शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
2
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
3
Rapido मुळे अचानक Swiggy कडे आले २४०० कोटी रुपये, नक्की काय आहे प्रकरण?
4
चांगले मायलेज हवे असेल तर टायरमधील हवा नेमकी किती असावी? टायरवाला तर ४० पीएसआय भरतो...
5
Dussehra 2025: दसऱ्याला गुपचूप करा 'हे' धनप्राप्तीचे उपाय; कुबेर महाराज होतील प्रसन्न
6
भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी अचानक गरजला! अंदमानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला
7
घरी रोख रक्कम ठेवण्याची मर्यादा किती? जाणून घ्या आयकर विभागाचा महत्त्वाचा नियम
8
एच-१बी व्हिसा धोरणावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३६ तासांतच यू-टर्न का घेतला? 
9
सकाळ सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार करमाळ्यात; पूरग्रस्त भागाची पाहणी सुरू
10
ग्राहकांची झुंबड! वाहनांच्या विक्रीने नवा उच्चांक गाठला; कोणत्या क्षेत्रांना किती होणार फायदा?
11
सोलापुरातील महापुराचा रेल्वे वाहतुकीला फटका; वंदे भारत, सिद्धेश्वर एक्सप्रेसला उशिरा, अनेक गाड्या सोलापूर विभागात थांबविल्या
12
UPI EMI: आता UPI पेमेंट करताना EMI चा पर्याय निवडता येणार; NPCI आणणार नवी सुविधा
13
रोज-रोज चटणी भात... पतीने केली चिकनची मागणी; पत्नीने नकार देताच उचलले टोकाचे पाऊल!
14
"अवामवर बॉम्बस्फोट करुन वेळ मिळाला तर...", भारताच्या क्षितिज त्यागी यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानला सुनावले
15
शेअर बाजार पुन्हा घसरला, सेन्सेक्स १४७ अंकांनी आपटला; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
16
Online Shopping Tips: ऑनलाइन खरेदीवर खरोखर सूट मिळते का, कसे ओळखायचे? ध्रुव राठीने सांगितली ट्रिक
17
Post Office Scheme: बँक FD विसरुन जाल! Post Office ची ही स्कीम देईल १० वर्षात ४२ लाखांचा फंड, पटापट करा चेक
18
डोळ्यांसमोर पत्नीवर झाले ४५ वार, तरीही पती गप्प कसा बसला? पोलिसांना संशय आला; तपास करताच मोठा ट्विस्ट निघाला!
19
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
20
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी

कोरोनाने मरण स्वस्त; अपघातांमध्ये झाली घट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 05:00 IST

लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर वाहतुकीचे प्रमाण शहरात वाढल्याने पुन्हा अपघात वाढून मृत्यूच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. लॉकडाऊनचे नियम शिथिल झाल्यानंतर खासगी वाहने चालविण्यास परवानगी मिळाली. अनलॉकच्या प्रारंभी रस्ते मोकळे असल्याने व वाहतूक अचानक वाढल्याने नागरिकांनी निष्काळजीपणे अतिवेगाने वाहने दामटली. वाहन चालविण्याच्या पॅटर्नमध्ये अचानक झालेले बदल अपघातवाढीस कारणीभूत ठरल्याचे पोलिसांनी सांगितले.

