शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
3
"अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
4
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
5
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
6
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
7
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
8
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
9
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
10
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
11
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
12
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
13
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
14
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
15
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
16
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
17
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
18
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
19
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
20
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?

कोरोना बळी, ४०० चे दारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2021 4:10 AM

अमरावती : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे पहिल्या रुग्णाच्या मृत्यूला सोमवारी १० महिने पूर्ण झाले. या कालावधीत कोरोनाचे बळींची संख्या ३९८ ...

अमरावती : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे पहिल्या रुग्णाच्या मृत्यूला सोमवारी १० महिने पूर्ण झाले. या कालावधीत कोरोनाचे बळींची संख्या ३९८ वर पोहोचली आहे. जिल्ह्यात संक्रमितांचा मृत्यूदर दोन टक्क्यावर स्थिरावल्याने चिंतेत भर पडली आहे.

कोरोनाच्या पक्ल्याला रुग्णाची नोंद येथील हाथीपुरा भागात झाली व हा रुग्ण ‘होमडेथ’ असल्याने पहिल्या संक्रमिताची नोंद ४ एप्रिल रोजी झालेली आहे. या १० महिन्यांच्या कालावधीत कोमार्बिड रुग्णांचे सातत्याने मृत्यू होत आहेत. यात ८० टक्के रुग्ण ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यंना कोरोना संसर्गासह इतरही आजार असल्याचे आरोग्य विभागाचे ‘डेथऑडिट’मध्ये स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे कोरोनाचे सर्वाधिक बळी ५० ते ६० वर्षे वयोगटातील असल्याचा आरोग्य विभागाचा अहवाल असल्याने या वयोगटातील रुग्णांची व व्यक्तींनीही काळजी घेणे महत्त्वाचे ठरत आहे.

मुळात कोरोनाचा विषाणू हा श्वसन प्रक्रियेवर अटॅक करणारा असल्याने अंगावर दुखणे काढल्यास जिवावर बेतण्याचाच प्रकार ठरतो. किंबहुना सुरुवातीला झालेल्या आठ ते दहा ‘होमडेथ’ याच प्रकारातील रुग्ण होते, असे आरोग्य विभागाचे निरीक्षण आहे. त्यामुळे शासनाने सांगितलेल्या त्रिसूत्रीचा वापर करणे व याच माध्यमातून स्वत:सह स्वत:च्या परिवाराची सुरक्षा जपणे हे कोरोना संसर्गाच्या काळात महत्त्वाचे ठरत आहे.

या १० महिन्यांच्या काळात कोरोनाग्रस्तांची संख्यादेखील सातत्याने वाढत आहे. सद्यस्थितीत १९ हजार ९०१ कोरोनाग्रस्तांची नोंद जिल्ह्यात झालेली आहे. म्हणजेच रोज सरासरी ६५ रुग्ण या काळात निष्पन्न झाल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालावरून स्पष्ट होते.

बॉक्स

चाचण्यांची संख्या १.५५ लाख क्राॅस

या १० महिन्यांच्या कालावधीत कोरोना चाचण्यांची संख्या १,५५,३६ वर पोहोचली आहे. यात आरटी-पीसीआर चाचण्या ८१,९२० आहे व यातही विद्यापीठाचे लॅबद्वारा ७२,१६३ नमुन्यांची तपासणी केलेली आहे. रॅपिड अँन्टीजेनमध्ये ७१,९१५ चाचण्या शनिवारपर्यंत करण्यात आल्या आहेत. यात शहरी भागात ४०,०८३, तर ग्रामीणमध्ये ३१,८७२ चाचण्या करण्यात आल्या. या सर्व प्रकारात १,३४,५४१ नमुने निगेटिव्ह आलेले आहेत.

बॉक्स

५० रुग्ण गंभीर स्थितीत

आरोग्य विभागाच्या अहवालानूसार शनिवारपर्यंत ३४१ कोरोनाग्रस्तांना आयसोलेशनमध्ये ठेवलेले आहे. २९१ रुग्ण साधारण परिस्थितीत, तर ५० रुग्ण गंभीर स्थितीत आहेत. शनिवारी जिल्ह्यात १५६३ नमुन्यांची तपासणी करण्यात आलेली आहे. उपचारानंतर बरे वाटल्याने आतापर्यंत १९,१०० रुग्णांना कोरोनामुक्त करण्यात आलेले आहे. या आठवड्याात ग्रामपंचायत निवडणुकांमुळे चाचण्यांची संख्यावाढ झालेली आहे.