शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

अमरावतीतील संचारबंदी २१ नोव्हेंबरपर्यंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2021 12:08 IST

शहराची परिस्थिती पाहून तो निर्णय स्थानिक स्तरावर घेण्यात येईल, अशी माहिती राज्याचे अपर पोलीस महासंचालक राजेंदर सिंग यांनी दिली आहे. मात्र, तोपर्यंत संचारबंदीत रोज २ ते ३ तास अशी शिथिलता देण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले.

अमरावती : अमरावतीत शनिवार, दि. १३ नोव्हेंबरपासून लागू करण्यात आलेली संचारबंदी उठविण्याबाबत सोमवार, दि. २२ नोव्हेंबर रोजी निर्णय घेतला जाणार आहे.

शहराची परिस्थिती पाहून तो निर्णय स्थानिक स्तरावर घेण्यात येईल, अशी माहिती राज्याचे अपर पोलीस महासंचालक राजेंदर सिंग यांनी दिली आहे. मात्र, तोपर्यंत संचारबंदीत रोज २ ते ३ तास अशी शिथिलता देण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे सध्यातरी २१ नाेव्हेंबरपर्यंत संचारबंदी असल्याचे स्पष्ट झाले.

१२ नोव्हेंबर रोजी निघालेल्या मोर्चादरम्यान करण्यात आलेली नासधूस, तोडफोडीचा निषेध म्हणून १३ रोजी भाजपकडून बंद पुकारण्यात आला. त्यादरम्यान शहरातील विविध ठिकाणी तोडफोड व लूटपाट करण्यात आली. परिणामी प्रभारी पोलीस आयुक्तांकडून संचारबंदी लागू करण्यात आली. त्याअनुषंगाने अपर पोलीस महासंचालक राजेंदर सिंग यांनी शनिवारपासून शहरात मुक्काम ठोकला आहे.

दोन्ही दिवसांतील घटनांच्या अनुषंगाने मंगळवारी त्यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली. तर, इंटरनेट बंदीचा बुधवारी सायंकाळी आढावा घेतला जाणार आहे. गुरुवारपासून इंटरनेट बंदीचा आदेश मागे घेण्यात येण्याची शक्यता आहे.

किरीट सोमय्या यांच्या दौऱ्यास मनाई

भाजप नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या १७ तारखेच्या अमरावती दौऱ्यास पोलीस आयुक्त आरती सिंग यांनी परवानगी नाकारली आहे. शांतता व सुव्यस्थेसाठी शहरात संचारबंदीचे आदेश जारी करण्यात आलेले आहे. त्यामुळे बुधवारचा दौरा स्थगित करण्याचे पत्र पोलीस आयुक्तांनी सोमवारी किरीट सोमय्या यांनी दिले आहे.

अमरावतीमध्ये ज्या पद्धतीने दहशत माजविण्याचा प्रयत्न झाला, याला ठाकरे सरकारची मूक संमती होती, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला, मला अमरावतीकरांची व्यथा व स्थिती समजवून घ्यायची आहे. मात्र, पोलीस आयुक्तांनी दौऱ्यावर प्रतिबंध असल्याचे असल्याचे पत्र दिल्याचे सोमय्या यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीTripuraत्रिपुराPoliceपोलिस