केली. पहिल्या टप्प्यात ७२.४० कोटी, दुसऱ्या टप्प्यात १५८ कोटींची मदत मिळाली. तिसºया टप्प्यासाठी ४५ कोटी ९८ लाख ९२ हजार ६६५ रुपयांची मागणी जिल्हा प्रशासनाने केली असताना, सोमवारी २७ कोटी ८१ लाख ४३ हजार रुपये उपलब्ध झाले. त्यामुळे मदतीच्या चौथ्या टप्प्यासाठी पुन्हा प्रतीक्षा करावी लागणार आहे.असे आहे तिसऱ्या टप्प्याचे वाटपअवकाळीच्या मदतीच्या तिसऱ्या टप्प्यात भातकुली तालुक्यात २.२७ कोटी, तिवसा २.९६ कोटी, चांदूर रेल्वे २.९६ कोटी, धामणगाव रेल्वे २.९६ कोटी, नांदगाव खंडेश्वर २.९६ कोटी, मोर्शी १.७५ कोटी, अचलपूर २.९६ कोटी, चांदूर बाजार २.९६ कोटी, दर्यापूर २.९६ कोटी, अंजनगाव सुर्जी २.९६ कोटी, धारणी १० लाख तसेच अमरावती व चिखलदरा तालुक्यात मदतनिधीचे वाटप निरंक आहे.खरीप पिकांचे नुकसानसंयुक्त सर्वेक्षणानुसार ३ लाख ७४ हजार ८०४ शेतकऱ्यांच्या २ लाख १२ हजार ३२९ हेक्टरवरील सोयाबीन, १ लाख ३५ हजार ४७२ हेक्टरवरील कपाशी, ११ हजार ३६ हेक्टरवरील ज्वारी, २ हजार ७०६ हेक्टरवरील तूर, ५ हजार ६३ हेक्टरवरील मका, ५ हजार ५३८ हेक्टरवरील धान, १२६ हेक्टरवरील उडीद तसेच ७४७ हेक्टरवरील इतर पिकांचे नुकसान झाले. एकूण ३ लाख ७३ हजार १९ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांवर नुकसान झाले. याव्यतिरिक्त ४५२ हेक्टर बागायती पिके व ७८ हेक्टरवरील फळपिकांचे नुकसान झाले होते.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी