‘मोदी लहर’मुळेच पराभव

By Admin | Updated: May 19, 2014 23:06 IST2014-05-19T23:06:46+5:302014-05-19T23:06:46+5:30

जिल्हय़ातील काही पदाधिकारी विरोधात असले तरी सर्वसामान्य नागरिक आपल्या समवेत आहेत. त्यामुळेच अमरावती लोकसभेत आजवरची सर्वाधिक मते आपल्याला मिळाली. ‘

Defeat because of Modi wave | ‘मोदी लहर’मुळेच पराभव

‘मोदी लहर’मुळेच पराभव

पत्रपरिषद : नवनीत राणा यांनी दिल्या अडसुळांना शुभेच्छा!

अमरावती : जिल्हय़ातील काही पदाधिकारी विरोधात असले तरी सर्वसामान्य नागरिक आपल्या समवेत आहेत. त्यामुळेच अमरावती लोकसभेत आजवरची सर्वाधिक मते आपल्याला मिळाली.

मेळघाटात लाट रोखली

लोकसभेच्या तुलनेत विधानसभेची निवडणूक वेगळी असते. विधानसभा निवडणुकीत जिल्हय़ातून राकाँचे ३ ते ४ आमदार निवडून येतील, असा विश्‍वासही नवनीत यांनी यावेळी व्यक्त केला.

यापुढे प्रत्येक तालुक्यात व गावागावात जाऊन पक्ष संघटना मजबूत करण्यावर आपण भर देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ज्यांनी विरोधात काम केले त्यांना देखील चार महिन्यात विधानसभेला सामोरे जायचे आहे. विधानसभेत

पत्रपरिषदेला आ. रवी राणा, नवनीत राणा, शरद तसरे, प्रदीप राऊत, विजय राऊत, अलका काळे, मेघा हरणे, गणेश खारकर, नंदकिशोर वर्‍हाडे, अनिल काळे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

मोदी लहरचा परिणाम झाला अन्यथा जिल्हय़ाचे चित्र आज वेगळे दिसले असते, असे मत अमरावती लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार नवनीत राणा यांनी व्यक्त केले. निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदाच त्यांनी पत्रकार परिषदेतून पराभवाची कारणमीमांसा केली. पुढे बोलताना नवनीत राणा यांनी अमरावती लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार आनंदराव अडसूळ यांना शुभेच्छा दिल्या. अडसुळांना केंद्रीय मंत्रीपद मिळावे व त्यांनी जिल्हय़ाचा विकास करावा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ईलेक्टीव्ह मेरिटवर आपल्याला उमेदवारी दिली. पराभूत झाले असले तरी पक्षाचे काम करणार.मोदी फॅक्टरअसणार नाही, असे सूचक व्यक्तव्य यावेळी नवनीत राणांनी केले. मेळघाटात मोदी लाट आपण पोहोचू दिली नाही, असेही त्या म्हणाल्या. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण कार्यक्षम मुख्यमंत्री आहेत. निवडणूक काळात व निवडणुकीनंतरही त्यांनी आस्थेने फोन करुन धीर दिला, असे त्यांनी आवर्जून सांगितले.

Web Title: Defeat because of Modi wave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.