शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

महाआघाडीच्या काळात देशभक्ती, देवभक्ती करणाऱ्यांवर देशद्रोहाचे गुन्हे

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: March 27, 2023 19:06 IST

Amravati News राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या काळात देशभक्ती व देवभक्ती करणाऱ्यांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोमवारी येथे केला.

गजानन मोहोडअमरावती : राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या काळात देशभक्ती व देवभक्ती करणाऱ्यांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोमवारी येथे केला. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांनी फारकत घेतली आहे. त्यावेळी औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांनी आधी शरयू नदीत डुबकी मारून प्रायश्चित करावे, मगच भाजपवर आरोप करावेत, असे ते म्हणाले.

महसूल विभागाच्या आढावा बैठकीसाठी ना. विखे पाटील आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत सातत्याने अपमान केल्या जात असताना उद्धव ठाकरे यांना महाआघाडी करून अडीच वर्षे सत्तेचा उपभोग घेताना सुचले नाही. त्याचवेळी त्यांनी सत्तेतून बाहेर पडायला पाहिजे होते. हे हिंदुत्वाचे बेगडी प्रेम असल्याचा आरोप त्यांनी केला.

भाजपने पाठीत खंजीर खुपसला असे ते म्हणतात हे चुकीचे आहे. याउलट सत्तेकरिता त्यांनी हिंदुत्व सोडले. आता सत्ता गेल्यानंतर त्यांना स्वातंत्र्यवीर सावरकर आदर्श वाटू लागले आहेत. महाविकास आघाडीत काँग्रेस हा घटक पक्ष आहे. त्याचवेळी त्यांनी आघाडीतून बाहेर पडायला पाहिजे होते किंवा काँग्रेसला आघाडीतून बाहेर काढायला पाहिजे होते. त्यांनी हिंदुत्वाचा फक्त सत्ता मिळविण्यासाठी उपयोग केला. आता त्यांनी तो अधिकार गमाविला असल्याचे ना. विखे पाटील म्हणाले.स्वातंत्र्यवीर सावरकर यांना पहिले भारतरत्न द्यावे, यासाठी आम्हाला अंबादास दानवेंच्या शिफारशीची गरज नाही. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून त्यांच्या नेत्यांनी फारकत घेतली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत जातात, त्याचे प्रायश्चित्त पहिले करा. नंतरच भाजपवर आरोप करा, असा सल्ला ना. विखे पाटील यांनी दिला.

‘भारत जोडो’दरम्यान ‘काँग्रेस छोडो’ सुरूसत्ता गेल्याचे काँग्रेसला वैफल्य आहे. २०१४ व २०१९ च्या निवडणुकीत ४० चा आकडाही पार करू शकले नाहीत. जनतेने नाकारले हे वास्तव का स्वीकारत नाही, त्यासाठी यात्रा काढून पाहिल्या. प्रतिसाद मिळत नसल्याने राहुल गांधी सावरकरांवर आरोप करीत आहेत. त्यांनी आत्मविश्वास गमाविला आहे. जनता त्यांच्या वक्तव्याची दखल घेत नाही. त्यांच्या भारत जोडो यात्रेदरम्यान इकडे काँग्रेस छोडो सुरू होते, यासाठी आत्मपरीक्षण करायला पाहिजे, असे विखे पाटील म्हणाले.

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील