शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
3
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
4
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
5
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
6
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
7
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
8
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
9
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
10
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
11
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
12
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
13
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
14
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
15
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
16
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
17
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
18
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
19
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
20
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली

महापालिका कर्मचाऱ्यांची डीसीपीएस कपात बेकायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 2:34 PM

अंशदायी पेन्शन योजना (डीसीपीएस) महापालिकेला आता लागू नसल्याची स्पष्ट कबुली वित्त विभागाने दिल्याने आजपावेतो केलेली कोट्यवधींची कपात बेकायदा ठरली आहे.

ठळक मुद्देमाहिती अधिकारातून उघडजुन्या पेन्शन योजनेसाठी आग्रह

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : १ नोव्हेंबर २००५ नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांना १९८२ ची निवृत्ती वेतन योजना बंद करून शासनाने अंशदायी पेन्शन योजना (डीसीपीएस) सुरू केली. त्यानुसार, महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वेतनातून १२ वर्षांपासून मासिक १० टक्के कपात करण्यात येत आहे. तथापि, ही योजनाच महापालिकेला आता लागू नसल्याची स्पष्ट कबुली वित्त विभागाने दिल्याने आजपावेतो केलेली कोट्यवधींची कपात बेकायदा ठरली आहे. माहिती अधिकार कायद्यातून ही धक्कादायक बाब उजेडात आली आहे.डीसीपीएसचे सदस्य असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनातून दरमहा १० टक्के रक्कम अंशदान म्हणून कपात करण्यात येत आहे. तेवढीच रक्कम अर्थात १० टक्के रक्कम शासनाच्या समतुल्य हिस्सा म्हणून एकूण २० टक्के रक्कम डीसीपीएसधारकांच्या खात्यात जमात होणे अनिवार्य आहे. ही योजना अमरावतीसह अनेक महापालिकांमध्ये राबविण्यात आली. सन २०१२ मध्ये डीसीपीएस कर्मचाऱ्यांना खाते क्रमांक वितरित करण्यात आले. योजना लागू झाल्यानंतर तब्बल सात वर्षांनंतर खाते मिळाले. कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात करण्यात केलेले अंशदान, त्यावरील व्याज, शासनाचा समतुल्य वाटा व त्यावरील व्याजाच्या जमा झालेल्या एकूण रकमेचा हिशेब कर्मचा-यांना देणेही बंधनकारक आहे. मात्र, अनेक वर्षांपासून वेतनातून नियमित कपात होत असली तरी आतापर्यंत किती रक्कम कपात झाली. शासनाच्या वाट्याची रक्कम किती व त्यावरील व्याजाबाबत हजारो डीसीपीएसधारक अनभिज्ञ आहेत. त्यापार्श्वभूमिवर वित्त विभागाचे अवर सचिव व जन माहिती अधिकारी स्वप्निल गावकर यांनी माहिती अधिकार अर्जाला दिलेले उत्तर या कर्मचाऱ्यांसाठी वाळवंटात पाणी ठरले आहे. डीसीपीएस महापालिकेला लागू नसल्याचा निर्णय आल्याने डीसीपीएसधारकांनी जुन्या पेन्शनसाठी पुन्हा नव्याने लढा उभारण्याचा संकल्प केला आहे.यांनी केली विचारणाडीसीपीएससंदर्भातील ३१ आॅक्टोबर २००५ चा शासननिर्णय कुणाला लागू आहे, अशी माहिती सातारा जिल्ह्यातील शहाजी सखाराम गोरवे यांनी मंत्रालयातील वित्त विभागास मागितली. ५ सप्टेंबरच्या माहिती अर्जावर वित्त विभागाने १४ सप्टेंबर रोजी गोरवे यांना उलटटपाली उत्तर दिले.काय म्हणतो वित्त विभाग?३१ आॅक्टोबर २००५ चा शासननिर्णय कोणाला लागू आहे, याचा स्पष्ट उल्लेख त्यात करण्यात आला आहे. सदर निर्णयानुसार, परिभाषित अंशदान पेन्शन योजना महापालिका व न्यायालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना लागू होत नाही, असे वित्त विभागाने स्पष्ट केले आहे.महापालिका, नगरपालिकांनी शासनादेश नसताना डीसीपीएस लागू केले. बेकायदा कपातही केली. ती सर्व रक्कम शासनाने कर्मचाऱ्यांना सव्याज परत करावी. शासनाने महापालिका, नगरपालिका कर्मचाऱ्यांची फसवणूक केली आहे. ३१ आॅक्टोबरला शासनास जाब विचारू.- वितेश खांडेकर, राज्याध्यक्ष, जुनी पेन्शन हक्क संघटन

टॅग्स :Amravatiअमरावती