‘अचलपूर’ मिळविण्यासाठी भाजप गोटातून मागणी

By Admin | Updated: June 14, 2014 23:03 IST2014-06-14T23:03:42+5:302014-06-14T23:03:42+5:30

विविध पातळीवर नेतृत्त्वकौशल्य सिद्ध झालेल्या सुरेखा ठाकरे यांना उमेदवारी न मिळाल्यास त्या शिवसेनेत प्रवेश करतील, अशी जोरदार चर्चा जिल्हाभरात आहे. संजय खोडके आणि सुलभा खोडके राष्ट्रवादीत नसल्यामुळे

The demand from BJP Got to get 'Achalpur' | ‘अचलपूर’ मिळविण्यासाठी भाजप गोटातून मागणी

‘अचलपूर’ मिळविण्यासाठी भाजप गोटातून मागणी

अमरावती : विविध पातळीवर नेतृत्त्वकौशल्य सिद्ध झालेल्या सुरेखा ठाकरे यांना उमेदवारी न मिळाल्यास त्या शिवसेनेत प्रवेश करतील, अशी जोरदार चर्चा जिल्हाभरात आहे. संजय खोडके आणि सुलभा खोडके राष्ट्रवादीत नसल्यामुळे आता सुरेखा ठाकरे यांना पवार कुटुंब दुखावणार नाही, असा जाणकारांचा कयास आहे.
युतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेचा आहे; तथापि, शिवसेनेला या मतदारसंघात प्रस्थ निर्माण करता आले नाही. खासदारकी नसताना अनंत गुढे या मतदारसंघातून आमदारकीची निवडणूक पराभूत झाले होते. शिवसेनेच्या इतर नेत्यांनाही या मतदारसंघात पाय रोवता आले नाहीत. शिवसेनेचे दमदार नेतृत्त्वच त्यामुळे या मतदारसंघात निर्माण झाले नाही. ना चेहरा, ना क्षमता अशी शिवसेनेची स्थिती आहे. तरीही मतदारसंघ सेनेच्याच वाट्याला आहे. भाजपक्षाची या मतदारसंघात बांधणी चांगली आहे. रुपेश ढेपे आणि प्रकाश भारसाकळे हे दोन चेहरे भाजपकडे आहेत; तथापि, मतदारसंघ भाजपाच्या वपाट्याला नसल्यामुळे भाजपजनांची गोची आहे. यावेळी शिवसेनेऐवजी भाजपक्षाला मतदारसंघ द्यावा, अशी मागणी भाजप गोटातून सुरू आहे.
बच्चू कडू यांनी लोकसभेच्यावेळी रिपाइंला जाहीर समर्थन दिले होते. दलित मतांचा काही प्रमाणात बच्चू कडू यांना त्यामुळे लाभ होईल. रिपाइंकडून प्रताप अभ्यंकर यांच्या नावाची चर्चा आहे.
नातेवाईकांमुळे संकट
अचलपूर मतदारसंघात असलेल्या चांदूरबाजार नगरपालिका आणि शिरजगाव बंड ग्रामपंचायतीतील सत्ता बच्चू कडू यांच्यासाठी अडचणीचे मुद्दे ठरले आहेत. चांदूरबाजारच्या नगराध्यक्षपदी बच्चू यांनी त्यांच्या बहीण सरोजिनी हरणे यांना विराजमान केले. श्रमपूर्वक आणलेला निधी पालिकेने चांदूरबाजार शहरात खर्च केला खरा; परंतु कामांचा दर्जा निकृष्ट आहे. लोकांमध्ये त्यामुळे असंतोष आहे. पालिकेवर आर्थिक अनियमिततेचे आरोप वारंवार होतात. भगिणी प्रेमापोटी अनुनभवी बहिणीच्या हाती सोपविलेल्या सत्तेचे दुष्परिणाम आता बच्चू कडू यांना टाळता येणार नाहीत. शिरजगाव बंड येथील सरपंच सविता बर्वे यांच्याबाबतही नेमके हेच घडले आहे. सत्तेचा त्या दुरुपयोग केल्याची ओरड आहे.नगराध्यक्षपदाचा कार्यकाळ सहा महिन्यांनी वाढला आहे. बच्चू कडू यांनी त्यांच्या बहिणीऐवजी पक्षातील कार्यक्षम आणि लोकप्रिय महिलेच्या हाती सूत्रे सोपविल्यास सकारात्मक संकेत नागरिकांमध्ये जाईल. शिरजगावातही हा प्रयोग त्यांना करता येईल. बच्चू कडू आता बदलले, अशी जी चर्चा वारंवार होते, त्यामागे नात्यातील, मर्जीतील लोकांना सत्ताकेंद्रे सोपविणे हेदेखील महत्त्वाचे कारण आहेच.

Web Title: The demand from BJP Got to get 'Achalpur'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.