शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
2
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
3
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
4
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: ईश्वरपूरमध्ये जयंत पाटलांचा महायुतीला मोठा धक्का; एका क्लिकवर वाचा निकाल
5
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
6
Jawhar Nagar Parishad Election Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
7
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
8
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
9
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
10
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
11
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
12
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
13
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
14
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
15
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
16
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
17
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
18
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
19
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
20
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
Daily Top 2Weekly Top 5

महाआघाडीच्या काळात देशभक्ती, देवभक्ती करणाऱ्यांवर देशद्रोहाचे गुन्हे

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: March 27, 2023 19:06 IST

Amravati News राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या काळात देशभक्ती व देवभक्ती करणाऱ्यांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोमवारी येथे केला.

गजानन मोहोडअमरावती : राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या काळात देशभक्ती व देवभक्ती करणाऱ्यांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोमवारी येथे केला. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांनी फारकत घेतली आहे. त्यावेळी औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांनी आधी शरयू नदीत डुबकी मारून प्रायश्चित करावे, मगच भाजपवर आरोप करावेत, असे ते म्हणाले.

महसूल विभागाच्या आढावा बैठकीसाठी ना. विखे पाटील आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत सातत्याने अपमान केल्या जात असताना उद्धव ठाकरे यांना महाआघाडी करून अडीच वर्षे सत्तेचा उपभोग घेताना सुचले नाही. त्याचवेळी त्यांनी सत्तेतून बाहेर पडायला पाहिजे होते. हे हिंदुत्वाचे बेगडी प्रेम असल्याचा आरोप त्यांनी केला.

भाजपने पाठीत खंजीर खुपसला असे ते म्हणतात हे चुकीचे आहे. याउलट सत्तेकरिता त्यांनी हिंदुत्व सोडले. आता सत्ता गेल्यानंतर त्यांना स्वातंत्र्यवीर सावरकर आदर्श वाटू लागले आहेत. महाविकास आघाडीत काँग्रेस हा घटक पक्ष आहे. त्याचवेळी त्यांनी आघाडीतून बाहेर पडायला पाहिजे होते किंवा काँग्रेसला आघाडीतून बाहेर काढायला पाहिजे होते. त्यांनी हिंदुत्वाचा फक्त सत्ता मिळविण्यासाठी उपयोग केला. आता त्यांनी तो अधिकार गमाविला असल्याचे ना. विखे पाटील म्हणाले.स्वातंत्र्यवीर सावरकर यांना पहिले भारतरत्न द्यावे, यासाठी आम्हाला अंबादास दानवेंच्या शिफारशीची गरज नाही. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून त्यांच्या नेत्यांनी फारकत घेतली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत जातात, त्याचे प्रायश्चित्त पहिले करा. नंतरच भाजपवर आरोप करा, असा सल्ला ना. विखे पाटील यांनी दिला.

‘भारत जोडो’दरम्यान ‘काँग्रेस छोडो’ सुरूसत्ता गेल्याचे काँग्रेसला वैफल्य आहे. २०१४ व २०१९ च्या निवडणुकीत ४० चा आकडाही पार करू शकले नाहीत. जनतेने नाकारले हे वास्तव का स्वीकारत नाही, त्यासाठी यात्रा काढून पाहिल्या. प्रतिसाद मिळत नसल्याने राहुल गांधी सावरकरांवर आरोप करीत आहेत. त्यांनी आत्मविश्वास गमाविला आहे. जनता त्यांच्या वक्तव्याची दखल घेत नाही. त्यांच्या भारत जोडो यात्रेदरम्यान इकडे काँग्रेस छोडो सुरू होते, यासाठी आत्मपरीक्षण करायला पाहिजे, असे विखे पाटील म्हणाले.

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील