शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
3
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
4
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
5
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
6
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
7
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
8
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
9
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
10
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
11
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
12
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
13
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
14
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
15
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
16
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
17
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
18
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
19
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
20
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?

कोरोना विषाणूचा लग्नसराईला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 05:00 IST

मार्च, एप्रिल आणि मे या महिन्यात सर्वत्र लग्नसराईचा जल्लोष बघायला मिळतो. कोरोनामुळे देशात २१ दिवस लॉकडाऊन असल्यामुळे पूर्वनियोजित लग्न समारंभ आणि साखरपुड्याचे नियोजन विस्कटले आहे. अधिक लोकांना एकत्र जमा होण्यास मज्जाव असल्यामुळे व खरेदीसाठी बाजारपेठ खुली नसल्याने सध्या लग्नसराईला कोरोनामुळे ब्रेक लागला आहे.

ठळक मुद्देनियोजन कोलमडले : लॉकडाऊनमुळे खरेदी बारगळली

लोकमत न्यूज नेटवर्कब्राम्हणवाडा थडी: देशात कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सरकारने १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन केल्याने खरेदीपासून पत्रिका तयार करणे ती वाटप करण्याचे नियोजन कोलमडले. त्यामुळे अनेक ठिकाणी लग्नसोहळा पुढे ढकलण्यात येत आहेत. जेवणावळीसाठी आचारी मिळत नसल्याने वाढपी नसल्याने लग्न कशी उरकावयाची, असा प्रश्न वधप-वर मंडळींना पडला आहे.मार्च, एप्रिल आणि मे या महिन्यात सर्वत्र लग्नसराईचा जल्लोष बघायला मिळतो. कोरोनामुळे देशात २१ दिवस लॉकडाऊन असल्यामुळे पूर्वनियोजित लग्न समारंभ आणि साखरपुड्याचे नियोजन विस्कटले आहे. अधिक लोकांना एकत्र जमा होण्यास मज्जाव असल्यामुळे व खरेदीसाठी बाजारपेठ खुली नसल्याने सध्या लग्नसराईला कोरोनामुळे ब्रेक लागला आहे.लहान-लहान गावांतील वधु-वर एकत्र येत लग्नसराईची खरेदी करतात. शहरासह, तालुकास्तरावर अनेक ठिकाणाहून होलसेल साड्यांचा बसता वर- वधुचे कपडे, दागिने, भांडी आदींची एकदम खरेदी करीत असतात. मात्र, शहरासह ग्रामीण भागातही लॉकडाऊन असल्याने तसेच वाहने बंद असल्याने ही खरेदी रखडली आहे. लग्न म्हणजे भरपूर खरेदी नातेवाईकांत जल्लोषाचे वातावरण असते. पण कोरोनाचे संकट सर्व देशभरात पाय पसरू लागले आहे. त्यांमुळे सर्वत्र लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. जीवनाश्यक सोडून इतर सर्व वस्तूंची दुकाने आणि सार्वजनिक ठिकाणे बंद ठेवण्याचे आदेश धडकले आहे. ४ पेक्षा अधिक लोकांना एकत्रित जमा येण्यास मज्जाव केल्यामुळे पूर्वनियोजित लग्न समारंभ व साखरपुड्याचे वेळापत्रक विस्कटले आहे. काहींनी हे समारंभ पुढे ढकलले, तर काहीजण मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्नसमारंभ उरकू न घेत आहेत. बरेचदा इतर वेळी भरपूर खरेदी आणि नातेवाईकांच्या उपस्थित होणारे हे समारंभ सध्या थंडबस्त्यात आहेत.मुहूर्त बदलूनही ऐनवेळी टळलेसध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन व प्रशासनाने लॉकडाऊनसह संचारबंदी लागू केली आहे. परिणामी ज्या कु टुंबाकडे विवाह व साखरपुडा समारंभाचे आयोजन केले होते. अशा काही मंडळीने सुरूवातीला मार्च व त्यानंतर एप्रिल महिन्यातील विवाह व साखरपुड्याचे मुहूर्त काढले. परंतु, कोरोनामुळे एक नव्हे तर दोनदोन वेळा मुहूर्त रद्द करावा लागला. यशिवाय बाजारपेठ बंद असल्याने विवाह समारंभाची खरेदीही बारगळल्याचे वर-वधू पित्यांकडून सांगण्यात येत आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसmarriageलग्न