शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
2
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
3
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
4
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
5
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
6
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
7
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
8
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
9
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
10
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
11
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
12
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
13
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
14
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
15
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
16
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
17
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
18
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
19
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
20
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  

क्राईमचा आलेख १९३ ने घटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 05:01 IST

यंदा जानेवारी ते नोव्हेंबर या ११ महिन्यांत ३ हजार ३८ गुन्हे घडले आहेत. या आकडेवारीवरून २०१८ च्या तुलनेत यंदा १९३ गुन्हे कमी घडले आहेत. पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांनी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने केलेले नियोजनबद्ध कामकाज गुन्ह्यात कमी झाल्याची पावतीच आहे.

ठळक मुद्देसीपींच्या नियोजनबद्ध कामकाजाचे यश : कायदा व सुव्यस्थेला गालबोट नाही

वैभव बाबरेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दरवर्षी गुन्हेगारीचा वाढता आलेख यंदा कमी झाल्याचे दिसून येत आहे. नोव्हेंबर २०१८ अखेर शहरात ३ हजार २३१ गुन्हे घडले होते. मात्र, यंदा जानेवारी ते नोव्हेंबर या ११ महिन्यांत ३ हजार ३८ गुन्हे घडले आहेत. या आकडेवारीवरून २०१८ च्या तुलनेत यंदा १९३ गुन्हे कमी घडले आहेत. पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांनी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने केलेले नियोजनबद्ध कामकाज गुन्ह्यात कमी झाल्याची पावतीच आहे.सन २०१९ या वर्षात लोकसभा व विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी होती. सण-उत्सवासह इज्तेमा असा भव्य सोहळा पार पडला. मात्र, कुठेही कोणत्याही प्रकारची मोठी किंवा अप्रिय घडली नाही. याचे सर्व श्रेय पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांच्या नियोजनबद्ध व शिस्तबद्ध कामकाजाला जाते. पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांनी ४ आॅगस्ट २०१८ रोजी पदभार सांभाळला, तेव्हापासून आतापर्यंतच्या १६ महिन्यांत कायदा व सुव्यवस्थेला गालबोट लागले नाही. अमरावती शहरातील लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सीपींनी पूर्व नियोजन करून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या होत्या. कुख्यात नऊ गुन्हेगारांविरुद्ध एमपीडीएसारखा कठोर कारवाईचा बडगा उगारला. २२८ गुन्हेगारांना तडीपार केले. प्रतिबंधात्मक कारवाईचा सपाटा सुरूच ठेवला होता. त्यामुळे गुन्हेगारीला तोंड वर काढायला जागाच उरली नव्हती. निवडणूक, सण-उत्सव, आंदोलने, दरम्यानच जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० लागू, अयोध्या येथील मंदिराचा मुद्दा, नागरिकत्व विधेयकाचा निर्णय, या सर्व संवेदनशील मुद्यांवरून कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचण्याची दाट शक्यता होती. हजारो व लाखोंच्या संख्येने नागरिकांची गर्दी, गोंधळ होण्याची स्थिती सीपींनी नियोजनबद्ध बंदोबस्त लावून हाताळली. त्यातच पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द केल्या होत्या. त्यांच्या शिस्तप्रिय व नियोजनबद्ध धोरणामुळे अधिनस्थ यंत्रणेचेही त्यांना मोलाचे सहकार्य लाभले. २०१९ सर्वाधिक आव्हाने पेलण्याचे वर्ष पोलिसांसाठी ठरले आहे. तरीसुद्धा पोलीस विभागाने अमरावतीकरांना सुरक्षित वातावरणात ठेवले. घडले ते केवळ वैयक्तिक स्वरुपाचे गुन्हे. सार्वजनिक ठिकाणी कुठल्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचू न देण्यात पोलीस विभागाने मोलाची कामगिरी बजावली.सन २०१८ च्या तुलनेत यंदा गुन्हेगारीचा आलेख घटला आहे. निवडणुका, देशपातळीवर मोठे निर्णय, भव्य कार्यक्रम, सण-उत्सव पार पडले. मात्र, कुठेही कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहचली नाही. यात अमरावती पोलिसांनी महत्त्वाची भूमिका बजावली. हे त्यांचे श्रेय आहे.- संजयकुमार बाविस्कर, पोलीस आयुक्त, अमरावतीगुन्ह्यांचा लेखाजोखाशहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील दहा पोलीस ठाण्यांत या वर्षात २५ हत्येच्या घटना घडल्यात. ५८ खुनाचे प्रयत्न झाले. सदोष मनुष्यवधाचे ३ गुन्हे, ७६ बलात्कार, ५ दरोडे, १ दरोड्याचा प्रयत्न, ५८ जबरी चोरी, ६ चेनस्नॅचिंग, १५९ घरफोड्या, ७९६ चोºया, ४६ मोबाईल चोरीचे गुन्हे, ३७ दंग्याचे गुन्हे, १९ विश्वासघाताचे गुन्हे, ११० अपहरणाचे, ५९४ दुखापतीचे, ३४ सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ल्याच्या घटना, २७३ विनयभंग, १२ आत्महत्येच्या प्रयत्नाचे गुन्हे, विवाहिता छळाचे ९४ गुन्हे, जनावरे चोरीचे २१ गुन्हे, ३३७ दुचाकी चोरीचे गुन्हे घडले आहेत.

टॅग्स :Policeपोलिस