शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
5
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
6
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
7
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
8
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
9
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
10
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
11
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
12
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
13
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
14
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
15
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
16
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
17
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
18
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
19
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
20
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?

कोरोनामुळे अनाथ ११ बालकांना अर्थसहाय्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:10 IST

अमरावती : कोरोनामुळे अनाथ झालेल्या ११ बालकांना आता पाच लाखांचा लाभ मिळणार आहे. त्याच्या नावे ही रक्कम ठेवी स्वरूपात ...

अमरावती : कोरोनामुळे अनाथ झालेल्या ११ बालकांना आता पाच लाखांचा लाभ मिळणार आहे. त्याच्या नावे ही रक्कम ठेवी स्वरूपात राहील व २१ वर्षांचा झाल्यावर त्याला या रकमेचा लाभ मिळणार आहे. याशिवाय ११०० रुपयांच्या बालसंगोपन योजनेचा लाभ देखील या बालकांना मिळणार आहे. याविषयी शासनादेश प्राप्त झाल्याचे महिला व बाल विकास अधिकारी अतुल भडांगे यांनी सोमवारी सांगितले.

कोरोनामुळे अनाथ झालेल्या १८ वर्षांआतील बालकांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे या बालकांना पाच लाखांपर्यंतचे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय टास्क फोर्सने ही बालके शोधून काढली. १ मार्च २०२० व त्यानंतर कोरोनामुळे दोन्ही मात-पिता गमाविलेली ही बालके आहेत. या मुलांचे संगोपन करण्यास कुणीही तयार नसल्यास त्यांना बालगृहात दाखल करण्यात येणार आहे. यात जिल्ह्यात एका बालकाला देसाई चौकातील बाल संगोपनगृहात दाखल करण्यात आलेले आहे. याशिवाय १० बालकांना त्यांच्या नातेवाईकांनी सहारा दिलेला आहे. याशिवाय एक पालक गमावलेल्या २०० बालकांना १,१०० रुपयांचे दरमहा अर्थसहाय्य मिळणार आहे. बालसंगोपन योजनेंतर्गत मिळणाऱ्या रकमेचा वापर त्यांचे सध्याचे पालक शैक्षणिक व वैद्यकीय कारणांसाठी करू शकणार आहे.

बॉक्स

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत टास्क फोर्स

न्यायालयाचे आदेशाने जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत टास्क फोर्स गठित करण्यात आला आहे. यात कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांची माहिती संकलित करणे, त्यांना सर्वतोपरी संरक्षण उपलब्ध करणे, अशी बालके बाल कामगार, अनैतिक मानवी वाहतूक, मानवी तस्करी याला बळी पडणार नाही, याची काळजी घेणे, यासह अन्य जबाबदारी पार पाडत आहेत.