ठळक मुद्देपाच महिन्यांत ३८ जणांना गमवावे लागले प्राण

संदीप मानकरलोकमत न्यूज नेटवरअमरावती : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाच्यावतीने लॉकडाऊन करण्यात आले होते. मार्च ते ३१ मे दरम्यान लॉकडऊनमुळे रस्ते अपघातात मृत्यूच्या प्रमाणात घट झाल्याचे आकडेवारीनुसार दिसून येते. गत पाच महिन्यांत  १५१ अपघात झाले असून, ३८ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर वाहतुकीचे प्रमाण शहरात वाढल्याने पुन्हा अपघात वाढून मृत्यूच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. लॉकडाऊनचे नियम शिथिल झाल्यानंतर खासगी वाहने चालविण्यास परवानगी मिळाली. अनलॉकच्या प्रारंभी रस्ते मोकळे असल्याने व वाहतूक अचानक वाढल्याने नागरिकांनी निष्काळजीपणे अतिवेगाने वाहने दामटली. वाहन चालविण्याच्या पॅटर्नमध्ये अचानक झालेले बदल अपघातवाढीस कारणीभूत ठरल्याचे पोलिसांनी सांगितले. विनापरवाना तीन वाहन पडून असल्याने त्यांच्या देखभाल दुरुस्तीकडेही दुर्लक्ष झाले. अवजड वाहने चालविणाऱ्या कष्टकरी वर्गाकडे लॉकडाऊन काळात कामे नसल्याने पैसे नव्हते. त्यामुळे त्यांनाही वाहनांची दुरुस्ती करता आली नसल्याची बाब समोर आली. त्यामुळे काही अपघात महामार्गावर घडले आहेत. काही ठिकाणी खड्डे वाचविण्याच्या नादात रस्त्यावर अपघात घडल्याची नोंद आहे. गत पाच महिन्यांत शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत १५१ वाहन अपघात झाले. त्यात ११६ जण जखमी झाले. ३८ जणांना जीव गमावावा लागला. मात्र, गतवर्षीच्या पाच महिन्याच्या तुलनेत लॉकडाऊनमुळे यंदा अपघातात घट झाल्याचे पोलिसांनी सांगितले. 

पायी चालणाऱ्यांनाही धोका रस्त्याने पायी जाणाऱ्यांचेही अपघात झाल्याची माहिती आहे. अनेक ठिकाणी शेतातून काम आटोपून घरी जाणाऱ्या शेतकऱ्याला मागून वाहनचालकांनी धडक दिल्याच्या घटना समोर आल्या. पादचाऱ्यांना फुटपाथऐवजी रस्त्यांवरून चालवावे लागते. त्यामुळेसुद्धा धोका निर्माण झालेला आहे.  

लॉकडाऊनमध्ये अपघात घटलेलॉकडाऊनमध्ये अपघाती मृत्यूच्या संख्येत कमालीची घट झाली. गतवर्षीच्या अनेक गंभीर अपघातात काहींना प्राणाला मुकावे लागले. सन २०२१ मध्ये पाच महिन्यात अमरावती शहरात टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, १५१ अपघातात ११६ जण जखमी झाले. ३८ जणांचा मृत्यू झाला आहे. 

मृतांमध्ये सर्वाधिक तरुणांचा समावेश शहरात झालेल्या अनेक अपघातांमध्ये तरुणांना जीव गमावावा लागला. भरधाव  वेगाने वाहन चालविणे, मद्यधुंद अवस्थेत दुचाकी पळविणे, स्वत:च अपघात करून मरणास कारणीभूत ठरणे आदी अनेक प्रकरणांमध्ये सर्वाधिक तरुण मृत्युमुखी पडल्याची माहिती आहे. 

या ठिकाणी वाहने हळू चालवाशहरात सर्वत्र सिमेंटचे गुळगुळीत रस्ते तयार झाले, मात्र रनेक ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्यात आलेले नाही. त्यामुळे अपघातांच्या प्रमाण काही प्रमाणात वाढले आहे. शहरात अनेक ठिकाणी ब्लॅकस्पॉट आहेत त्या ठिकाणी वाहने हळू चालवावी दारू पिऊन वाहने चालवून नये, आपला व आपल्या परिवारातील सदस्यांच्या जीव धोक्यात टाकू नये. 

नागरिकांनी वाहतुकीचे नियंम पाळावे. शहरातून भरधाव वेगाने वाहन चालविणे टाळावे. शहरात वर्षभर कारवाया सुरूच असतात. वाहन चालविताना मोबाईलवर बोलू नये, सर्वांनी वाहतूक नियम पाळले तर अपघात टळू शकते. - प्रवीण काळे, पोलीस निरीक्षक

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू