शहरं
Join us  
Trending Stories
1
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
2
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
3
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
4
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
5
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
6
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
7
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
8
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
9
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
10
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
11
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
12
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन
13
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
14
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
15
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
16
सोहम बांदेकरचं 'ठरलं तर मग'! 'या' अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ? होतोय अभिनंदनाचा वर्षाव
17
Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा
18
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
19
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
20
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!

कोरोना विषाणूने नातेसंबंधही तोडले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:21 IST

माणुसकी विसरलेली माणसे वरुड : गेल्या दोन महिन्यांच्या काळात कोविडच्या दुसऱ्या लाटेचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला असून ...

माणुसकी विसरलेली माणसे

वरुड : गेल्या दोन महिन्यांच्या काळात कोविडच्या दुसऱ्या लाटेचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला असून कोरोना कोविड १९ मुळे देशातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोरोनाच्या धास्तीमुळे माणुसकीचे आणि रक्ताचे नातेही दुरावले आहे. भाऊ भावाला, बहीण भावाला आणि मुलगा बापाला आणि वडील काकाला, मित्र मित्राला विसरला असून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या घाराजवळून सुद्धा कोणी फिरकत नाही. कोरोनाने गरीब- श्रीमंत भेदसुद्धा तोडला असून सर्व एका शृंखलेत गुंफले आहे. माणुसकी विसरून स्वार्थ बघायला लागला तर स्वतःचा जीव वाचविण्याच्या प्रयत्नात आहे. दरवाजबंद प्रणाली सुरू झाल्याने कुठे गेले माणुसकीचे बंधन, असा सवाल सुज्ञ नागरिक विचारित आहेत. राजा आणि रंक एकाच माळेचे मणी झाले आहेत. सर्वसामान्य जनता भाकरीच्या शोधात वणवण भटकंती करीत असून स्वत:ला उच्चंभ्रू समजणारे भावाला भाऊ , बहीण , काका, बाप , आई हे सर्व नाते विसरून दरवाजाबंद झाले, तर देशात राज्यकर्त्यांनी नागरिकांच्या मनात तुफान भीतीचे वातावरण निर्माण केल्याने बाप मेला तरी मुलगा आला नाही, तर जन्म देणारी आई गेली तरी मुलांनी व्हॉट्सॲपवर व्हिडीओ चॅटिंग करून अंत्यदर्शन घेतले. अनेकांच्या शुभमंगलाचा आस्वाद नात्यागोत्यातील लोकांनी मोबाइलवरच घेऊन अक्षता टाकल्या जात आहेत. ही भारतीय संस्कृती विज्ञान आणि कलियुगात पाहावयास मिळत आहे तर कोरोना संक्रमिताचा मृत्यू झाल्यावर सख्ख्या मुलांने सुद्धा अंत्यसंस्काराला पाठ देऊन सफाई कामगारांकडून तर कुठे शेजारच्या परधर्मीयांकडून अंत्यसंस्कार करून घेतल्याची उदाहरणे घडत आहेत. तर आजारी रुग्णाला रुग्णालयात नेण्यासाठी सुद्धा आप्तस्वकीय पुढे येत नाहीत, अशी अवस्था झाली आहे. काय तर केवळ कोरोनापासून बचाव झाला पाहिजे म्हणून एवढा उपद्व्याप केला. कुठे गेले रक्ताचे नाते, कुठे गेला जिव्हाळा, हा प्रश्न अनेकांना सतावू लागला असून ज्यांनी जग दाखविले त्यांच्यासाठी मरण पत्करावे लागले तरी चालेल; पण मात्या-पित्याचे मुखदर्शन घेणाकरिता पुढे न धजावणारी पिढी येणाऱ्या पिढीला काय संदेश देणार, हा प्रश्न आहे. रस्त्यावर २४ तास सेवा देणारे स्मशानात प्रेत जाळणारे, पोलीस, आरोग्य आणि सफाई कर्मचारी आणि महसुली अधिकाऱ्यांनी काय तुमचे ठेके घेतले रस्त्यावर राहून जीव वाचविण्याचे, अशी चर्चा आहे. स्वार्थापोटी जीवन जगणारी फौज निर्माण झाल्याने सरकारने, सामाजिक कार्यकर्त्यांनी सुद्धा कोरोना वॉरियर्स म्हणून पुढे येऊन ही भीती काढणे आणि कोरोनासोबत जगण्याचा मूलमंत्र देणे गरजेचे आहे, अन्यथा माणुसकी कधीचीच संपलेली असेल आणि विदेशी राहणीमानाचा पगडा भारत देशात निर्माण होऊन सुसंस्कृत पिढीला ग्रहण लागल्याशिवाय राहणार नाही, असे आता जुन्या पिढीतील नागरिक बोलू लागले आहेत. तालुक्यातील सामाजिक कार्यकर्तेसुद्धा गायब झाले असून कुणी कुणाला मदतीचा हात देत नाही. आर्थिक टंचाईने प्रत्येक जण जर्जर झाला असून मदतीचा हात देणारे ते हातसुद्धा काळाच्या ओघात लुप्त झालेले आहेत.