शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडकी बहीण’मुळे निधी उशिरा, कामे होणार कशी? गुलाबी रंगात निवडून आलेल्या अजित पवार गटाच्या मंत्र्यांचाच तक्रारीचा सूर
2
‘एमपीएससी’ची तयारी करणाऱ्या एकुलत्या एक मुलाचा अपघाती मृत्यू; पुण्याच्या दिशेने जात होता...
3
६ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या स्नेहाचा मृतदेह सापडला; आई-वडिलांचा टाहो, मैत्रिणीचा मोठा दावा
4
गृहप्रवेशानंतर नववधू चक्कर येऊन पडली, पतीने थेट प्रेग्नन्सी टेस्ट किटच आणली! चिडलेल्या नवरीने काय केलं वाचाच... 
5
Pravin Gaikwad : 'माझ्या हत्येचा कट होता, याला पूर्णपणे सरकार जबाबदार'; प्रवीण गायकवाडांचा आरोप
6
स्मशानभूमीचे उद्घाटन न झाल्याने अंत्यविधीस परवानगी नाकारली; भरपावसात डिझेल ओतून पेटवली चिता
7
Anthem Biosciences IPO आजपासून गुंतवणुकीसाठी खुला; कधीपर्यंत आणि किती करावी लागेल गुंतवणूक, GMP किती?
8
मनसेचे २ दिवसीय शिबिर, ठाकरे बंधू युतीवर भूमिका ठरणार; राज ठाकरे काय देणार 'कानमंत्र'?
9
'ते गप्पा चांगल्या मारतात, पण रात्रीच्या अंधारात लोकांवर बॉम्ब टाकतात', ट्रम्प पुतीन यांच्यावर भडकले
10
अरे देवा! आई वारंवार भेंडीची भाजी बनवायची म्हणून लेक चिडला, १२०० किमी दूर पळून गेला अन्...
11
नोकरीसाठी डिग्री आणि सीव्हीची गरज नाही! थेट १ कोटी रुपयांचं पॅकेज, फक्त 'या' २ अटी पूर्ण करा
12
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
13
रशियाकडून क्रुड ऑईलची विक्रमी आयात; पेट्रोलियम मंत्री म्हणाले, "भारताचं ऊर्जा धोरण कोणत्याही दबावाखाली..."
14
"कलाकाराला ऐकून घ्यावंच लागतं, पण..." शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेचं पुन्हा प्रत्युत्तर
15
ठाणे स्टेशनजवळ भीषण आग! स्कायवॉकजवळच्या आगीमुळे प्रवाशांमध्ये उडाला गोंधळ
16
साप्ताहिक राशीभविष्य: २ राजयोगांचा ९ राशींना दुपटीने लाभ, सुबत्ता-भरभराट; गुंतवणुकीत नफा!
17
गुडबाय ISS! पृथ्वीवर परतण्यापूर्वी शुभांशू शुक्ला यांचे फोटो आले समोर, आजपासून परतीचा प्रवास सुरू होणार
18
मुख्याध्यापक वर्गातच झिंगून वर्गातच झोपले; खिशात देशी दारूची आणखी एक बाटली भरलेली... 
19
आयुष्याचा शेवट ठरला Live स्टंट...फिल्म शुटींगवेळी स्टंटमॅनचा जागीच मृत्यू; धक्कादायक व्हिडिओ समोर
20
पतीला घटस्फोट देणाऱ्या सायना नेहवालकडे किती संपत्ती आहे? आकडा ऐकून थक्क व्हाल!

अभ्यासक्रमात बदल अन् कर्तव्यपूर्तीला प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2022 05:01 IST

जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित ‘प्रेस द मीट’मध्ये ते बोलत होते. कुुलगुरु डॉ. मालखेडे यांनी अभ्यासक्रमात बदल करताना महाविद्यालये आणि विद्यापीठाने त्यांची कर्तव्यपूर्ती करावी आणि विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. ज्या विद्यापीठातून पदवी घेतली, त्याच विद्यापीठाचे कुलगुरु म्हणून जबाबदारी हाताळताना आनंदी आहे. पण, भूमिपुत्र म्हणून या विद्यापीठाचे ऋणदेखील फेडायचे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आता अमुक अभ्यासक्रम घेऊन शिक्षण घेणे बंधनकारक नाही. कला, वाणिज्य, विज्ञान अथवा  अभियांत्रिकी अशा कोणत्याही शाखांमधील अभ्यासक्रमाचे विषय विद्यार्थ्यांना निवडता येतील. नवीन शैक्षणिक धोरणानुसार ही बाब शक्य असून, येत्या शैक्षणिक वर्षात म्हणजेच जुलै २०२२ पासून ही संधी विद्यार्थ्यांना मिळेल, अशी माहिती संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दिलीप मालखेडे यांनी मंगळवारी येथे दिली. जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित ‘प्रेस द मीट’मध्ये ते बोलत होते. कुुलगुरु डॉ. मालखेडे यांनी अभ्यासक्रमात बदल करताना महाविद्यालये आणि विद्यापीठाने त्यांची कर्तव्यपूर्ती करावी आणि विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. ज्या विद्यापीठातून पदवी घेतली, त्याच विद्यापीठाचे कुलगुरु म्हणून जबाबदारी हाताळताना आनंदी आहे. पण, भूमिपुत्र म्हणून या विद्यापीठाचे ऋणदेखील फेडायचे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. मात्र, विद्यार्थी आणि शिक्षकांमधील संवाद आनंददायी असावा, यासाठी महाविद्यालयांना कर्तव्य पार पाडावे लागेल. दरवर्षी लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी प्रवेश घेतात. मात्र, पदवी घेणाऱ्यांची संख्या ५० टक्केच आहे, ही बाब गंभीर असल्याबाबत त्यांनी लक्ष वेधले. आंतरराष्ट्रीय स्तरानुसार गुणांकन प्रणाली लागू होत असून, क्रेडिट सिस्टीम, ग्रेड मार्क प्रणालीची अंमलबजावणी होणार आहे. तसेच कोणत्याही कारणास्तव अर्धवट शिक्षण सोडून गेलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाईल. मायनर डिग्री, संशोधन कार्य वाढविण्यासाठी अनुदानात वाढ केली जाणार असल्याचे कुलगुरुंनी स्पष्ट केले. यावेळी जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल उपस्थित होते.

चांगला माणूस घडविण्याचा प्रयत्नसंत गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचार अभ्यासक्रमात आणले जातील. त्यानुसार तयारी केली आहे. व्हॅल्यू एज्युकेशनद्धारे चांगला माणूस घडविण्यासाठी विद्यापीठाचे प्रयत्न असेल. अमानवी कृत्ये होणार नाही. विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम निर्माण करण्यासाठी अभ्यासक्रम राहणार असल्याची ग्वाही कुलगुरु डॉ. मालखेडे यांनी दिली. 

पदव्युत्तर प्रवेशासाठी केंद्रीय प्रणालीअमरावती विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना पदव्युत्तर प्रवेशासाठी यापुढे केंद्रीय प्रवेश प्रणाली असणार आहे. त्याकरिता ऑनलाइन अर्ज करावा लागेल. प्रवेशासाठी तीन फेरी होतील. यातून पारदर्शकता आणि महाविद्यालयाची माहिती स्पष्ट होईल, असे कुलगुरु डॉ. मालखेडे म्हणाले.

 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र