शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
2
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
3
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
4
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
5
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
6
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
7
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
8
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
9
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
10
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
11
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
12
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
13
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
14
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
15
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
16
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
17
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
18
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
19
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
20
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!

कोरोनाने मरण स्वस्त; अपघातांमध्ये झाली घट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 05:00 IST

लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर वाहतुकीचे प्रमाण शहरात वाढल्याने पुन्हा अपघात वाढून मृत्यूच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. लॉकडाऊनचे नियम शिथिल झाल्यानंतर खासगी वाहने चालविण्यास परवानगी मिळाली. अनलॉकच्या प्रारंभी रस्ते मोकळे असल्याने व वाहतूक अचानक वाढल्याने नागरिकांनी निष्काळजीपणे अतिवेगाने वाहने दामटली. वाहन चालविण्याच्या पॅटर्नमध्ये अचानक झालेले बदल अपघातवाढीस कारणीभूत ठरल्याचे पोलिसांनी सांगितले.

ठळक मुद्देपाच महिन्यांत ३८ जणांना गमवावे लागले प्राण

संदीप मानकरलोकमत न्यूज नेटवरअमरावती : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाच्यावतीने लॉकडाऊन करण्यात आले होते. मार्च ते ३१ मे दरम्यान लॉकडऊनमुळे रस्ते अपघातात मृत्यूच्या प्रमाणात घट झाल्याचे आकडेवारीनुसार दिसून येते. गत पाच महिन्यांत  १५१ अपघात झाले असून, ३८ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर वाहतुकीचे प्रमाण शहरात वाढल्याने पुन्हा अपघात वाढून मृत्यूच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. लॉकडाऊनचे नियम शिथिल झाल्यानंतर खासगी वाहने चालविण्यास परवानगी मिळाली. अनलॉकच्या प्रारंभी रस्ते मोकळे असल्याने व वाहतूक अचानक वाढल्याने नागरिकांनी निष्काळजीपणे अतिवेगाने वाहने दामटली. वाहन चालविण्याच्या पॅटर्नमध्ये अचानक झालेले बदल अपघातवाढीस कारणीभूत ठरल्याचे पोलिसांनी सांगितले. विनापरवाना तीन वाहन पडून असल्याने त्यांच्या देखभाल दुरुस्तीकडेही दुर्लक्ष झाले. अवजड वाहने चालविणाऱ्या कष्टकरी वर्गाकडे लॉकडाऊन काळात कामे नसल्याने पैसे नव्हते. त्यामुळे त्यांनाही वाहनांची दुरुस्ती करता आली नसल्याची बाब समोर आली. त्यामुळे काही अपघात महामार्गावर घडले आहेत. काही ठिकाणी खड्डे वाचविण्याच्या नादात रस्त्यावर अपघात घडल्याची नोंद आहे. गत पाच महिन्यांत शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत १५१ वाहन अपघात झाले. त्यात ११६ जण जखमी झाले. ३८ जणांना जीव गमावावा लागला. मात्र, गतवर्षीच्या पाच महिन्याच्या तुलनेत लॉकडाऊनमुळे यंदा अपघातात घट झाल्याचे पोलिसांनी सांगितले. 

पायी चालणाऱ्यांनाही धोका रस्त्याने पायी जाणाऱ्यांचेही अपघात झाल्याची माहिती आहे. अनेक ठिकाणी शेतातून काम आटोपून घरी जाणाऱ्या शेतकऱ्याला मागून वाहनचालकांनी धडक दिल्याच्या घटना समोर आल्या. पादचाऱ्यांना फुटपाथऐवजी रस्त्यांवरून चालवावे लागते. त्यामुळेसुद्धा धोका निर्माण झालेला आहे.  

लॉकडाऊनमध्ये अपघात घटलेलॉकडाऊनमध्ये अपघाती मृत्यूच्या संख्येत कमालीची घट झाली. गतवर्षीच्या अनेक गंभीर अपघातात काहींना प्राणाला मुकावे लागले. सन २०२१ मध्ये पाच महिन्यात अमरावती शहरात टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, १५१ अपघातात ११६ जण जखमी झाले. ३८ जणांचा मृत्यू झाला आहे. 

मृतांमध्ये सर्वाधिक तरुणांचा समावेश शहरात झालेल्या अनेक अपघातांमध्ये तरुणांना जीव गमावावा लागला. भरधाव  वेगाने वाहन चालविणे, मद्यधुंद अवस्थेत दुचाकी पळविणे, स्वत:च अपघात करून मरणास कारणीभूत ठरणे आदी अनेक प्रकरणांमध्ये सर्वाधिक तरुण मृत्युमुखी पडल्याची माहिती आहे. 

या ठिकाणी वाहने हळू चालवाशहरात सर्वत्र सिमेंटचे गुळगुळीत रस्ते तयार झाले, मात्र रनेक ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्यात आलेले नाही. त्यामुळे अपघातांच्या प्रमाण काही प्रमाणात वाढले आहे. शहरात अनेक ठिकाणी ब्लॅकस्पॉट आहेत त्या ठिकाणी वाहने हळू चालवावी दारू पिऊन वाहने चालवून नये, आपला व आपल्या परिवारातील सदस्यांच्या जीव धोक्यात टाकू नये. 

नागरिकांनी वाहतुकीचे नियंम पाळावे. शहरातून भरधाव वेगाने वाहन चालविणे टाळावे. शहरात वर्षभर कारवाया सुरूच असतात. वाहन चालविताना मोबाईलवर बोलू नये, सर्वांनी वाहतूक नियम पाळले तर अपघात टळू शकते. - प्रवीण काळे, पोलीस निरीक्षक

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू