शहरं
Join us  
Trending Stories
1
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
2
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
3
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
4
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
5
Navi Mumbai Rains: वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
6
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
7
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
9
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
10
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
11
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
12
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
13
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
14
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
15
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
16
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
17
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
18
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
19
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार

कॉपी केल्यास गुन्हा! संवेदनशील परीक्षा केंद्रांवर ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे लक्ष ठेवण्यात येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 18:34 IST

Amravati : जिल्ह्यात आतापर्यंत तीन कॉपी प्रकरणाची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी, बारावीची परीक्षा कॉपीमुक्त घेण्यासाठी राज्य मंडळाने अनेक महत्वपूर्ण बदल केले आहेत. कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत असल्यामुळे नियमावली कडक केली आहे. परीक्षेत कॉपी करणारे किंवा गैरप्रकार करणारे व त्यांना मदत करणाऱ्यांवर दखलपात्र, अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

ज्या केंद्रावर गैरमार्गाची प्रकरणे आढळून येतील अशा केंद्राची मान्यता पुढील वर्षापासून कायमस्वरूपी रद्द करण्यात येणार आहे. सन २०१८ पासून झालेल्या बोर्ड परीक्षेत ज्या परीक्षा केंद्रावर गैरप्रकार आढळले आहेत. त्या सर्व केंद्रावरील केंद्र संचालकांसह सर्व कर्मचारी बदलण्यात आले आहेत. संवेदनशील परीक्षा केंद्रावर प्रशासनातर्फे ड्रोन कॅमेराद्वारे लक्ष ठेवले जाणार आहे. 

हॉल तिकीट विसरले तरी पेपर देता येणारपरीक्षेला येताना विद्यार्थ्यांनी सोबत हॉल तिकीट आणणे आवश्यक आहे. हॉल तिकीट नसेल तर महाविद्यालयाचे ओळखपत्र, आधारकार्ड चालणार आहे.

बारावीची परीक्षा किती दिवस चालणारबारावीची परीक्षा ११ फेब्रुवारीपासून सुरू झालेली आहे. शेवटचा पेपर १८ मार्चला होणार आहे. प्रत्येक पेपरनंतर विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी सुटी देखील देण्यात आल्या आहेत.

कॉपीसाठी सहकार्य करणारा ही गुन्हेगारपरीक्षेत कॉपी करणाऱ्या व त्याला मदत करणारा ही गुन्हेगार असून त्यांचेवर कारवाई केली जाणार आहे. अजामीनपात्र गुन्हा दाखल केला जाणार आहे.

दहावीची परीक्षा कधी ?दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. दहावी परीक्षेचा शेवटचा पेपर १७ मार्चला होणार असून यावर्षी दहा दिवस अगोदर परीक्षा होत आहे.

कॉपी करणाऱ्यावर थेटपरीक्षेत विद्यार्थी कॉपी करताना आढळून आला तर बोर्डाच्या सूचनेनुसार त्यांच्यावर दाखलपात्र गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

दुसऱ्या दिवशीही हॉल तिकीट आणलं नाहीपरीक्षा येताना हॉल तिकीट आणणे अनिवार्य आहे. दुसऱ्या दिवशीही हॉल तिकीट नसेल तर सक्त सूचना केल्या जाणार आहेत.

कॉपीसाठी सहकार्य करणारा ही गुन्हेगारपरीक्षेत कॉपी करणाऱ्या व त्याला मदत करणारा ही गुन्हेगार असून त्यांचेवर कारवाई केली जाणार आहे. अजामीनपात्र गुन्हा दाखल केला जाणार आहे.

"कॉपीमुक्त परीक्षा अभियान राबविण्यात येत असताना नियमावलीही कडक केली आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षेचे दडपण न बाळगता तणावमुक्त परीक्षा द्याव्यात."- निलीमा टाके, विभागीय सचिव अमरावती विभागीय मंडळ

 

टॅग्स :Educationशिक्षणexamपरीक्षाAmravatiअमरावती