तंटामुक्तीच्या अध्यक्ष निवडणुकीत पुन्हा वादंग

By Admin | Updated: August 24, 2014 23:12 IST2014-08-24T23:12:04+5:302014-08-24T23:12:04+5:30

गावातील तंटे सोडविण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदावरून देवमाळी ग्रामपंचायतीत दुसऱ्यांदा वादंग निर्माण झाला. मतगणनेवर आक्षेप नोंदविल्याने आता २ आॅक्टोबर रोजी अध्यक्षपदाची निवडणूक

Controversy over controversy again in presidential elections | तंटामुक्तीच्या अध्यक्ष निवडणुकीत पुन्हा वादंग

तंटामुक्तीच्या अध्यक्ष निवडणुकीत पुन्हा वादंग

नरेंद्र जावरे - अचलपूर
गावातील तंटे सोडविण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदावरून देवमाळी ग्रामपंचायतीत दुसऱ्यांदा वादंग निर्माण झाला. मतगणनेवर आक्षेप नोंदविल्याने आता २ आॅक्टोबर रोजी अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे.
परतवाडा शहराला लागून असलेली देवमाळी ग्रामपंचायत सध्या चर्चेत आहे. सहा वर्षांपूर्वी नव्याने स्थापन झालेल्या या ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणात नोकरदार, व्यापारी व शेतकरी असल्याने फार कमी प्रमाणात अशिक्षित मतदार आहेत. तीन महिन्यांपूर्वीच येथे ग्रामपंचायतीची निवडणूक झाली. पूर्ण बहुमतामध्ये असलेल्या प्रहार पक्षाला वेळेवर एका सदस्याने सरपंच पदावरून ‘खो’ दिला. अखेर अपक्ष घोडेराव नामक महिलेच्या सहकार्याने प्रहारच्या विद्या चौधरी सरपंच झाल्यात.
दरम्यान १५ आॅगस्ट रोजी ग्रामसभा घेण्यात आली. त्या सभेत विकासात्मक कामांच्या मुद्यासह महात्मा गांधी तंटामुक्तीच्या अध्यक्षांची निवड करताना तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदावरून निर्माण झालेला वाद पाहता पुन्हा २४ आॅगस्ट रोजी नवीन आमसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार रविवारी सकाळी ११ वाजता सभेला सुरूवातसुद्धा झाली. तंटामुक्त अध्यक्षपदासाठी तीन उमेदवार रिंगणात असल्याने एका उमेदवाराने माघार घेतली. अखेर सेवानिवृत्त पोलीस अधिकारी शेळके व शिक्षक हिवे, असे दोघे रिंगणात राहिले.

Web Title: Controversy over controversy again in presidential elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.