शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

कॉपी केल्यास गुन्हा! संवेदनशील परीक्षा केंद्रांवर ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे लक्ष ठेवण्यात येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 18:34 IST

Amravati : जिल्ह्यात आतापर्यंत तीन कॉपी प्रकरणाची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी, बारावीची परीक्षा कॉपीमुक्त घेण्यासाठी राज्य मंडळाने अनेक महत्वपूर्ण बदल केले आहेत. कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत असल्यामुळे नियमावली कडक केली आहे. परीक्षेत कॉपी करणारे किंवा गैरप्रकार करणारे व त्यांना मदत करणाऱ्यांवर दखलपात्र, अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

ज्या केंद्रावर गैरमार्गाची प्रकरणे आढळून येतील अशा केंद्राची मान्यता पुढील वर्षापासून कायमस्वरूपी रद्द करण्यात येणार आहे. सन २०१८ पासून झालेल्या बोर्ड परीक्षेत ज्या परीक्षा केंद्रावर गैरप्रकार आढळले आहेत. त्या सर्व केंद्रावरील केंद्र संचालकांसह सर्व कर्मचारी बदलण्यात आले आहेत. संवेदनशील परीक्षा केंद्रावर प्रशासनातर्फे ड्रोन कॅमेराद्वारे लक्ष ठेवले जाणार आहे. 

हॉल तिकीट विसरले तरी पेपर देता येणारपरीक्षेला येताना विद्यार्थ्यांनी सोबत हॉल तिकीट आणणे आवश्यक आहे. हॉल तिकीट नसेल तर महाविद्यालयाचे ओळखपत्र, आधारकार्ड चालणार आहे.

बारावीची परीक्षा किती दिवस चालणारबारावीची परीक्षा ११ फेब्रुवारीपासून सुरू झालेली आहे. शेवटचा पेपर १८ मार्चला होणार आहे. प्रत्येक पेपरनंतर विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी सुटी देखील देण्यात आल्या आहेत.

कॉपीसाठी सहकार्य करणारा ही गुन्हेगारपरीक्षेत कॉपी करणाऱ्या व त्याला मदत करणारा ही गुन्हेगार असून त्यांचेवर कारवाई केली जाणार आहे. अजामीनपात्र गुन्हा दाखल केला जाणार आहे.

दहावीची परीक्षा कधी ?दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. दहावी परीक्षेचा शेवटचा पेपर १७ मार्चला होणार असून यावर्षी दहा दिवस अगोदर परीक्षा होत आहे.

कॉपी करणाऱ्यावर थेटपरीक्षेत विद्यार्थी कॉपी करताना आढळून आला तर बोर्डाच्या सूचनेनुसार त्यांच्यावर दाखलपात्र गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

दुसऱ्या दिवशीही हॉल तिकीट आणलं नाहीपरीक्षा येताना हॉल तिकीट आणणे अनिवार्य आहे. दुसऱ्या दिवशीही हॉल तिकीट नसेल तर सक्त सूचना केल्या जाणार आहेत.

कॉपीसाठी सहकार्य करणारा ही गुन्हेगारपरीक्षेत कॉपी करणाऱ्या व त्याला मदत करणारा ही गुन्हेगार असून त्यांचेवर कारवाई केली जाणार आहे. अजामीनपात्र गुन्हा दाखल केला जाणार आहे.

"कॉपीमुक्त परीक्षा अभियान राबविण्यात येत असताना नियमावलीही कडक केली आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षेचे दडपण न बाळगता तणावमुक्त परीक्षा द्याव्यात."- निलीमा टाके, विभागीय सचिव अमरावती विभागीय मंडळ

 

टॅग्स :Educationशिक्षणexamपरीक्षाAmravatiअमरावती