शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
2
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
3
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
4
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
5
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाल 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
6
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला
7
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
8
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
9
अन्न पुन्हा गरम करणं आरोग्यासाठी ठरतंय घातक; 'या' ५ गोष्टी टाळाल तरच ठणठणीत राहाल
10
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
11
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश
12
"मॅडम येत आहेत, त्यांना..."; पोलीस असल्याचं सांगून दुकानात घुसले अन् २ लाखांचे दागिने चोरले
13
ISI कडून मिळाले आदेश, बेताब खोऱ्यात लपवली शस्त्रे; NIA च्या अहवालात धक्कादायक खुलासा
14
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
15
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
16
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
17
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
18
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
19
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
20
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!

कोरोना विषाणूने नातेसंबंधही तोडले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:21 IST

माणुसकी विसरलेली माणसे वरुड : गेल्या दोन महिन्यांच्या काळात कोविडच्या दुसऱ्या लाटेचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला असून ...

माणुसकी विसरलेली माणसे

वरुड : गेल्या दोन महिन्यांच्या काळात कोविडच्या दुसऱ्या लाटेचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला असून कोरोना कोविड १९ मुळे देशातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोरोनाच्या धास्तीमुळे माणुसकीचे आणि रक्ताचे नातेही दुरावले आहे. भाऊ भावाला, बहीण भावाला आणि मुलगा बापाला आणि वडील काकाला, मित्र मित्राला विसरला असून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या घाराजवळून सुद्धा कोणी फिरकत नाही. कोरोनाने गरीब- श्रीमंत भेदसुद्धा तोडला असून सर्व एका शृंखलेत गुंफले आहे. माणुसकी विसरून स्वार्थ बघायला लागला तर स्वतःचा जीव वाचविण्याच्या प्रयत्नात आहे. दरवाजबंद प्रणाली सुरू झाल्याने कुठे गेले माणुसकीचे बंधन, असा सवाल सुज्ञ नागरिक विचारित आहेत. राजा आणि रंक एकाच माळेचे मणी झाले आहेत. सर्वसामान्य जनता भाकरीच्या शोधात वणवण भटकंती करीत असून स्वत:ला उच्चंभ्रू समजणारे भावाला भाऊ , बहीण , काका, बाप , आई हे सर्व नाते विसरून दरवाजाबंद झाले, तर देशात राज्यकर्त्यांनी नागरिकांच्या मनात तुफान भीतीचे वातावरण निर्माण केल्याने बाप मेला तरी मुलगा आला नाही, तर जन्म देणारी आई गेली तरी मुलांनी व्हॉट्सॲपवर व्हिडीओ चॅटिंग करून अंत्यदर्शन घेतले. अनेकांच्या शुभमंगलाचा आस्वाद नात्यागोत्यातील लोकांनी मोबाइलवरच घेऊन अक्षता टाकल्या जात आहेत. ही भारतीय संस्कृती विज्ञान आणि कलियुगात पाहावयास मिळत आहे तर कोरोना संक्रमिताचा मृत्यू झाल्यावर सख्ख्या मुलांने सुद्धा अंत्यसंस्काराला पाठ देऊन सफाई कामगारांकडून तर कुठे शेजारच्या परधर्मीयांकडून अंत्यसंस्कार करून घेतल्याची उदाहरणे घडत आहेत. तर आजारी रुग्णाला रुग्णालयात नेण्यासाठी सुद्धा आप्तस्वकीय पुढे येत नाहीत, अशी अवस्था झाली आहे. काय तर केवळ कोरोनापासून बचाव झाला पाहिजे म्हणून एवढा उपद्व्याप केला. कुठे गेले रक्ताचे नाते, कुठे गेला जिव्हाळा, हा प्रश्न अनेकांना सतावू लागला असून ज्यांनी जग दाखविले त्यांच्यासाठी मरण पत्करावे लागले तरी चालेल; पण मात्या-पित्याचे मुखदर्शन घेणाकरिता पुढे न धजावणारी पिढी येणाऱ्या पिढीला काय संदेश देणार, हा प्रश्न आहे. रस्त्यावर २४ तास सेवा देणारे स्मशानात प्रेत जाळणारे, पोलीस, आरोग्य आणि सफाई कर्मचारी आणि महसुली अधिकाऱ्यांनी काय तुमचे ठेके घेतले रस्त्यावर राहून जीव वाचविण्याचे, अशी चर्चा आहे. स्वार्थापोटी जीवन जगणारी फौज निर्माण झाल्याने सरकारने, सामाजिक कार्यकर्त्यांनी सुद्धा कोरोना वॉरियर्स म्हणून पुढे येऊन ही भीती काढणे आणि कोरोनासोबत जगण्याचा मूलमंत्र देणे गरजेचे आहे, अन्यथा माणुसकी कधीचीच संपलेली असेल आणि विदेशी राहणीमानाचा पगडा भारत देशात निर्माण होऊन सुसंस्कृत पिढीला ग्रहण लागल्याशिवाय राहणार नाही, असे आता जुन्या पिढीतील नागरिक बोलू लागले आहेत. तालुक्यातील सामाजिक कार्यकर्तेसुद्धा गायब झाले असून कुणी कुणाला मदतीचा हात देत नाही. आर्थिक टंचाईने प्रत्येक जण जर्जर झाला असून मदतीचा हात देणारे ते हातसुद्धा काळाच्या ओघात लुप्त झालेले आहेत.