आंदोलन : राजकमल चौकात केला निषेधअमरावती : केंद्रातील मोदी सरकारने लोकसभा निवडणूक दरम्यान दिलेले आश्वासन पूर्ण न करता जनतेची निराशा केली आहे. अशातच भाजपाच्या नेतुत्वातील सरकारमध्ये अनेक घोटाळे उघडकिस येत असल्याने २० जुलै रोजी भष्टाचार विरोधी दिनाचे औचित्य साधून डाव्या पक्षाचे वतीने राजकमल चौकात निदर्शने करण्यात आली.केंद्रिय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी खोटी पदवी मिळविल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. मध्यप्रदेशात व्यापमं घोटाळयामुळे ४८ लोकांचे बळी गेले आहेत. छत्तीगढ मध्ये रमणसिंग यांच्या सरकारमध्ये करोडो रूपयांचा तांदुळ घोटाळा , महाराष्ट्रात पंकजा मुंडे यांचा २०६ कोटीचा चिक्की घोटाळा, विनोद तावडे यांच्या बोगस पदव्या त्यामुळे या सरकारच्या वतीने भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्यनिस्ट पक्ष, जिल्हा कौसिल व डावी आघाडी यांच्या वतीने भष्टाचार विरोधी दिनानिमित्त निदर्शने करण्यात आली. यावेळी तुकाराम भस्मे, पी.बी. उके, सुनील मेटकर, उमेश बनसोड, उद्यन शर्मा, रमेश सोनुले, प्रभाकर शिंदे, चंदा वानखडे, साफिया खान, मंगला भोगे, सरेश पळसकर, चित्रा बोरकर, प्रतिभा शिंदे आदी पदाधिकारी सहभागी झाले होते.
माकप, भाकपची मोदी सरकारविरोधात निदर्शने
By admin | Updated: July 21, 2015 00:25 IST