शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
5
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
6
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
7
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
8
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
9
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
10
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
11
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
12
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
13
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
14
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
15
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
16
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
17
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
18
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
19
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
20
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?

महाआघाडीच्या काळात देशभक्ती, देवभक्ती करणाऱ्यांवर देशद्रोहाचे गुन्हे

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: March 27, 2023 19:06 IST

Amravati News राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या काळात देशभक्ती व देवभक्ती करणाऱ्यांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोमवारी येथे केला.

गजानन मोहोडअमरावती : राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या काळात देशभक्ती व देवभक्ती करणाऱ्यांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोमवारी येथे केला. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांनी फारकत घेतली आहे. त्यावेळी औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांनी आधी शरयू नदीत डुबकी मारून प्रायश्चित करावे, मगच भाजपवर आरोप करावेत, असे ते म्हणाले.

महसूल विभागाच्या आढावा बैठकीसाठी ना. विखे पाटील आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत सातत्याने अपमान केल्या जात असताना उद्धव ठाकरे यांना महाआघाडी करून अडीच वर्षे सत्तेचा उपभोग घेताना सुचले नाही. त्याचवेळी त्यांनी सत्तेतून बाहेर पडायला पाहिजे होते. हे हिंदुत्वाचे बेगडी प्रेम असल्याचा आरोप त्यांनी केला.

भाजपने पाठीत खंजीर खुपसला असे ते म्हणतात हे चुकीचे आहे. याउलट सत्तेकरिता त्यांनी हिंदुत्व सोडले. आता सत्ता गेल्यानंतर त्यांना स्वातंत्र्यवीर सावरकर आदर्श वाटू लागले आहेत. महाविकास आघाडीत काँग्रेस हा घटक पक्ष आहे. त्याचवेळी त्यांनी आघाडीतून बाहेर पडायला पाहिजे होते किंवा काँग्रेसला आघाडीतून बाहेर काढायला पाहिजे होते. त्यांनी हिंदुत्वाचा फक्त सत्ता मिळविण्यासाठी उपयोग केला. आता त्यांनी तो अधिकार गमाविला असल्याचे ना. विखे पाटील म्हणाले.स्वातंत्र्यवीर सावरकर यांना पहिले भारतरत्न द्यावे, यासाठी आम्हाला अंबादास दानवेंच्या शिफारशीची गरज नाही. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून त्यांच्या नेत्यांनी फारकत घेतली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत जातात, त्याचे प्रायश्चित्त पहिले करा. नंतरच भाजपवर आरोप करा, असा सल्ला ना. विखे पाटील यांनी दिला.

‘भारत जोडो’दरम्यान ‘काँग्रेस छोडो’ सुरूसत्ता गेल्याचे काँग्रेसला वैफल्य आहे. २०१४ व २०१९ च्या निवडणुकीत ४० चा आकडाही पार करू शकले नाहीत. जनतेने नाकारले हे वास्तव का स्वीकारत नाही, त्यासाठी यात्रा काढून पाहिल्या. प्रतिसाद मिळत नसल्याने राहुल गांधी सावरकरांवर आरोप करीत आहेत. त्यांनी आत्मविश्वास गमाविला आहे. जनता त्यांच्या वक्तव्याची दखल घेत नाही. त्यांच्या भारत जोडो यात्रेदरम्यान इकडे काँग्रेस छोडो सुरू होते, यासाठी आत्मपरीक्षण करायला पाहिजे, असे विखे पाटील म्हणाले.

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील