शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

राज्यात १०० अटल आनंदवनांची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 9:16 PM

राज्यातील नगर परिषद, महापालिकांच्या ओपन स्पेसवर जपानमधील मियाबाकी जंगलाच्या धर्तीवर १०० अटल आनंदवनांची निर्मिती केली जाणार आहे.

ठळक मुद्देजपानमधील मियाबाकी धर्तीवर संकल्पना

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्यातील नगर परिषद, महापालिकांच्या ओपन स्पेसवर जपानमधील मियाबाकी जंगलाच्या धर्तीवर १०० अटल आनंदवनांची निर्मिती केली जाणार आहे. नागरिकांसाठी ती ऑक्सिजन पार्क असतील, तर पशूपक्ष्यांसाठी खऱ्या अर्थाने आनंदवन राहणार असल्याची माहिती राज्याचे वन, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी पत्रपरिषदेत दिली.योजनेसाठी काही नगरपालिका पुढे आल्या आहेत. यामध्ये एक हेक्टर जागेत १२ हजार ५०० वृक्ष लागवड केली जाते. मंत्रिमंडळाची याला मान्यता देण्यात आलेली आहे. या वनासाठी मियाबाकी टेक्नॉलॉजी महत्त्वाची आहे. बाबा आमटे यांच्या आनंदवनात ही संकल्पना सर्वप्रथम यशस्वी केली. आता राज्यात याचा विस्तार करण्यात येणार असल्याचे ना. मुनगंटीवार यांनी सांगितले. पर्यावरणाच्या रक्षणाची जबाबदारी समाजाने घ्यावी, यासाठी हरित सेना (ग्रीन आर्मी) ही संकल्पना आहे. यासाठी एक कोटींचे लक्ष्य आहे. सद्यस्थितीत ६० लाखांवर नोंदणी झालेली आहे. अमरावती विभागात १२ लक्ष उद्दिष्ट असताना, २७ मेपर्यंत ९,३८,५४६ नोंदणी झालेली आहे. यंदा १ ते ३१ जुलै या कालावधीत ३३ कोटी वृक्षलागवडीचे लक्ष्यांक आहे. मागील वर्षी १३ कोटी वृक्षलागवड करण्यात आली. यापैकी ८७.८५ टक्के वृक्ष जिवंत असल्याचे ना. मुनगंटीवार म्हणाले.वृक्षलागवडीवर मॉनिटरिंंग करण्यासाठी नागपूर येथे कमांड रूम स्थापित करण्यात आलीे. देशाच्या निधी आयोगाने याचे कौतुक केले आहे. देशातील वनक्षेत्र आणि वृक्षाच्छादनाबाबत फॉरेस्ट सर्र्व्हेे ऑफ इंडियाद्वारे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्र राज्य क्रमांक एक वर आहे. वनेतर क्षेत्रामध्ये वृक्षाच्छादन २७३ चौरस किमीने वाढले आहे. कांदळ वनक्षेत्रामध्ये ८२ चौरस किमीने वाढ झालेली आहे. कोणत्याही विभागाच्या नियत व्ययातून ०.५ टक्के निधी वृक्षसंवर्धनासाठी वापरण्यास मुभा दिलेली आहे. आमदारदेखील या मिशनसाठी निधी उपलब्ध करू शकतात. जिल्हा नियोजनमधील विशिष्ट निधी पालकमंत्र्यांच्या सल्ल्याने जिल्ह्याधिकारी देऊ शकतात, असे मुनगंटीवार म्हणाले. पत्रपरिषदेला पालकमंत्री प्रवीण पोटे, गृहराज्यमंत्री रणजित पाटील, आमदार सुनील देशमुख, आमदार रमेश बुंदिले, प्रधान सचिव विकास खारगे, प्रधान मुख्य संरक्षक अनुराग चौधरी, विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी शैलेश नवाल व वनविभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते.‘त्या’ वृक्षाच्या कलमा शहीद स्मारकात लावणारमहात्मा गांधी यांच्या जयंतीचे हे १५० वे वर्ष आहे. वर्धेच्या कर्मभूमीतील सेवाग्राममध्ये गांधीजी साबरमती आश्रमापेक्षा जास्त काळ राहिले. या आश्रमात १९३९ मध्ये एक वृक्ष त्यांनी स्वहस्ते लावला होता. त्या वृक्षाच्या कलमा तयार करण्यात आल्यात. या कलमा आता राज्यातील ३३ कोटी वृक्षलागवड अंतर्गत प्रत्येक शहीद स्मारकात लावणार असल्याचे ना. मुनगंटीवार यांनी सांगितले.अमरावती, अकोला विमानतळासाठी निधीअमरावती विमानतळाचे नाइटलॅन्डिंंग व रनवे यासाठी निधी उपलब्ध करणार आहोत. अमरावती येथे भारतीय प्रशासकीय सेवापूर्व प्रशिक्षणासाठी दोन वर्षांत १६ कोटींचा निधी उपलब्ध केला जाईल. महिलांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालयास पुरवणी व डिसेंबरमध्ये २५ कोटींचा निधी उपलब्ध केला जाईल, असे ना. मुनगंटीवार म्हणाले.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार