शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
2
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
3
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
4
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
5
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
6
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
7
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
8
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
9
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
10
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
11
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
12
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
13
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
14
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
15
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
16
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
17
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
18
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
19
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
20
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक

कोरोना विषाणूने नातेसंबंधही तोडले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:21 IST

माणुसकी विसरलेली माणसे वरुड : गेल्या दोन महिन्यांच्या काळात कोविडच्या दुसऱ्या लाटेचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला असून ...

माणुसकी विसरलेली माणसे

वरुड : गेल्या दोन महिन्यांच्या काळात कोविडच्या दुसऱ्या लाटेचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला असून कोरोना कोविड १९ मुळे देशातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोरोनाच्या धास्तीमुळे माणुसकीचे आणि रक्ताचे नातेही दुरावले आहे. भाऊ भावाला, बहीण भावाला आणि मुलगा बापाला आणि वडील काकाला, मित्र मित्राला विसरला असून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या घाराजवळून सुद्धा कोणी फिरकत नाही. कोरोनाने गरीब- श्रीमंत भेदसुद्धा तोडला असून सर्व एका शृंखलेत गुंफले आहे. माणुसकी विसरून स्वार्थ बघायला लागला तर स्वतःचा जीव वाचविण्याच्या प्रयत्नात आहे. दरवाजबंद प्रणाली सुरू झाल्याने कुठे गेले माणुसकीचे बंधन, असा सवाल सुज्ञ नागरिक विचारित आहेत. राजा आणि रंक एकाच माळेचे मणी झाले आहेत. सर्वसामान्य जनता भाकरीच्या शोधात वणवण भटकंती करीत असून स्वत:ला उच्चंभ्रू समजणारे भावाला भाऊ , बहीण , काका, बाप , आई हे सर्व नाते विसरून दरवाजाबंद झाले, तर देशात राज्यकर्त्यांनी नागरिकांच्या मनात तुफान भीतीचे वातावरण निर्माण केल्याने बाप मेला तरी मुलगा आला नाही, तर जन्म देणारी आई गेली तरी मुलांनी व्हॉट्सॲपवर व्हिडीओ चॅटिंग करून अंत्यदर्शन घेतले. अनेकांच्या शुभमंगलाचा आस्वाद नात्यागोत्यातील लोकांनी मोबाइलवरच घेऊन अक्षता टाकल्या जात आहेत. ही भारतीय संस्कृती विज्ञान आणि कलियुगात पाहावयास मिळत आहे तर कोरोना संक्रमिताचा मृत्यू झाल्यावर सख्ख्या मुलांने सुद्धा अंत्यसंस्काराला पाठ देऊन सफाई कामगारांकडून तर कुठे शेजारच्या परधर्मीयांकडून अंत्यसंस्कार करून घेतल्याची उदाहरणे घडत आहेत. तर आजारी रुग्णाला रुग्णालयात नेण्यासाठी सुद्धा आप्तस्वकीय पुढे येत नाहीत, अशी अवस्था झाली आहे. काय तर केवळ कोरोनापासून बचाव झाला पाहिजे म्हणून एवढा उपद्व्याप केला. कुठे गेले रक्ताचे नाते, कुठे गेला जिव्हाळा, हा प्रश्न अनेकांना सतावू लागला असून ज्यांनी जग दाखविले त्यांच्यासाठी मरण पत्करावे लागले तरी चालेल; पण मात्या-पित्याचे मुखदर्शन घेणाकरिता पुढे न धजावणारी पिढी येणाऱ्या पिढीला काय संदेश देणार, हा प्रश्न आहे. रस्त्यावर २४ तास सेवा देणारे स्मशानात प्रेत जाळणारे, पोलीस, आरोग्य आणि सफाई कर्मचारी आणि महसुली अधिकाऱ्यांनी काय तुमचे ठेके घेतले रस्त्यावर राहून जीव वाचविण्याचे, अशी चर्चा आहे. स्वार्थापोटी जीवन जगणारी फौज निर्माण झाल्याने सरकारने, सामाजिक कार्यकर्त्यांनी सुद्धा कोरोना वॉरियर्स म्हणून पुढे येऊन ही भीती काढणे आणि कोरोनासोबत जगण्याचा मूलमंत्र देणे गरजेचे आहे, अन्यथा माणुसकी कधीचीच संपलेली असेल आणि विदेशी राहणीमानाचा पगडा भारत देशात निर्माण होऊन सुसंस्कृत पिढीला ग्रहण लागल्याशिवाय राहणार नाही, असे आता जुन्या पिढीतील नागरिक बोलू लागले आहेत. तालुक्यातील सामाजिक कार्यकर्तेसुद्धा गायब झाले असून कुणी कुणाला मदतीचा हात देत नाही. आर्थिक टंचाईने प्रत्येक जण जर्जर झाला असून मदतीचा हात देणारे ते हातसुद्धा काळाच्या ओघात लुप्त झालेले आहेत.