‘मोदी लहर’मुळेच पराभव
By Admin | Updated: May 19, 2014 23:06 IST2014-05-19T23:06:46+5:302014-05-19T23:06:46+5:30
जिल्हय़ातील काही पदाधिकारी विरोधात असले तरी सर्वसामान्य नागरिक आपल्या समवेत आहेत. त्यामुळेच अमरावती लोकसभेत आजवरची सर्वाधिक मते आपल्याला मिळाली. ‘

‘मोदी लहर’मुळेच पराभव
पत्रपरिषद : नवनीत राणा यांनी दिल्या अडसुळांना शुभेच्छा! अमरावती : जिल्हय़ातील काही पदाधिकारी विरोधात असले तरी सर्वसामान्य नागरिक आपल्या समवेत आहेत. त्यामुळेच अमरावती लोकसभेत आजवरची सर्वाधिक मते आपल्याला मिळाली. मेळघाटात लाट रोखली लोकसभेच्या तुलनेत विधानसभेची निवडणूक वेगळी असते. विधानसभा निवडणुकीत जिल्हय़ातून राकाँचे ३ ते ४ आमदार निवडून येतील, असा विश्वासही नवनीत यांनी यावेळी व्यक्त केला. यापुढे प्रत्येक तालुक्यात व गावागावात जाऊन पक्ष संघटना मजबूत करण्यावर आपण भर देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ज्यांनी विरोधात काम केले त्यांना देखील चार महिन्यात विधानसभेला सामोरे जायचे आहे. विधानसभेत पत्रपरिषदेला आ. रवी राणा, नवनीत राणा, शरद तसरे, प्रदीप राऊत, विजय राऊत, अलका काळे, मेघा हरणे, गणेश खारकर, नंदकिशोर वर्हाडे, अनिल काळे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)